शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
4
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
5
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
6
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
7
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
8
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
9
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
10
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
11
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
12
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
13
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
14
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
15
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
17
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
18
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
19
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
20
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस

उल्हासनगरात सत्ताबदलाचे संकेत, महापौर शिवसेनेचा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 00:54 IST

राज्यापाठोपाठ उल्हासनगर महानगरपालिकेतही सत्तांतर होण्याचे संकेत मिळत आहेत.

सदानंद नाईक उल्हासनगर : राज्यापाठोपाठ उल्हासनगर महानगरपालिकेतही सत्तांतर होण्याचे संकेत मिळत आहेत. त्यासाठी शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि ओमी टीम एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. २१ नोंव्हेबर रोजी महापौरपदाचा कालावधी संपत असून त्यापूर्वी नवीन महापौरांची निवड होण्याची शक्यता आहे.उल्हासनगर महापालिकेवर पक्षाचा झेंडा फडकवण्यासाठी भाजपने परंपरागत मित्र शिवसेनेला बगल देत ओमी टीमसोबत आघाडी केली. ओमी कलानी टीमचे समर्थक भाजपच्या चिन्हावर पालिका निवडणुकीत उतरले. भाजप व ओमी टीमचे ३२ नगरसेवक निवडून येऊन त्यांनी स्थानिक साई पक्षाच्या मदतीने महापालिकेची सत्ता हस्तगत केली. महापौरपदी भाजपच्या मीना आयलानी विराजमान झाल्या. उपमहापौर व स्थायी समिती सभापतीपद साई पक्षाला दिले, तर ओमी टीमला विविध पदांसाठी सव्वा वर्ष झुलवत ठेवले. अखेर, सव्वा वर्षांनी ओमी टीमच्या, मात्र भाजपच्या चिन्हावर निवडून आलेल्या पंचम कलानी यांना महापौरपद देण्यात आले. दरम्यान, विधानसभा निवडणुकीमुळे महापौरनिवडीला तीन महिन्यांची मुदत दिली असून, ती २१ नोव्हेंबरला संपत आहे.मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देऊनही ओमी टीमच्या महापौर पंचम कलानी यांना विधानसभेची उमेदवारी नाकारली. या प्रकाराने नाराज झालेले ओमी कलानी यांनी ज्योती कलानी यांना पुन्हा राष्ट्रवादी पक्षाच्या चिन्हावर निवडणूक रिंगणात उतरवले. निवडणुकीदरम्यान कलानी कुटुंबाची भाजपने चोहीकडून कोंडी केली, तसेच ओमी समर्थक नगरसेवकांना व्हीप काढून भाजपचे काम करण्यास सांगितले. हे कमी म्हणून की काय, ओमी कलानी टीमच्या अनेक कार्यकर्त्यांवर तडीपारीची कारवाई केली. अखेरच्या दोन दिवसांपूर्वी कलानी कुटुंबाऐवजी कुमार आयलानी यांना पक्षाची उमेदवारी घोषित केली. याप्रकाराने नाराज झालेल्या कलानी कुटुंबाने भाजपने विश्वासघात केल्याचा आरोप केला. कलानीपाठोपाठ साई पक्षाला भगदाड पाडल्याचा आरोप आता शहरातून होत आहे. राज्यातील सत्तांतराचा परिणाम शहरातील राजकारणावर होऊन शिवसेनेचा महापौर होण्याचे संकेत शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिल्याने राजकीय क्षेत्र ढवळून निघाले आहे.>नोव्हेंबरमध्ये महापौरपदाची निवडणूकमहापौरपदाचा कालावधी आॅक्टोबर महिन्यात संपला आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीमुळे महापौरपदाच्या निवडणुकीला तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात येऊन, ती मुदत २१ नोंव्हेबर रोजी संपत आहे. २१ नोंव्हेबरपूर्वी महापौर निवडणूक होण्याची शक्यता असून पालिकेत सत्तांतराचे संकेत शिवसेनेने दिले आहेत.