शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

वृक्षारोपण, जलसंधारण कार्यासाठी श्रीकांत शिंदे यांचा राज्य शासनाकडून सत्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2018 15:54 IST

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या ध्वजारोहण सोहळ्यानंतर पालकमंत्री एकनाथ शिंदे, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आणि पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला.

ठाणे :  सलग दोन वर्षे लोकसहभागातून, हजारो हातांच्या सहकार्याने १ लाख ६० हजार वृक्षांचे रोपण आणि १० गावांमधील गावतलाव आणि बंधाऱ्यांमध्ये २५ वर्षांपासून साचलेला गाळ काढून पाणीटंचाईवर मात करण्याबरोबरच शेतकऱ्यांना रब्बीच्या हंगामात भाजीपाल्याची लागवड करून त्यांचे जीवनमान सुधारण्याची संधी मिळवून दिल्याबद्दल खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा आज, १५ ऑगस्ट निमित्त राज्य सरकारच्या वतीने सत्कार करण्यात आला. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या ध्वजारोहण सोहळ्यानंतर पालकमंत्री एकनाथ शिंदे, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आणि पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला.

खा. डॉ. शिंदे यांनी गेल्या वर्षी अंबरनाथ तालुक्यातील श्रीमलंगगड परिसरातील मांगरूळ या गावी वनविभागाच्या ८० एकर जागेवर लोकसहभागातून एक लाख वृक्षलागवडीचे महाअभियान राबवले होते. या अभियानात २० हजारहून अधिक लोक आणि विविध संस्था सहभागी झाल्या होत्या. केवळ एक दिवसापुरते अभियान न राबवता या झाडांच्या संगोपनासाठी कायमस्वरुपी व्यवस्था करण्यात आली आहे. टेकडीच्या वरच्या बाजूस पाण्याची टाकी बांधण्यात आली असून झाडांच्या देखभालीसाठी माणसेही नियुक्त केली आहेत. काही महिन्यांपूर्वी समाजकंटकांनी या झाडांना आग लावण्याचा प्रयत्न केला होता. त्यात सुमारे २५ हजार झाडांचे नुकसान झाले होते. ही झाडे पुन्हा लावण्यात आली असून वणवा लागण्याचे प्रकार होऊ नयेत, यासाठी नियमितपणे गवत कापण्याची खबरदारी घेतली जात आहे.

यंदाच्या वर्षी देखिल अंबरनाथ शहरानजीक, जावसई गावी वनविभागाच्या जागेवर लोकसहभागातून ६० हजार झाडे लावण्याचे अभियान राबवण्यात आले. श्रीमलंग गड परिसरातील गावांना वर्षानुवर्षे पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. या गावांमधील तलाव आणि बंधाऱ्यांमधील गाळ २५ वर्षांत काढण्यात आला नव्हता. येथील भौगोलिक परिस्थितीमुळे पाऊस भरपूर पडूनही जमिनीत पाणी मुरत नाही. तीव्र डोंगर उतारामुळे पावसाच्या पाण्यासोबत माती वाहून येऊन तलाव आणि बंधाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ साचून पाणी साठवण्याची क्षमता कमी झाली होती. ही बाब लक्षात घेऊन खा. डॉ. शिंदे यांनी लोकसहभागातून १० गावांमधील तलाव आणि बंधाऱ्यांमधील सुमारे ४० हजार ब्रास गाळ काढला. त्यामुळे या गावांना किमान १० कोटी लीटर अतिरिक्त पाणीसाठा उपलब्ध झाला. एरवी ऑक्टोबरनंतर कोरडे पडणाऱ्या तलावांमध्ये मे अखेरीपर्यंत पाणी राहू लागले. शेतकऱ्यांनाही केवळ भातशेतीवर अवलंबून न राहाता रब्बी हंगामात भाजीपाल्याची लागवड करून उत्पन्न वाढवणे शक्य झाले.

गेली सलग दोन वर्षे खा. डॉ. शिंदे राबवत असलेल्या या उपक्रमांबद्दल राज्य सरकारच्या वतीने त्यांचा १५ ऑगस्ट रोजी सत्कार करण्यात आला. ‘हा सत्कार माझा एकट्याचा नाही. हजारो लोक या सहभागी झाल्यामुळेच हे उपक्रम यशस्वी होऊ शकले. हजारो लोक, संस्था, प्रशासकीय अधिकारी, शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने हा सत्कार स्वीकारत आहे,’ अशी विनम्र भावना खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केली.

टॅग्स :thaneठाणेShrikant Shindeश्रीकांत शिंदे