शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

कल्याण-वसई जलमार्गाला चालना, खासदारांकडून पाहणी : मेट्रोच्या धर्तीवर उभारणार १० स्थानके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 2:17 AM

जलवाहतूक सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने पहिल्या टप्प्यात ५०० कोटींचा निधी मंजूर केला आहे. कल्याण-ठाणे-वसई-नवी मुंबई-मुंबई जलवाहतूक सुरू करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. त्यादृष्टीने कल्याण-ठाणे-वसई जलमार्गाची पाहणी सोमवारी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली.

कल्याण : जलवाहतूक सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने पहिल्या टप्प्यात ५०० कोटींचा निधी मंजूर केला आहे. कल्याण-ठाणे-वसई-नवी मुंबई-मुंबई जलवाहतूक सुरू करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. त्यादृष्टीने कल्याण-ठाणे-वसई जलमार्गाची पाहणी सोमवारी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली.श्लॉ वॉटर बोटीतून ही पाहणी करण्यात आली. त्यावेळी या प्रकल्पाचे सल्लागार व नौसेनेचे निवृत्त कॅप्टन रोहिला, शिवसेनेचे कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, सभागृह नेते राजेश मोरे, नगरसेवक दीपेश म्हात्रे आदी सहभागी झाले होते. हा मार्ग कल्याण खाडीपासून डोंबिवली, दिवा, मुंब्रा, अंजूर दिवे, गायमुख ते वसई असा राहणार आहे. या मार्गात १० स्टेशन असून, ती मेट्रो रेल्वे स्थानकाप्रमाणे बांधली जातील. त्यासाठी जेटी विकसित केल्या जाणार आहेत. पाहणी दौºयात वसई ते कल्याण अंतर पार करण्यासाठी एक तास २० मिनिटे लागली. एका वेळी एका बोटीतून ७० ते ८० प्रवासी प्रवास करतील. वसई ते कल्याण, कल्याण ते वसई अशा बोटीच्या फेºया होतील. ठाकुर्ली येथील चोळे पॉवर हाउस ते कल्याण यादरम्यान खाडीत खडक असून, तो फोडावा लागणार आहे.सध्या कल्याणहून वसईला जाण्यासाठी एसटीच्या कल्याण-आंबाडी-वसई-विरार या मार्गाने धावणाºया बस आहेत. त्या किमान तीन तासाने आहेत. ठाण्याहून वसईला जाण्यासाठी ठाणे-दादर-वसई, असा हेलपाटा मारून जावे लागते. तर रेल्वेने वसई गाठण्यासाठी दिवा-वसई गाडी कोपर स्थानकातून पकडावी लागते. परंतु, या मार्गावर दररोज किमान सहाच गाड्या धावतात. या प्रवासाला एक ते सव्वा तास लागतो. रेल्वेचा आणखी एक पर्याय म्हणजे दादरमार्गे वसई-विरार गाठणे. पण हा सर्वात जास्त लांबचा पल्ला आहे. त्या तुलनेत जलवाहतुकीमुळे वसई गाठण्यासाठी कमी वेळ लागणार आहे.जलवाहतुकीसाठी ठाणे पालिकेने सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला होता. त्यानुसार कल्याण ते ठाणे, ठाणे ते वसई, ठाणे ते नवी मुंबई, ठाणे ते मुंबई या जलमार्गांच्या शक्यता त्यात नमूद केल्या होत्या. त्यासाठी सल्लागाराने निश्चित केलेल्या जलमार्गाची पाहणी शिंदे यांनी केली. हा जलमार्ग अंतिम झाल्यावर त्याचा अहवाल पुन्हा सादर करून कामाची निविदा काढली जाणार आहे.

टॅग्स :Shrikant Shindeश्रीकांत शिंदे