शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

वृक्षारोपण, जलसंधारण कार्यासाठी श्रीकांत शिंदे यांचा राज्य शासनाकडून सत्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2018 15:54 IST

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या ध्वजारोहण सोहळ्यानंतर पालकमंत्री एकनाथ शिंदे, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आणि पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला.

ठाणे :  सलग दोन वर्षे लोकसहभागातून, हजारो हातांच्या सहकार्याने १ लाख ६० हजार वृक्षांचे रोपण आणि १० गावांमधील गावतलाव आणि बंधाऱ्यांमध्ये २५ वर्षांपासून साचलेला गाळ काढून पाणीटंचाईवर मात करण्याबरोबरच शेतकऱ्यांना रब्बीच्या हंगामात भाजीपाल्याची लागवड करून त्यांचे जीवनमान सुधारण्याची संधी मिळवून दिल्याबद्दल खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा आज, १५ ऑगस्ट निमित्त राज्य सरकारच्या वतीने सत्कार करण्यात आला. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या ध्वजारोहण सोहळ्यानंतर पालकमंत्री एकनाथ शिंदे, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आणि पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला.

खा. डॉ. शिंदे यांनी गेल्या वर्षी अंबरनाथ तालुक्यातील श्रीमलंगगड परिसरातील मांगरूळ या गावी वनविभागाच्या ८० एकर जागेवर लोकसहभागातून एक लाख वृक्षलागवडीचे महाअभियान राबवले होते. या अभियानात २० हजारहून अधिक लोक आणि विविध संस्था सहभागी झाल्या होत्या. केवळ एक दिवसापुरते अभियान न राबवता या झाडांच्या संगोपनासाठी कायमस्वरुपी व्यवस्था करण्यात आली आहे. टेकडीच्या वरच्या बाजूस पाण्याची टाकी बांधण्यात आली असून झाडांच्या देखभालीसाठी माणसेही नियुक्त केली आहेत. काही महिन्यांपूर्वी समाजकंटकांनी या झाडांना आग लावण्याचा प्रयत्न केला होता. त्यात सुमारे २५ हजार झाडांचे नुकसान झाले होते. ही झाडे पुन्हा लावण्यात आली असून वणवा लागण्याचे प्रकार होऊ नयेत, यासाठी नियमितपणे गवत कापण्याची खबरदारी घेतली जात आहे.

यंदाच्या वर्षी देखिल अंबरनाथ शहरानजीक, जावसई गावी वनविभागाच्या जागेवर लोकसहभागातून ६० हजार झाडे लावण्याचे अभियान राबवण्यात आले. श्रीमलंग गड परिसरातील गावांना वर्षानुवर्षे पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. या गावांमधील तलाव आणि बंधाऱ्यांमधील गाळ २५ वर्षांत काढण्यात आला नव्हता. येथील भौगोलिक परिस्थितीमुळे पाऊस भरपूर पडूनही जमिनीत पाणी मुरत नाही. तीव्र डोंगर उतारामुळे पावसाच्या पाण्यासोबत माती वाहून येऊन तलाव आणि बंधाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ साचून पाणी साठवण्याची क्षमता कमी झाली होती. ही बाब लक्षात घेऊन खा. डॉ. शिंदे यांनी लोकसहभागातून १० गावांमधील तलाव आणि बंधाऱ्यांमधील सुमारे ४० हजार ब्रास गाळ काढला. त्यामुळे या गावांना किमान १० कोटी लीटर अतिरिक्त पाणीसाठा उपलब्ध झाला. एरवी ऑक्टोबरनंतर कोरडे पडणाऱ्या तलावांमध्ये मे अखेरीपर्यंत पाणी राहू लागले. शेतकऱ्यांनाही केवळ भातशेतीवर अवलंबून न राहाता रब्बी हंगामात भाजीपाल्याची लागवड करून उत्पन्न वाढवणे शक्य झाले.

गेली सलग दोन वर्षे खा. डॉ. शिंदे राबवत असलेल्या या उपक्रमांबद्दल राज्य सरकारच्या वतीने त्यांचा १५ ऑगस्ट रोजी सत्कार करण्यात आला. ‘हा सत्कार माझा एकट्याचा नाही. हजारो लोक या सहभागी झाल्यामुळेच हे उपक्रम यशस्वी होऊ शकले. हजारो लोक, संस्था, प्रशासकीय अधिकारी, शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने हा सत्कार स्वीकारत आहे,’ अशी विनम्र भावना खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केली.

टॅग्स :thaneठाणेShrikant Shindeश्रीकांत शिंदे