शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

पुरावा मागितल्यास संविधानाची प्रत दाखवा- जितेंद्र आव्हाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2020 01:50 IST

‘शाहीन बाग अ‍ॅट कल्याण’च्या आंदोलकांची घेतली भेट

कल्याण : आपल्या घरी प्रत्येकाने भारतीय संविधानाची प्रत ठेवावी. तुमच्याकडे सरकारी यंत्रणा काही कागदपत्रे वा पुरावा मागायला आल्या, तर त्यांना संविधानाची प्रत दाखवा, असे आवाहन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शनिवारी येथे केले.

दिल्लीत नागरिकत्व सुधारणा कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी शाहीन बागेत आंदोलन सुरू आहे. त्या धर्तीवर कल्याण पश्चिमेतील गोविंदवाडी परिसरात महापालिकेच्या मैदानात ‘शाहीन बाग अ‍ॅट कल्याण’ आंदोलन २२ जानेवारीपासून सुरू आहे. शनिवारी आव्हाड यांनी येथे भेट दिली. सामाजिक कार्यकर्ते शरफुद्दीन, अपक्ष नगरसेवक काशीफ तानकी राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक जव्वाद डोण यांच्या उपस्थितीत ‘हम भारत के लोग’ फोरमतर्फे सुरू असलेल्या आंदोलनात महिला-पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘सीएए’च्या विरोधात महिला व मुले रस्त्यावर उतरली आहेत. ज्यावेळी एखाद्या आंदोलनाचे नेतृत्व महिला आणि मुले करतात, तेव्हा ते आंदोलन योग्य दिशेने सुरू असल्याचे आव्हाड म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे या कायद्याच्या निमित्ताने हिंदू-मुस्लिम धर्मात एक भिंत निर्माण करत आहेत. ती तोडण्यासाठी ही आंदोलने होत आहेत.

आसाममध्ये हा कायदा लागू केला, तेव्हा १९ लाख लोकांना पकडले. त्यात १४ लाख हिंदू होते, जे आजही तेथील तुरुंगात पडून आहेत. त्यांच्या मुक्तीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आतापर्यंत चकार शब्दही काढला नसल्याची टीका त्यांनी केली.

नियम बाजूला ठेवून ध्वनिक्षेपकाचा वापर

शाहीन बाग अ‍ॅट कल्याण या आंदोलनास्थळी आव्हाड वेळेत पोहोचू शकले नाहीत. रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिप्रक्षेपक जाहीर कार्यक्रमात सुरू ठेवण्याची परवानगी असते. तसे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत; मात्र विक्रोळी आणि मुंब्रा येथील कार्यक्रम आटोपून आव्हाड यांना कल्याणला पोहोचण्यासाठी रात्री ११.१५ वाजले. ११ वाजून २९ मिनिटांनी त्यांनी भाषणाला सुरुवात केली. त्यांचे भाषण ११ वाजून ५४ मिनिटांनी संपले. यावेळी नियम बाजूला ठेवून ध्वनिप्रक्षेपकाचा वापर करण्यात आला.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडthaneठाणेcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकNational Register of Citizensराष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडी