शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात बुडालो'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
2
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
3
"प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
4
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
5
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
6
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
7
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
8
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?
9
CA Final Result: सीए फायनल परीक्षेत मुकुंद अगिवाल देशात प्रथम; फाऊंडेशन परीक्षेत मुंबईचा नील राजेश शाह तिसरा
10
मलायकासोबत दिसणारा 'तो' कोण? अभिनेत्रीहून १७ वर्ष लहान; प्रचंड श्रीमंत आहे हा 'मिस्ट्री मॅन'!
11
हातावर मेंदी लावून आल्या म्हणून मुलींना चक्क वर्गात बसू देण्यास शाळेचा नकार; मुंबईतील घटना
12
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
13
Robert Kiyosaki Alert: 'लाखो लोक उद्ध्वस्त होतील, एक मोठा विनाश येणार...' ‘या’ दिग्गजाचा भयानक इशारा, सुटण्याचा मार्ग काय?
14
माजी क्रिकेट प्रशिक्षकाची हत्या, हल्लेखोरांनी पत्नी आणि सुनेसमोरच झाडल्या गोळ्या  
15
प्रियकरासमोरच गाडीतून खेचत नेलं, विमानतळाजवळ सामूहिक अत्याचार; पोलिसांकडून आरोपींचा एन्काऊंटर
16
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
17
मेट्रोत पुन्हा तांत्रिक बिघाड; प्रवाशांना गाडीतून उतरवले; कार्यालय सुटण्याच्या वेळीच गोंधळ
18
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
19
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
20
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल

उल्हासनगरात सत्ताबदलाचे संकेत, महापौर शिवसेनेचा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 00:54 IST

राज्यापाठोपाठ उल्हासनगर महानगरपालिकेतही सत्तांतर होण्याचे संकेत मिळत आहेत.

सदानंद नाईक उल्हासनगर : राज्यापाठोपाठ उल्हासनगर महानगरपालिकेतही सत्तांतर होण्याचे संकेत मिळत आहेत. त्यासाठी शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि ओमी टीम एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. २१ नोंव्हेबर रोजी महापौरपदाचा कालावधी संपत असून त्यापूर्वी नवीन महापौरांची निवड होण्याची शक्यता आहे.उल्हासनगर महापालिकेवर पक्षाचा झेंडा फडकवण्यासाठी भाजपने परंपरागत मित्र शिवसेनेला बगल देत ओमी टीमसोबत आघाडी केली. ओमी कलानी टीमचे समर्थक भाजपच्या चिन्हावर पालिका निवडणुकीत उतरले. भाजप व ओमी टीमचे ३२ नगरसेवक निवडून येऊन त्यांनी स्थानिक साई पक्षाच्या मदतीने महापालिकेची सत्ता हस्तगत केली. महापौरपदी भाजपच्या मीना आयलानी विराजमान झाल्या. उपमहापौर व स्थायी समिती सभापतीपद साई पक्षाला दिले, तर ओमी टीमला विविध पदांसाठी सव्वा वर्ष झुलवत ठेवले. अखेर, सव्वा वर्षांनी ओमी टीमच्या, मात्र भाजपच्या चिन्हावर निवडून आलेल्या पंचम कलानी यांना महापौरपद देण्यात आले. दरम्यान, विधानसभा निवडणुकीमुळे महापौरनिवडीला तीन महिन्यांची मुदत दिली असून, ती २१ नोव्हेंबरला संपत आहे.मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देऊनही ओमी टीमच्या महापौर पंचम कलानी यांना विधानसभेची उमेदवारी नाकारली. या प्रकाराने नाराज झालेले ओमी कलानी यांनी ज्योती कलानी यांना पुन्हा राष्ट्रवादी पक्षाच्या चिन्हावर निवडणूक रिंगणात उतरवले. निवडणुकीदरम्यान कलानी कुटुंबाची भाजपने चोहीकडून कोंडी केली, तसेच ओमी समर्थक नगरसेवकांना व्हीप काढून भाजपचे काम करण्यास सांगितले. हे कमी म्हणून की काय, ओमी कलानी टीमच्या अनेक कार्यकर्त्यांवर तडीपारीची कारवाई केली. अखेरच्या दोन दिवसांपूर्वी कलानी कुटुंबाऐवजी कुमार आयलानी यांना पक्षाची उमेदवारी घोषित केली. याप्रकाराने नाराज झालेल्या कलानी कुटुंबाने भाजपने विश्वासघात केल्याचा आरोप केला. कलानीपाठोपाठ साई पक्षाला भगदाड पाडल्याचा आरोप आता शहरातून होत आहे. राज्यातील सत्तांतराचा परिणाम शहरातील राजकारणावर होऊन शिवसेनेचा महापौर होण्याचे संकेत शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिल्याने राजकीय क्षेत्र ढवळून निघाले आहे.>नोव्हेंबरमध्ये महापौरपदाची निवडणूकमहापौरपदाचा कालावधी आॅक्टोबर महिन्यात संपला आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीमुळे महापौरपदाच्या निवडणुकीला तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात येऊन, ती मुदत २१ नोंव्हेबर रोजी संपत आहे. २१ नोंव्हेबरपूर्वी महापौर निवडणूक होण्याची शक्यता असून पालिकेत सत्तांतराचे संकेत शिवसेनेने दिले आहेत.