शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

लहान धरणांचे सर्वेक्षण कागदावरच

By admin | Updated: April 20, 2016 02:11 IST

ठाणे जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता जवळपास लहान ६० धरणे बांधता येतील. त्यासाठी कोकण लघू पाटबंधारे विभागाने १० वर्षांपूर्वी सर्वेक्षण झाले आहे.

मुरलीधर भवार, कल्याणठाणे जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता जवळपास लहान ६० धरणे बांधता येतील. त्यासाठी कोकण लघू पाटबंधारे विभागाने १० वर्षांपूर्वी सर्वेक्षण झाले आहे. मात्र, त्याची अंमलबजावणीच अजूनही सरकारने केलेली नाही. ही अंमलबजावणी वेळीच झाली असती तर आज जिल्ह्यातील पाण्याची समस्या इतकी बिकट झाली नसती, अशी माहिती कोकण लघु पाटबंधारे महामंडळाचे माजी उपाध्यक्ष व भाजपा आमदार किसन कथोरे यांनी दिली आहे. कथोरे यांनी सांगितले की, २००५ ते २००९ दरम्यान ते कोकण लघु पाटबंधारे महामंडळाचे उपाध्यक्ष होते. त्यावेळी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांकडून स्वत:चा जलसाठा तयार करण्यासाठी प्रस्ताव मागविले होते. एकाही स्थानिक स्वराज्य संस्थेने धरणासाठी प्रस्ताव पाठविला नाही. आज जिल्ह्यातील नागरिकांना ३० टक्के पाणी कपातीला सामोरे जावे लागत आहे. तर ३५ टक्के पाण्याची गळती आहे. प्रत्यक्षात नागरिकांना ३५ टक्केच पाणीपुरवठा होत आहे. या पाण्यावरच जिल्ह्यातील दीड कोटी नागरिकांची तहान भागविली जात आहे. पाण्याची गळती रोखल्यास नागरिकांना जादा पाणी मिळू शकेल. गळती रोखण्यासाठी सामूहिक प्रयत्न नाहीत. सरकारी यंत्रणाही ढिम्म आहेत. जिल्ह्यात लहान धरणे तयार करण्याचे प्रस्ताव सरकार दरबारी प्रलंबित आहेत, असे ते म्हणाले. लहान धरणाचा जलसाठा १८ ते ३० दशलक्ष लिटर इतका असतो. त्यातून आसपासच्या नागरिकांची तहान भागू शकते. परिणामी उल्हास नदीतून पाणी उचलल्यामुळे पडणारा ताण कमी होईल. तसेच जास्तीचे पाणी टंचाईग्रस्त भागाला देता येईल. स्थानिक स्वराज्य संस्था नव्या इमारतींच्या बांधकामाला परवानगी देतात. मात्र, या संस्था तेथे राहण्यास येणाऱ्या नागरिकांसाठी पाण्याचे नियोजन करीत नाही. त्यात बेकायदा बांधकामे वाढत आहेत. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नाही. पाणीचोरांवरही कारवाई होत नाही. त्याची झळ जिल्ह्याला बसते आहे. कोंढाणेचे नियोजन फसले, पोशीर भूसंपादनाच्या कचाट्यातकोंढाणे धरणाचे नियोजन फसले आहे. कर्जतनजीकचे पोशीर धरण भूसंपादनाच्या कचाट्यात सापडले आहे. मोठ्या धरणांसाठी वनविभाग व पर्यावरण परवानग्या मिळणे कठीण होते. किमान लहान आकाराची धरणे मार्गी लागल्यास त्यांच्या उभारणीसाठी लागणारा वेळ आणि खर्च कमी लागतो असे कथोरे यांनी सांगितले.सह्याद्रीच्या फूटहिल्स समजल्या जाणाऱ्या मलंगगडाच्या डोंगरातून वाहून येणारे पाणी कल्याण खाडीला मिळते. तेथे कुशीवली धरणाचा प्रस्ताव आहे. बदलापूर येथे भोज धरणाचा प्रस्ताव आहे. तसेच इंदगावचे धरण प्रस्तावित आहे. चिंचवली येथेही धरणे होऊ शकते. या लहान धरणांचे सर्वेक्षण झाले आहे. त्याची अंमलबजावणी तत्कालीन आघाडी सरकारने केली नाही.