शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

नवीन वरसावे पुलाचे काम लवकर सुरु करा अन्यथा जनआंदोलन छेडू; कामगार सेनेचा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2018 4:42 PM

मीरा-भार्इंदर शहराच्या हद्दीतून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८ वरील नियोजित वरसावे पुलाच्या बांधकामात तांत्रिक अडचण निर्माण झाल्याचे वृत्त लोकमतच्या ठाणे पुरवणीत ८ फेब्रुवारीला प्रसिद्ध होताच शिवसेनेच्या मीरा-भार्इंदर कामगार सेनेचे सरचिटणीस सुल्तान पटेल यांनी त्या पुलाच्या बांधकामातील अडचणी त्वरीत दूर करुन त्याचे काम सुरु करावे अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडू असा इशारा भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला (एनएचएआय) दिला आहे.

भार्इंदर :  मीरा-भार्इंदर शहराच्या हद्दीतून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८ वरील नियोजित वरसावे पुलाच्या बांधकामात तांत्रिक अडचण निर्माण झाल्याचे वृत्त लोकमतच्या ठाणे पुरवणीत ८ फेब्रुवारीला प्रसिद्ध होताच शिवसेनेच्या मीरा-भार्इंदर कामगार सेनेचे सरचिटणीस सुल्तान पटेल यांनी त्या पुलाच्या बांधकामातील अडचणी त्वरीत दूर करुन त्याचे काम सुरु करावे अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडू असा इशारा भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला (एनएचएआय) दिला आहे.

मीरा-भार्इंदर शहराचा विकास झपाट्याने होत असुन शहरातील वाहने देखील सतत वाढत आहे. येथील नागरीकांना ठाणे अथवा वसई-विरारला रस्ते वाहतुकी मार्गे जायचे झाल्यास प्रचंड वाहतुक कोंडीतून मार्ग काढावा लागतो. शहरातील नागरीकांना वसई-विरारसह ठाणे येथे जाण्यासाठी महामार्गाचाच एकमेव आधार असल्याने या महामार्गावर सध्या वाहतुक कोंडी नित्याची झाली आहे. त्यातच या मार्गावरील वरसावे येथील उल्हासनदीवर ४५ वर्षांपुर्वी बांधलेला वाहतुक पुल सतत नादुरुस्त होऊ लागल्याने तो वाहतुकीसाठी धोकादायक ठरू लागला आहे. त्याच्या लगत असलेल्यान पुलावरही वाहनांची मोठी वर्दळ असल्याने त्यात अवजड वाहनांचा मोठा भरणा असतो. या पुलांच्या एका बाजुस वरसावे व दुसय््राा बाजुस ससुनवघर हि गावे असल्याने तेथील नागरीकांना पुलावरून ये-जा करताना जीव मुठीत घेऊन चालावे लागते. रात्रीच्या वेळेस तर पुलावर पथदिवे नसल्याने पादचाऱ्यांची मोठी कोंडी होते. या पुलावरुन ठाणे, मुंबईसह उपनगरांमधील हजारो वाहने दररोज ये-जा करीत असल्याने पुलाच्या दोन्ही बाजुंस वाहतुक कोंडीत भर पडत आहे. त्याला पर्याय म्हणुन एनएचएआयने नवीन वाहतुक पुलाचे बांधकाम करण्याचा निर्णय घेतला असुन त्याचे कंत्राट विजय मेस्त्री कंस्ट्रक्शन अ‍ॅन्ड एनजी प्रोजेक्ट लिमिटेड या कंपनीला काही महिन्यांपुर्वीच दिले आहे. मात्र त्याचे भूमीपुजन ११ डिसेंबर २०१७ मध्ये करण्यात आले असुन कामाचा कार्यादेशच अद्याप कंपनीला न दिल्याने पुलाचे बांधकाम सुरु झालेले नाही. परिणामी या पुलाचे बांधकामच विविध सरकारी परवानग्यांत अडकल्याने कंपनीने एनएचएआयवर ३० कोटींचा नुकसान भरपाईची नोटीस बजावली आहे. त्याचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध करताच नियोजित वाहतुक पुलाची कोंडी होऊन सध्याची वाहतुक कोंडी कायम राहण्याचे संकेत मिळू लागल्याने एनएचएआयला पटेल यांनी नियोजित वाहतुक पुलाची निर्मिती लवकरात लवकर होणे अपेक्षित असल्याचे म्हटले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर २४ महिन्यांतील पुलाचे बांधकाम १८ महिन्यांत पुर्ण करण्याचा वादा केला आहे. परंतु, पुलाचे बांधकामच तांत्रिक अडचणीत सापडल्याने पुलाच्या बांधकामाला मोठा विलंब होण्याची शक्यता पटेल यांनी वर्तविली आहे. त्या अडचणी एनएचएआयने त्वरीत निकाली न काढल्यास तीव्र जनआंदोलन छेडू, असा इशारा त्यांनी दिला आहे. 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक