शहरं
Join us  
Trending Stories
1
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
2
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
3
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
4
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
5
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
6
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
7
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
8
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
9
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
10
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
11
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
12
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
13
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
14
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
15
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
16
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
17
ऑपरेशन सिंदूरमधील नामुष्कीनंतर पाकिस्तान सुधरेना, अण्वस्त्रांबाबत रचतोय भयंकर डाव, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट
18
दुसरी मुलगी झाली म्हणून टोमणे; अमरावतीत ‘सीएचओ’ची आत्महत्या
19
व्लादिमीर पुतीन यांच्या हेलिकॉप्टरवर युक्रेनकडून ड्रोन हल्ला, बालंबाल बचावल्याचं वृत्त   
20
Monsoon Update : आनंदाची बातमी! या राज्यांमध्ये मान्सूनचे दमदार आगमन; मुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रात कधी येणार?

लहान धरणांचे सर्वेक्षण कागदावरच

By admin | Updated: April 20, 2016 02:11 IST

ठाणे जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता जवळपास लहान ६० धरणे बांधता येतील. त्यासाठी कोकण लघू पाटबंधारे विभागाने १० वर्षांपूर्वी सर्वेक्षण झाले आहे.

मुरलीधर भवार, कल्याणठाणे जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता जवळपास लहान ६० धरणे बांधता येतील. त्यासाठी कोकण लघू पाटबंधारे विभागाने १० वर्षांपूर्वी सर्वेक्षण झाले आहे. मात्र, त्याची अंमलबजावणीच अजूनही सरकारने केलेली नाही. ही अंमलबजावणी वेळीच झाली असती तर आज जिल्ह्यातील पाण्याची समस्या इतकी बिकट झाली नसती, अशी माहिती कोकण लघु पाटबंधारे महामंडळाचे माजी उपाध्यक्ष व भाजपा आमदार किसन कथोरे यांनी दिली आहे. कथोरे यांनी सांगितले की, २००५ ते २००९ दरम्यान ते कोकण लघु पाटबंधारे महामंडळाचे उपाध्यक्ष होते. त्यावेळी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांकडून स्वत:चा जलसाठा तयार करण्यासाठी प्रस्ताव मागविले होते. एकाही स्थानिक स्वराज्य संस्थेने धरणासाठी प्रस्ताव पाठविला नाही. आज जिल्ह्यातील नागरिकांना ३० टक्के पाणी कपातीला सामोरे जावे लागत आहे. तर ३५ टक्के पाण्याची गळती आहे. प्रत्यक्षात नागरिकांना ३५ टक्केच पाणीपुरवठा होत आहे. या पाण्यावरच जिल्ह्यातील दीड कोटी नागरिकांची तहान भागविली जात आहे. पाण्याची गळती रोखल्यास नागरिकांना जादा पाणी मिळू शकेल. गळती रोखण्यासाठी सामूहिक प्रयत्न नाहीत. सरकारी यंत्रणाही ढिम्म आहेत. जिल्ह्यात लहान धरणे तयार करण्याचे प्रस्ताव सरकार दरबारी प्रलंबित आहेत, असे ते म्हणाले. लहान धरणाचा जलसाठा १८ ते ३० दशलक्ष लिटर इतका असतो. त्यातून आसपासच्या नागरिकांची तहान भागू शकते. परिणामी उल्हास नदीतून पाणी उचलल्यामुळे पडणारा ताण कमी होईल. तसेच जास्तीचे पाणी टंचाईग्रस्त भागाला देता येईल. स्थानिक स्वराज्य संस्था नव्या इमारतींच्या बांधकामाला परवानगी देतात. मात्र, या संस्था तेथे राहण्यास येणाऱ्या नागरिकांसाठी पाण्याचे नियोजन करीत नाही. त्यात बेकायदा बांधकामे वाढत आहेत. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नाही. पाणीचोरांवरही कारवाई होत नाही. त्याची झळ जिल्ह्याला बसते आहे. कोंढाणेचे नियोजन फसले, पोशीर भूसंपादनाच्या कचाट्यातकोंढाणे धरणाचे नियोजन फसले आहे. कर्जतनजीकचे पोशीर धरण भूसंपादनाच्या कचाट्यात सापडले आहे. मोठ्या धरणांसाठी वनविभाग व पर्यावरण परवानग्या मिळणे कठीण होते. किमान लहान आकाराची धरणे मार्गी लागल्यास त्यांच्या उभारणीसाठी लागणारा वेळ आणि खर्च कमी लागतो असे कथोरे यांनी सांगितले.सह्याद्रीच्या फूटहिल्स समजल्या जाणाऱ्या मलंगगडाच्या डोंगरातून वाहून येणारे पाणी कल्याण खाडीला मिळते. तेथे कुशीवली धरणाचा प्रस्ताव आहे. बदलापूर येथे भोज धरणाचा प्रस्ताव आहे. तसेच इंदगावचे धरण प्रस्तावित आहे. चिंचवली येथेही धरणे होऊ शकते. या लहान धरणांचे सर्वेक्षण झाले आहे. त्याची अंमलबजावणी तत्कालीन आघाडी सरकारने केली नाही.