शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
4
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
5
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
6
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
7
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
8
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
9
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
10
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
11
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
12
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
13
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
14
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
15
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
16
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
17
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
18
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
19
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
20
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा

उल्हासनगरात सत्ताबदलाचे संकेत, महापौर शिवसेनेचा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 00:54 IST

राज्यापाठोपाठ उल्हासनगर महानगरपालिकेतही सत्तांतर होण्याचे संकेत मिळत आहेत.

सदानंद नाईक उल्हासनगर : राज्यापाठोपाठ उल्हासनगर महानगरपालिकेतही सत्तांतर होण्याचे संकेत मिळत आहेत. त्यासाठी शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि ओमी टीम एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. २१ नोंव्हेबर रोजी महापौरपदाचा कालावधी संपत असून त्यापूर्वी नवीन महापौरांची निवड होण्याची शक्यता आहे.उल्हासनगर महापालिकेवर पक्षाचा झेंडा फडकवण्यासाठी भाजपने परंपरागत मित्र शिवसेनेला बगल देत ओमी टीमसोबत आघाडी केली. ओमी कलानी टीमचे समर्थक भाजपच्या चिन्हावर पालिका निवडणुकीत उतरले. भाजप व ओमी टीमचे ३२ नगरसेवक निवडून येऊन त्यांनी स्थानिक साई पक्षाच्या मदतीने महापालिकेची सत्ता हस्तगत केली. महापौरपदी भाजपच्या मीना आयलानी विराजमान झाल्या. उपमहापौर व स्थायी समिती सभापतीपद साई पक्षाला दिले, तर ओमी टीमला विविध पदांसाठी सव्वा वर्ष झुलवत ठेवले. अखेर, सव्वा वर्षांनी ओमी टीमच्या, मात्र भाजपच्या चिन्हावर निवडून आलेल्या पंचम कलानी यांना महापौरपद देण्यात आले. दरम्यान, विधानसभा निवडणुकीमुळे महापौरनिवडीला तीन महिन्यांची मुदत दिली असून, ती २१ नोव्हेंबरला संपत आहे.मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देऊनही ओमी टीमच्या महापौर पंचम कलानी यांना विधानसभेची उमेदवारी नाकारली. या प्रकाराने नाराज झालेले ओमी कलानी यांनी ज्योती कलानी यांना पुन्हा राष्ट्रवादी पक्षाच्या चिन्हावर निवडणूक रिंगणात उतरवले. निवडणुकीदरम्यान कलानी कुटुंबाची भाजपने चोहीकडून कोंडी केली, तसेच ओमी समर्थक नगरसेवकांना व्हीप काढून भाजपचे काम करण्यास सांगितले. हे कमी म्हणून की काय, ओमी कलानी टीमच्या अनेक कार्यकर्त्यांवर तडीपारीची कारवाई केली. अखेरच्या दोन दिवसांपूर्वी कलानी कुटुंबाऐवजी कुमार आयलानी यांना पक्षाची उमेदवारी घोषित केली. याप्रकाराने नाराज झालेल्या कलानी कुटुंबाने भाजपने विश्वासघात केल्याचा आरोप केला. कलानीपाठोपाठ साई पक्षाला भगदाड पाडल्याचा आरोप आता शहरातून होत आहे. राज्यातील सत्तांतराचा परिणाम शहरातील राजकारणावर होऊन शिवसेनेचा महापौर होण्याचे संकेत शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिल्याने राजकीय क्षेत्र ढवळून निघाले आहे.>नोव्हेंबरमध्ये महापौरपदाची निवडणूकमहापौरपदाचा कालावधी आॅक्टोबर महिन्यात संपला आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीमुळे महापौरपदाच्या निवडणुकीला तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात येऊन, ती मुदत २१ नोंव्हेबर रोजी संपत आहे. २१ नोंव्हेबरपूर्वी महापौर निवडणूक होण्याची शक्यता असून पालिकेत सत्तांतराचे संकेत शिवसेनेने दिले आहेत.