शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

व्यवसायाचा ‘श्रीगणेशा’, मुख्य बाजारपेठ चार महिन्यांनंतर गजबजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2020 12:25 AM

पोलीस आणि महापालिकेकडून मार्केट परिसरातही नागरिकांनी गर्दी करूनये, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे, अशा घोषणा दिल्या जात होत्या.

ठाणे : ठाणे महापालिकेने चार महिन्यांनंतर शनिवारपासून शहरातील मुख्य बाजारपेठेतील रस्त्याच्या दोन्ही बाजूंकडील दुकाने दिवसभर उघडण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे शनिवारी दुकाने उघडताच नागरिकांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खरेदीसाठी गर्दी केल्याने मुख्य बाजारपेठ गजबजल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला. मात्र, पोलीस आणि महापालिकेकडून मार्केट परिसरातही नागरिकांनी गर्दी करूनये, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे, अशा घोषणा दिल्या जात होत्या.कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे शहरातील मुख्य बाजारपेठ तसेच इतर ठिकाणचे मार्केटही बंद होते. अनलॉक जाहीर झाल्यानंतर सम आणि विषम तारखांनुसार दुकाने उघडली जात होती. परंतु, मुंबईत ५ आॅगस्टपासून रस्त्याच्या दोन्ही बाजूंकडील दुकाने उघडण्यास परवानगी दिल्यानंतर ठाणे शहरातही अशा पद्धतीने दुकाने उघडण्यास मुभा द्यावी, अशी मागणी व्यापाऱ्यांनी महापालिकेकडे लावून धरली होती. त्यानुसार, दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत महापालिका मुख्यालयात झालेल्या बैठकीत दुकाने उघडण्याबाबत एकमत झाले. त्यानुसार, शनिवारपासून सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत दुकाने खुली झाली आहेत.दरम्यान, आठवडाभरावर गणेशोत्सव आल्याने बाजारपेठ खुली होताच शनिवारी सकाळपासून नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली. दुकानदारांकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन केले जात होते.प्रत्येक ग्राहकास सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक केले होते. परंतु, नागरिकांनी जास्त गर्दी करूनये, यासाठी पोलीस आणि ठाणे महापालिकेकडून खरबदारीच्या सूचना दिल्या जात होत्या.>पालकमंत्र्यांनी दिल्या सूचनाशहरातील सर्वच मार्केट तसेच गर्दीच्या ठिकाणी गर्दी होऊ नये तसेच मास्कचा वापर करावा, यासाठी जाहीर घोषणा करण्याच्या सूचना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या.त्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तडॉ. विपिन शर्मा यांनी मनपा हद्दीत सर्व प्रभाग समितीअंतर्गत जाहीर घोषणा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.त्यानुसार, शनिवारपासून मनपाच्या सर्व प्रभाग समित्यांतर्गत जाहीर घोषणा देण्याची कार्यवाही सुरू झाली. सकाळी आणि दुपारनंतर सायंकाळपर्यंत दोन सत्रांत जाहीर घोषणा करण्यात येणार आहेत.