शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Election 2026: "राज ठाकरेंची भाषणं भारी, पण कामाच्या नावानं पाटी कोरी" असं कुणी म्हटलं? 
2
भाईंदरमध्ये आचार संहितेचा भंग, आठ दिवसानंतर गुन्हा दाखल, लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट!
3
Pakistan Accident: पाकिस्तानमध्ये भीषण अपघात; खेळाडूंना घेऊन जाणाऱ्या बसची व्हॅनला धडक, १५ जणांचा मृत्यू
4
'लोकपाल'साठी आता ५ कोटी रुपयांच्या बीएमडब्ल्यू कार खरेदी केल्या जाणार नाहीत; निविदा केल्या रद्द
5
Nagpur: सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांना महापालिकेचा दणका; एकाच दिवसात ४४ जणांवर कारवाई!
6
Google: नव्या वर्षात गुगल पिक्सेल १० खरेदी करा आणखी स्वस्तात; फ्लिपकार्टची जबरदस्त ऑफर्स!
7
"उत्तर भारतीयांना मारहाण करणाऱ्यांना अटक करा, नाहीतर..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचा इशारा
8
Nagpur: पूर्व नागपुरात ‘तूतू-मैमै’, खोपडे पिता-पुत्र आमदार वंजारींवर बरसले
9
इराणमध्ये लोक रस्त्यावर उतरले, सुरक्षा जवानांसोबत झटापट; काही जण दगावले, नेमकं काय घडले?
10
दुर्गापूजा, जन्माष्टमी, सरस्वती पूजन... सगळ्या सुट्या रद्द ! बांग्लादेशमध्ये हिंदूंवर आघात
11
Switzerland Blast: स्वित्झर्लंडमधील बारमधील स्फोट, दहशतवादी हल्ला की आणखी काही? पोलिसांनी केला मोठा खुलासा; आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू
12
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सिद्धीविनायकाचे घेतले दर्शन, पाहा फोटो
13
रोहित–विराटच्या निवृत्तीनंतर वनडे क्रिकेटच संपणार? अश्विन म्हणाला, FIFA फॉर्म्युलाच ठरेल 'तारणहार'
14
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
15
Viral Video: स्टेडियमला पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंवर आली टॅक्सीला धक्का मारण्याची वेळ
16
Jammu and Kashmir Champions League: भारतीय क्रिकेटपटूच्या हेल्मेटवर पॅलेस्टिनी ध्वज, पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं, कोण आहे तो?
17
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
18
तेजस्वी घोसाळकरांविरोधात मैत्रीणच रिंगणात! उद्धव ठाकरेंनी 'या' महिलेला दिली उमेदवारी 
19
Ahilyanagar: मनसेच्या दोन उमेदवारांचे अपहरण? पक्षाची कोतवाली पोलीस ठाण्यात धाव!
20
सावधान! फास्ट फूड बेतलं जीवावर; बर्गर, नूडल्स खाणाऱ्या विद्यार्थिनीचा मेंदूत २० गाठी झाल्याने मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट मीटर पुन्हा वादाच्या भोवऱ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 01:00 IST

मागील कित्येक वर्षे कागदावर असलेली ठाणे महापालिकेची स्मार्ट मीटरची पहिल्या टप्प्याची योजना अखेर सुरू झाली आहे.

ठाणे : मागील कित्येक वर्षे कागदावर असलेली ठाणे महापालिकेची स्मार्ट मीटरची पहिल्या टप्प्याची योजना अखेर सुरूझाली आहे. परंतु, ती वादात सापडण्याची चिन्हे आहेत. कारण, पहिल्या टप्प्यात वाणिज्य आणि सोसायट्यांत मीटर लावतानाच झोपडपट्टी भागातील काही घरांनाही हे मीटर बसविल्याचे पडसाद सोमवारच्या महासभेत उमटले.झोपडपट्टी भागातही मीटर बसून संबंधित एजन्सीचा बिले काढण्याचा डाव असल्याचा आरोप यावेळी नगरसेवकांनी सभागृहात केला. त्यानंतर, मात्र आपली बाजू सावरण्यासाठी जर झोपडपट्टी भागात मीटर बसवण्याची कामे सुरू असतील, तर ती तत्काळ थांबवण्यात येतील, असे आदेश आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिल्याचे पाणीपुरवठा विभागाचे उपनगर अभियंता अर्जुन अहिरे यांनी सभागृहात सांगितले.आधी हायटेक, नंतर स्मार्ट आणि त्यानंतर पुन्हा सेमी आॅटोमेटीक मीटर अशा पद्धतीने मागील १२ वर्षे पालिका नळजोडण्यांवर मीटर बसविण्यासाठी निविदा काढल्या होत्या. परंतु, अखेर स्मार्ट सिटीच्या माध्यमातून ते बसविण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुसार, तब्बल एक लाख ४० हजार मीटर बसविले जाणार असून आतापर्यंत २२ हजारांहून अधिक मीटर बसविले गेले आहेत. घोडबंदर, माजिवड्यासह इतर भागांत ते बसविले आहेत. मात्र, सुरु वातीला केवळ वाणिज्य आणि सोसायट्यांत ते बसवण्याचे आदेश असताना महापौरांच्या मानपाडा प्रभाग समितीच्या हद्दीत, दिवा, मुंब्रा, कोलशेत अशा अनेक झोपडपट्टीभागात ते बसवण्यात आले असल्याची माहिती महापौर मीनाक्षी शिंदे आणि इतर नगरसेवकांनीउघड केली.जर एका प्रभागात मीटर बसवण्याचे काम सुरू केले असेल, तर त्या संपूर्ण शहरात मीटर बसवण्यात यावेत, अशी मागणी महापौरांनी केली. तर, सभागृह नेते नरेश म्हस्के यांनीदेखील आपल्या प्रभागात अजूनही स्मार्ट मीटर बसवण्याची विचारणा होत असल्याने नेमका हा काय प्रकार आहे, असा प्रश्न केला.>आयुक्तांनीच मांडली वस्तुस्थिती : कार्यकारी अभियंता विकास ढोले यांनी यावर स्पष्टीकरण देताना म्हणाले की, सुरुवातीला झोपडपट्टी भागात स्मार्ट मीटर बसवण्याचे काम सुरू केले होते. त्यानंतर पालिका आयुक्तांच्या बैठकीनंतर केवळ वाणिज्य वास्तू आणि सोसायट्यांतच ते बसवण्यात येणार असल्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. ढोले यांच्या उत्तरावर नगरसेवक समाधानी न झाल्याने प्रशासनाची बाजू सावरण्यासाठी आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सभागृहात बाजू मांडली. शहरात पाच लाखांपेक्षा अधिक नळजोडणीधारक असून एवढ्या जोडण्यांवर स्मार्ट मीटर बसवणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले. पहिल्या टप्प्यात केवळ एक लाख ४० हजार मीटर बनवण्यात येणार असून त्यानंतरच्या टप्प्यात सर्व ठिकाणी ते बसवले जाणार असल्याचे सांगितले. मात्र, या उत्तरावरही नगरसेवक समाधानी न झाल्याने ज्या ठिकाणी अशाप्रकारचे झोपडपट्टी भागात मीटर बसवण्याची कामे सुरू केली आहेत, ती कामे तत्काळ थांबवण्यात यावीत, असे आदेश त्यांनी दिले असल्याची माहिती सभागृहात अर्जुन अहिरे यांनी दिल्याने या वादावर अखेर पडदा पडला.