शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
3
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
4
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
5
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
6
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
7
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
8
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
9
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
10
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
11
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
12
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
13
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
14
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
15
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
16
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
17
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
18
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
19
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
20
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 

सहावी मार्गिका होणार २०२० अखेरीस पूर्ण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 12:29 AM

मुंबापुरीची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या मध्य रेल्वेच्या लोकलचे वेळापत्रक पंधरवड्यापासून विविध तांंत्रिक कारणांनी कोलमडल्याने ठाणे जिल्ह्यातील २० लाख प्रवाशांना त्याचा फटका बसला.

- अनिकेत घमंडीमध्य रेल्वेच्या तांत्रिक बिघाडामुळे ठाणे जिल्ह्यातील लाखो प्रवाशांचे हाल होत आहेत, त्याचे काय?अनेकदा सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाडाची समस्या उद्भवते. याशिवाय कर्जत, कसारा मार्गावर म्हशींसह अन्य प्राणी रेल्वे मार्गात येतात. अनेकदा गर्दीच्या रेल्वे स्थानकांमध्ये रेल्वे रुळ ओलांडणाऱ्या प्रवाशांचा अपघात होतो, तर कधी चेन पुलींग केले जाते. त्यामुळे लोकल थांबली की, ती पुन्हा सुुरु व्हायला ४ मिनिटे लागतात. त्यामुळे लोकलचे ‘बंचिंग’ होते. हिवाळ्यात, पावसाळ्यात रुळांना तडा जातो. त्याची कामे तातडीने करावी लागतात. अशा नानाविध कारणांनी मध्यरेल्वेची उपनगरिय लोकल सेवा प्रभावित होते. त्याचा परिणाम साहजिकच वेळापत्रकावर होतो. बरेचदा तांत्रिक समस्यांमुळे लोकलसेवा विस्कळीत होते. पँटोग्राफची समस्याही अधुनमधून उद्भवते. मध्य रेल्वे सीएसएमटी ते कसारा १०७ किमी, कर्जत मार्गावर ९५ किमी, तर खोपोलीपर्यंत १२० किमी धावते. लांबच्या प्रवासात अनेक अडचणी येतात. पण तरीही अपवाद वगळता लोकल सेवा अखंड सुरु असते. मध्य रेल्वेमधून प्रतीदिन ४२ लाख ५० हजार प्रवासी मुख्य, हार्र्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर प्रवास करतात. दिवसाला १७७२ लोकल फेºया करणारी देशभरामध्ये सगळ्यात मोठी उपनगरिय रेल्वे सेवा अशी मध्य रेल्वेची ख्याती आहे.पावसाळ्यात रेल्वेसेवा ठप्प होऊ नये, यासाठी काय उपाययोजना केल्या आहेत?