शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

एसटी बसचे चाक थांबले, डिझेल टाकायला पैसे नाहीत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2021 07:27 IST

वाड्यात वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय

- वसंत भोईर वाडा : गाव तिथे एसटी असे ब्रीद असलेली एसटी ही सर्वसामान्यांचे प्रवासाचे साधन ठरलेली आहे; मात्र विविध कारणांनी आधीच संकटात असलेली एसटी पुन्हा एकदा संकटात सापडली आहे. दरम्यान, वाडा आगारात असलेला डिझेलचा साठा संपल्याने संपूर्ण वाहतूक ठप्प झाली आहे. यामुळे ग्रामीण व शहरी भागात जाणाऱ्या प्रवाशांची मात्र प्रचंड गैरसोय होत आहे. वाडा आगारातून दररोज तालुक्याच्या ग्रामीण भागात बसच्या १२५ फेऱ्या तर शहरी भागात १०० च्या वर फेऱ्या मारल्या जातात. यातून प्रवाशांची ने-आण केली जाते. ग्रामीण भागात एसटी बसशिवाय पर्याय नसल्याने प्रवासी बसवरच अवलंबून असतात. कमी पैशांत बस आपल्या नियोजित स्थळी पोहोचवते. मात्र गुरुवारी सकाळी वाडा एसटी आगारात असलेला डिझेलचा साठा संपल्याने १० वाजल्यापासून संपूर्ण बस बंद असून आगारात उभ्या आहेत. यामुळे प्रवाशांची मात्र प्रचंड गैरसोय झाली आहे. कोरोनामुळे ओढवले आर्थिक संकट गेले वर्षभर राज्याप्रमाणेच जिल्ह्यातही कोरोनाचे संकट असल्याने हे वर्ष आर्थिक तोट्याचेच गेले; मात्र अलीकडे एसटीचे चाक पुन्हा रुळावर येत आहे, असे वाटत असतानाच राज्यासह जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट आल्याने पुन्हा एकदा प्रवासी संख्या रोडावली आहे. यामुळे एसटीवर आणखी आर्थिक संकट ओढवणार आहे.  मुरबाड, शहापूर, कल्याणपाठोपाठ वाडा आगाराचाही डिझेल साठा संपल्याने बस आगारात उभ्या आहेत. वाडा आगाराला डिझेलचा साठा वाशी येथून पुरवला जातो. डिझेल संपल्याचे वरिष्ठ कार्यालयाकडे कळवण्यात आले आहे.     - मधुकर धांगडा, आगारप्रमुख, वाडा आगार

टॅग्स :state transportएसटी