शहरं
Join us  
Trending Stories
1
Nepal Plane Fire: नेपाळमध्ये काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! लँडिंग दरम्यान विमानाच्या टायरला आग; २८९ प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले
2
Keralam CM: केरळचे मुख्यमंत्रिपद कोणाला मिळणार, महाराष्ट्राचे प्रभारी चेन्निथलांसह तीन नेत्यांच्या नावांची चर्चा
3
हंटाव्हायरसच्या विळख्यात सापडलेले जहाज अखेर स्पेनमध्ये पोहोचले, युद्धपातळीवर मोहीम
4
'वंदे मातरम्' : मुख्यमंत्री विजय यांच्या चालीने भाजप बॅकफूटवर; बंगालमध्ये भाजपकडून उच्चार नाही
5
SBI च्या गुंतवणूकदारांना ₹४४,७२२ कोटींचं नुकसान, 'या' कंपन्यांमध्ये पैसा गुंतवणारे झाले मालामाल
6
शेतकऱ्याच्या कांद्याला मिळतात ५० पैसे, ग्राहक मोजतो २५ रुपये; उत्पादन खर्चही निघेना, शेतकऱ्यांचा आक्रोश
7
छत्रपती संभाजीनगर: विहीर ढासळून बापासह दोन मुलांचा मृत्यू, पत्नीने फोडला टाहो; सहा तासांनंतर मृतदेह काढले बाहेर
8
आजचे राशीभविष्य - ११ मे २०२६, कार्यसिद्धीचा दिवस, सामाजिक मान-सन्मान होतील
9
तीन वेळा कार बदलून रुपाली चाकणकर चौकशीला हजर, अशोक खरातप्रकरणी एसआयटीने केली प्रश्नांची सरबत्ती
10
"जगात कोणत्याही देशात कॅश करता येणार प्रॉपर्टी कार्ड; सरकारचा विचार; महाराष्ट्रात लवकरच 'लँड टायटलिंग अ‍ॅक्ट" 
11
'तामिळनाडूत नव्या युगाचा आरंभ'; विजय यांच्याकडून धडाकेबाज निर्णय; तरुण कीर्तनांनी वेधले लक्ष
12
अग्रलेख: मराठीचा अभिमान की आभास? मातृभाषेवरील हे सावट दूर करता येईल
13
Iran US War Update: युद्धविराम मोठ्या संकटात ! मालवाहू जहाजाला आग, कुवेतवर ड्रोन हल्ला
14
विशेष लेख: अमित शाह यांच्या खेळीने ममता बॅनर्जी चारीमुंड्या चीत
15
तामिळनाडू 'विजय'पथावर! मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच जनतेला दिले मोफत विजेचे गिफ्ट
16
सोनेखरेदी टाळा, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, 'वर्क फ्रॉम होम' सुरू करा; पंतप्रधान मोदींचे भारतीयांना आवाहन
17
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
18
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
19
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
20
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
Daily Top 2Weekly Top 5

कंटेनमेंट झोनबाहेरील दुकाने ५ जूनपासून होणार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 00:07 IST

केडीएमसी हद्दीत मुभा : सम-विषम तारखेचा नियम

लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : केडीएमसी हद्दीतील कंटेनमेंट झोनबाहेरील दुकाने ५ जूनपासून सम-विषम तारखेनुसार सकाळी ९ ते सायंकाळी ५ दरम्यान सुरू करण्यास मुभा दिली जाणार आहे. मात्र, मॉल व शॉपिंग कॉम्प्लेक्स सुरू करता येणार नाही. दुकाने सुरू करण्यासाठी दुकानदारांना पोलीस व महापालिका प्रभाग अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागेल. दुकानदारांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन न केल्यास त्यांची परवानगी रद्द करण्यात येईल, असे केडीएमसीने स्पष्ट केले आहे.


पावसाळा तोंडावर आल्याने नागरिकांना पावसाळी चपला, छत्री, ताडपत्री, कपड्यांची खरेदी करायची आहे. ५ जूनपासून दुकाने सुरू होणार असल्याने त्यांना दिलासा मिळणार आहे. मात्र, कपड्यांच्या दुकानात ग्राहकांना कपड्यांची ट्रायल घेता येणार नाही. ग्राहकांनी खरेदीसाठी जाताना पायी अथवा सायकलद्वारे जावे. त्यासाठी दुचाकी, चारचाकी वाहने वापरू नयेत. ग्राहकांसाठी जमिनीवर मार्किंग करणे, टोकन पद्धतीचा अवलंब करणे बंधनकारक असेल. कंटेनमेंट झोनबाहेरही केशकर्तनालये, स्पा आणि व्यायाम शाळा सुरू करता येणार नाहीत.


नागरिकांना व्यायाम, खेळ, कसरतींसाठी सकाळी ५ ते सायंकाळी ७ या वेळेत मुभा आहे. मात्र, दूरवरच्या मैदानात कसरत, व्यायाम व खेळाचा सराव करता येणार नाही. गाडीच्या दुरुस्तीसाठी गॅरेज व वर्कशॉपची अगोदर अपॉइंटमेंट घ्यावी लागणार आहे. प्लंबर, इलेक्ट्रीशयन, पेस्ट कंट्रोल करणाऱ्यांना नियम पाळून काम करता येईल. अत्यावश्यक सेवेसाठी रिक्षा व टॅक्सींचा वापर करता येऊ शकतो. मात्र, चालक व दोन प्रवाशांनाच प्रवास करता येणार आहे. सर्व खाजगी कार्यालये १० टक्के कर्मचाºयांच्या उपस्थितीत सुरू करता येतील. घरपोच सेवा देणारी हॉटेल्स सुरू करता येतील. ज्या बांधकाम व्यावसायिकांना लॉकडाउनपूर्वी बांधकाम परवानगी दिली आहे, त्यांनी बाहेरचे मजूर न घेता त्यांचा बांधकाम व्यवसाय सुरू करता येईल. बुधवारपासून त्यासाठी परवानगी दिली जाईल.

कंटेनमेंट झोनमध्ये काय असेल?
कंटेनमेंट झोनमधील अत्यावश्यक दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत सुरू राहतील. मात्र, दुकानदारांना काउंरटवर विक्री न करता ग्राहकांना घरपोच सेवा द्यावी लागेल. ज्या घरात अथवा इमारतीत कोरोना रुग्ण आढळला असेल, त्या ठिकाणापासून १०० मीटरच्या अंतरात कंटेनमेंट झोन असेल.


विवाह, अंत्यविधीसाठीही नियम निश्चित
विवाह सोहळ्यास ५० व्यक्तींनाच तर, अंत्यविधीला २० पेक्षा कमी व्यक्तींना उपस्थित राहता येणार आहे. कारखान्यांतून व दुकानांतून कामगार सोडताना एकाच वेळी सोडून गर्दी होणार नाही, याची काळजी आस्थापनांना घ्यावी लागणार आहे. ६५ वर्षांवरील व्यक्ती व १० वर्षांखालील मुलांना वैद्यकीय कारणाव्यतिरिक्त घराबाहेर पडण्यास मनाई आहे.