सगळ्यात जास्त समस्या पावसाळ्यात भेडसावतात. मध्य रेल्वेच्या मुख्य आणि ट्रान्सहार्बर भागामध्ये बहुतांश ठिकाणी खाडीकिनारा आहे. त्यातच ठाणे जिल्ह्यात, प्रामुख्याने ठाणे ते कल्याण भागामध्ये रुळालगतच खाडी आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये समुद्राच्या भरती, आहोटीनुसार पाणी तुंबण्याच्या घटना घडतात. सायन, कुर्ला, हार्बरला काही भागात, तसेच कळवा आदी ठिकाणी जमिनीच्या सखल भागात रेल्वे रुळावर पाणी साचण्याच्या समस्या उद्भवतात. मात्र आता त्या ठिकाणी पाणी तुंबू नये आणि रेल्वे सेवा प्रभावित होऊ नये यासाठी परेल, माटुंगा, सायन आदी ठिकाणी रेल्वे रुळांची उंची ५ इंचापर्यंत वाढवण्यात आली आहे. मानखुर्द स्थानकातदेखील रुळांची उंची ५ इंचांनी वाढवण्यात आली आहे. लोकलसेवा वेळेत चालवण्यासाठी विशेष स्टाफची निर्मिती केली आहे. सीएसएमटी, कुर्ला, ठाणे, कल्याण आदी स्थानकांत हे विशेष कर्मचारी लोकल सेवा का वेळेत धावत नाही, याची पाहणी करतील आणि समस्या निर्माण झाल्यास त्यावर काय तोडगा काढायचा, यासंदर्भात वरिष्ठांशी चर्चा करतील. रेल्वे रुळांमध्ये तुंबलेले पाणी बाहेर काढण्यासाठी सुमारे ९७ ठिकाणी वॉटर पंप लावण्यात आले असून ते चांगल्या क्षमतेचे आहेत.ठाणे जिल्ह्यातील लोकल फेºया कधी वाढणार?५/६ व्या रेल्वे लाइनचे काम प्रगतिपथावर असून कल्याण ते दिवा, तसेच ठाणे ते कुर्ला मार्गावर काम पूर्ण झाले आहे. गेल्या काही वर्षांपासून ठाणे-दिवा मार्गावर हे काम सुरु आहे. पण गतवर्षीपासून या कामाने जोर धरला असून, दिवा, मुंब्रा, कळवा रेल्वे मार्गावर विशेषत: धिम्या दिशेकडे झालेले मोठे बदल प्रवासी रोज बघतच आहेत. खाडी मार्गातून काम करताना अनेक अडथळे येतात, पण तरीही त्यावर मात करून काम पुढे सरकत आहे. मात्र जोपर्यंत ५/६व्या मार्गाचे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत लोकल फेºया वाढवण्याचा प्रश्नच येत नाही. ज्या १७७२ फेºया आहेत, त्या वेळेत कशा धावतील, यावरच भर देण्यात येणार आहे. ते कामदेखील २०२० पर्यंत पूर्ण होणार आहे. कल्याण-कसारा मार्गावर तिसºया लाइनचा प्रकल्प प्रगतिपथावर असून तो केंद्राकडून मंजूर झाला आहे. आगामी काळात रेल्वे पादचारी पूलांची नवनिर्मिती, जुन्या पुलांची डागडुजी, एस्केलेटर, स्वच्छतागृह अशा विविध सुविधाही टप्प्याटप्प्याने दिल्या जातील.मुंबापुरीची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या मध्य रेल्वेच्या लोकलचे वेळापत्रक पंधरवड्यापासून विविध तांंत्रिक कारणांनी कोलमडल्याने ठाणे जिल्ह्यातील २० लाख प्रवाशांना त्याचा फटका बसला. आधीच बेरोजगारीचा प्रश्न पेटलेला असताना, लोकलचे वेळापत्रक कोलमडल्याने आहेत त्या नोकºया टिकवण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. चाकरमान्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी लेटमार्क, तसेच संध्याकाळी घरी परतण्यास प्रचंड यातनांना सामोरे जावे लागत असून, विद्यार्थ्यांनाही महाविद्यालयासाठी विलंब होत आहे.विशेषत: ठाणे जिल्ह्यात रेल्वे समांतर रस्त्याची बोंब आहे. जलवाहतुकीचा पर्याय कागदावर असून, बहुतांश रस्ते वाहतूककोंडीत अडकले आहेत. रेल्वे व्यतिरिक्त वाहतुकीचे सर्वच पर्याय खर्चिक आणि वेळखाऊ असल्याने विचित्र कोंडीत आणि कात्रीत अडकलेल्या प्रवाशांना कोणीही वाली नसून, त्यांची अवस्था ना घरका ना घाटका अशी झाली आहे. रोज मरे त्याला कोण रडे, अशी स्थिती प्रवाशांची असून, पावसाळा आला की या समस्यांमध्ये आणखी भर पडते.या दिवसांमध्ये आबालवृद्धांना रेल्वे प्रवासाच्या नावाने अक्षरश: धडकी भरते. पण यंदा मध्य रेल्वे प्रशासनाने लोकल वेळेवर धावावी, पावसाळ्यात रुळांमध्ये पाणी तुंबू नये यासाठी काही पावले उचलली आहेत. रेल्वे प्रवाशांना अखंड सेवा मिळावी, यासाठी रेल्वेने केलेल्या उपाययोजनांची माहिती मध्य रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी डॉ. ए. के. सिंग यांनी ‘लोकमत’ला दिली.

टॅग्स :central railwayमध्य रेल्वे