भारतीय सैन्य एकतेचे मूर्तिमंत उदाहरण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2019 12:35 AM2019-11-08T00:35:35+5:302019-11-08T00:35:39+5:30

विलास सुतावणे यांचे मत : आतापर्यंत २१ बहादुरांना परमवीरचक्र सन्मान

Statue of Indian Army Unity | भारतीय सैन्य एकतेचे मूर्तिमंत उदाहरण

भारतीय सैन्य एकतेचे मूर्तिमंत उदाहरण

Next

ठाणे : भारतीय सैन्य हे या देशातील विविधतेतील एकता या ब्रीदवाक्याचे मूर्तिमंत उदाहरण आहे. धर्म, जात, पंथ, भाषा यापलीकडे जाऊन देशाचे ऐक्य आणि अखंडता यासाठी सशक्त सेना नेहमीच तत्पर असते. त्यांच्यासाठी भारतीय हा एकच धर्म असतो, अशा भावना सीमेवर जाऊन भारतीय सैनिकांना सतत भेटून त्यांचा उत्साह वाढविणारे विलास सुतावणे यांनी व्यक्त केल्या.

अत्रे कट्ट्यावर बुधवारी ‘जरा याद करो कुर्बानी आणि परमवीरचक्र’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी सुतावणे उपस्थितांशी संवाद साधताना म्हणाले की, आपल्या सैन्यदलातील प्रत्येक जण स्वत:च्या प्राणाची पर्वा न करता देशावर आलेल्या परकीय आक्रमणाला धीराने सामोरे जात असतो. माणसाच्या काही भावना नैसर्गिक असतात. जसे की, राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज, राष्ट्रप्रेम हे उपजत असते. यातील राष्ट्रप्रेमाचे नाते परमवीरचक्र या पुरस्कारासाठी जोडलेले असते, असे मत त्यांनी मांडले. २४ आॅक्टोबर १९४५ रोजी संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना झाली. भारत हा संस्थापक सदस्य होता. जागतिक शांतता हे या संयुक्त राष्ट्रसंघाचे महत्त्वाचे उद्दिष्ट होते. भारतीय वायुदल आणि सैन्यदल यांचे श्रीलंकेतील तमिळ बंडखोर शोधायची मोहीम म्हणजे आॅपरेशन पवन आणि त्यात नेमके आठ महत रेजिमेंटचे रामस्वामी परमेश्वरन शहीद झाले आणि त्यांना मरणोत्तर परमवीरचक्र देण्यात आले. कारगिल युद्धात मनोज कुमार पांड्ये आणि विक्रम बात्रा या दोघांना मरणोत्तर परमवीरचक्र मिळाले, तर ग्रेनेडिअर योगेंद्रसिंग यादव आणि रायफलमॅन संजय कुमार यांना हा पुरस्कार जिवंत असताना मिळाला. १९६२ च्या चीनबरोबर झालेल्या युद्धात भारताचा पराभव झाला. तरीसुद्धा भारतीय सैन्याने खचून न जाता असामान्य शौर्य दाखविले. मेजर धनसिंग थापा, सुभेदार योगिंदर सिंग आणि मेजर शैतानसिंग यांना परमवीरचक्राने सन्मानित करण्यात आले. देशाला समृद्ध करण्यासाठी अहोरात्र परिश्रम आणि पराक्रम गाजविणाऱ्या प्रत्येक सैनिकासाठी नव्हे तर सर्व भारतीय नागरिकांसाठी असे हे २१ परमवीरचक्रविजेते नेहमीच प्रेरणादायी ठरतील, असे सुतावणे यावेळी म्हणाले.

परमवीरचक्र हे युद्धातील शौर्याबद्दल देण्यात येणारे भारतातील सर्वोच्च पारितोषिक आहे. भारतरत्न पुरस्काराच्या खालोखाल दुसºया क्रमांकाचे हे मानचिन्ह आहे. १९९९ सालातील कारगिल युद्ध प्रसिद्धिमाध्यमांमुळे सर्वांच्या स्मरणात आहे. या युद्धात चार शूरवीरांना परमवीरचक्र मिळाल्याची माहिती विलास सुतावणे यांनी दिली.

Web Title: Statue of Indian Army Unity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.