शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
2
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
3
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
4
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
5
नवरीच्या वडिलांनी लढवली शक्कल; लग्नात कपड्यांवरच लावला QR कोड, पाहुण्यांनी स्कॅन केलं अन्...
6
भारतातील आघाडीचा टूथपेस्ट ब्रँड 'कोलगेट' आता लोक खरेदी करत नाहीयेत? विक्रीत सातत्यानं घट, जाणून घ्या कारण
7
PPF, EPF की GPF? तुमच्या निवृत्तीसाठी कोणती योजना चांगली? तिन्हींमध्ये नेमका काय फरक?
8
Jaipur Accident: डंपर बनला काळ! कारला धडक देत ५ वाहनांना उडवले, ५० जणांना चिरडले, १० जणांचा मृत्यू   
9
प्रसिद्ध वकील असिम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द, समोर आलं असं कारण
10
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
11
‘हर-मन-की बात’... कुशीत ट्रॉफी, आणि टी-शर्टवरील खोडलेला ‘A Gentleman’s’ शब्दासह दिलेला मेसेज चर्चेत
12
टेक फंडांचा एका वर्षात निगेटिव्ह परतावा! 'या' ५ योजनांमध्ये सर्वाधिक नुकसान, गुंतवणूकदारांनी काय करावे?
13
"तेव्हा वाचलो पण आता प्रत्येक दिवस..."; अहमदाबाद विमान दुर्घटनेतून बचावलेल्या एकमेव व्यक्तीला 'या' गोष्टीचं दुःख!
14
आलिया भटच्या 'अल्फा' सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली, 'या' कारणामुळे घेतला निर्णय
15
खळबळजनक! बायकोची हत्या; मृतदेहासह दीड वर्षांच्या लेकाला खोलीत बंद करून पळाला नवरा
16
IAS बनण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं...; UPSC तयारी करणाऱ्या युवतीने का उचललं टोकाचं पाऊल?
17
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
18
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट
20
पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?

स्मार्ट मीटर पुन्हा वादाच्या भोवऱ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 01:00 IST

मागील कित्येक वर्षे कागदावर असलेली ठाणे महापालिकेची स्मार्ट मीटरची पहिल्या टप्प्याची योजना अखेर सुरू झाली आहे.

ठाणे : मागील कित्येक वर्षे कागदावर असलेली ठाणे महापालिकेची स्मार्ट मीटरची पहिल्या टप्प्याची योजना अखेर सुरूझाली आहे. परंतु, ती वादात सापडण्याची चिन्हे आहेत. कारण, पहिल्या टप्प्यात वाणिज्य आणि सोसायट्यांत मीटर लावतानाच झोपडपट्टी भागातील काही घरांनाही हे मीटर बसविल्याचे पडसाद सोमवारच्या महासभेत उमटले.झोपडपट्टी भागातही मीटर बसून संबंधित एजन्सीचा बिले काढण्याचा डाव असल्याचा आरोप यावेळी नगरसेवकांनी सभागृहात केला. त्यानंतर, मात्र आपली बाजू सावरण्यासाठी जर झोपडपट्टी भागात मीटर बसवण्याची कामे सुरू असतील, तर ती तत्काळ थांबवण्यात येतील, असे आदेश आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिल्याचे पाणीपुरवठा विभागाचे उपनगर अभियंता अर्जुन अहिरे यांनी सभागृहात सांगितले.आधी हायटेक, नंतर स्मार्ट आणि त्यानंतर पुन्हा सेमी आॅटोमेटीक मीटर अशा पद्धतीने मागील १२ वर्षे पालिका नळजोडण्यांवर मीटर बसविण्यासाठी निविदा काढल्या होत्या. परंतु, अखेर स्मार्ट सिटीच्या माध्यमातून ते बसविण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुसार, तब्बल एक लाख ४० हजार मीटर बसविले जाणार असून आतापर्यंत २२ हजारांहून अधिक मीटर बसविले गेले आहेत. घोडबंदर, माजिवड्यासह इतर भागांत ते बसविले आहेत. मात्र, सुरु वातीला केवळ वाणिज्य आणि सोसायट्यांत ते बसवण्याचे आदेश असताना महापौरांच्या मानपाडा प्रभाग समितीच्या हद्दीत, दिवा, मुंब्रा, कोलशेत अशा अनेक झोपडपट्टीभागात ते बसवण्यात आले असल्याची माहिती महापौर मीनाक्षी शिंदे आणि इतर नगरसेवकांनीउघड केली.जर एका प्रभागात मीटर बसवण्याचे काम सुरू केले असेल, तर त्या संपूर्ण शहरात मीटर बसवण्यात यावेत, अशी मागणी महापौरांनी केली. तर, सभागृह नेते नरेश म्हस्के यांनीदेखील आपल्या प्रभागात अजूनही स्मार्ट मीटर बसवण्याची विचारणा होत असल्याने नेमका हा काय प्रकार आहे, असा प्रश्न केला.>आयुक्तांनीच मांडली वस्तुस्थिती : कार्यकारी अभियंता विकास ढोले यांनी यावर स्पष्टीकरण देताना म्हणाले की, सुरुवातीला झोपडपट्टी भागात स्मार्ट मीटर बसवण्याचे काम सुरू केले होते. त्यानंतर पालिका आयुक्तांच्या बैठकीनंतर केवळ वाणिज्य वास्तू आणि सोसायट्यांतच ते बसवण्यात येणार असल्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. ढोले यांच्या उत्तरावर नगरसेवक समाधानी न झाल्याने प्रशासनाची बाजू सावरण्यासाठी आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सभागृहात बाजू मांडली. शहरात पाच लाखांपेक्षा अधिक नळजोडणीधारक असून एवढ्या जोडण्यांवर स्मार्ट मीटर बसवणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले. पहिल्या टप्प्यात केवळ एक लाख ४० हजार मीटर बनवण्यात येणार असून त्यानंतरच्या टप्प्यात सर्व ठिकाणी ते बसवले जाणार असल्याचे सांगितले. मात्र, या उत्तरावरही नगरसेवक समाधानी न झाल्याने ज्या ठिकाणी अशाप्रकारचे झोपडपट्टी भागात मीटर बसवण्याची कामे सुरू केली आहेत, ती कामे तत्काळ थांबवण्यात यावीत, असे आदेश त्यांनी दिले असल्याची माहिती सभागृहात अर्जुन अहिरे यांनी दिल्याने या वादावर अखेर पडदा पडला.