शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

पालिका आयुक्तांचे सर्व विभागांना खर्च कपातीचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2018 19:07 IST

मीरा-भार्इंदर महापालिकेच्या वाढत्या खर्चाचा अपव्यय रोखण्यासाठी आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी नुकत्याच पार पडलेल्या विभागप्रमुखांच्या बैठकीत खर्चावर नियंत्रण आणण्याच्या सूचना देत त्याची त्वरित अंमलबजावणी करण्याचे सक्त आदेश दिल्याने अनावश्यक खर्चाच्या कपातीला सुरुवात झाल्याचे सांगण्यात येत आहे.

भार्इंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेच्या वाढत्या खर्चाचा अपव्यय रोखण्यासाठी आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी नुकत्याच पार पडलेल्या विभागप्रमुखांच्या बैठकीत खर्चावर नियंत्रण आणण्याच्या सूचना देत त्याची त्वरित अंमलबजावणी करण्याचे सक्त आदेश दिल्याने अनावश्यक खर्चाच्या कपातीला सुरुवात झाल्याचे सांगण्यात येत आहे.पालिकेकडून पदसिद्ध अधिकाऱ्यांसह काही अधिकाऱ्यांना स्वत:चे खासगी वाहने वापरापोटी तर काही अधिकाऱ्यांना कंत्राटावरील वाहनांच्या वापरापोटी एकरकमी वाहन भत्ता अदा केला जातो. कंत्राटी वाहनांना प्रती दिन ८ तासांप्रमाणे महिन्याकाठी २४ ते ३२ हजार रुपये अदा केले जातात. एखादे वाहन ८ तासांपेक्षा अधिक वेळेसाठी वापरल्यास त्या वाहनाच्या वापरापोटी प्रती किलोमीटर मागे ८ ते १० रुपये अतिरीक्त अदा केले जातात. त्यामुळे पालिकेचे लाखो रुपयांचे उत्पन्न कंत्राटी वाहनांसाठी खर्ची होते. यात पालिकेचे कंत्राटी वाहनांच्या तुलनेत खाजगी वाहनांवर कमी खर्च होत असल्याने आयुक्तांनी कंत्राटी वाहनांच्या वापरावर नियंत्रण आणून त्याचा अत्यावश्यकेतनुसारच वापर करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत.पालिकेच्या सर्व कार्यालयांत अनेकदा अधिकारी आपल्या जागेवर नसतानाही तेथील पंखे, एसी, बल्ब सुरुच असल्याचे दिसून येते. अशा वीज अपव्ययावर अंकुश ठेवत आयुक्तांनी दिवसा आवश्यकतेनुसारच विजेचा वापर करून त्यात बचत करण्याची सूचना सर्व विभागांना दिल्या आहेत. जेणेकरुन दरमहिन्याला पालिकेला वीजवापरापोटी येणाऱ्या लाखोंच्या बिलात घट होऊन पालिकेच्या खर्चाची बचत होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. शहरातील पथदिव्यांचा खर्च नागरी सुविधांच्या माध्यमातुन पालिकेला अदा करावा लागत असल्याने त्यावर सौर ऊर्जेचा पर्याय आयुक्तांनी सुचविल्याचे सांगण्यात येत आहे. पेपरलेस कारभाराचा अधिकाधिक वापर करून कागदाचा वापर कमी करण्याच्या सूचनाही त्यांनी विभागप्रमुखांना दिल्या. यांसह इतर खर्चिक बाबींवर सुद्धा नियंत्रण आणून त्याच्या खर्चात अधिकाधिक कपात करण्याचे आदेश आयुक्तांनी दिल्याने सर्व विभागांनी वीजेच्या अनावश्यक वापरावर नियंत्रण आणण्यास सुरुवात केली आहे. दिवसा उजेडात कमी वीजेचा वापर करण्यास सुरुवात झाल्याने आयुक्तांचा बचतीचा आदेश तात्पुरता कि कायमस्वरुपी प्रभावी ठरणार, अशी चर्चा मात्र कामानिमित्त पालिकेत येणाऱ्या नागरीकांमध्ये सुरु झाली आहे.पालिकेचे यंदाच्या आर्थिक वर्षात सरकारी अनुदानासह मूळ उत्पन्न सुमारे ७५० कोटींचे दर्शविण्यात आले असले तरी ते सत्ताधाऱ्यांकडून दुपटीने फुगविण्यात आले आहे. नागरी सोईसुविधांपोटी होणा-या खर्चात मोठी वाढ होत आहे. त्यामुळे अंदाजपत्रकात सतत वाढणारी तुट कमी करण्यासाठी खर्चावरील कपात अत्यावश्यक ठरु लागली आहे. यंदा तर पालिकेच्या सर्वसाधारण फंडातून विकासकामे पार पाडली जात असल्याने भविष्यात पालिकेची आर्थिक स्थिती खालावण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक