शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

मालमत्ताकरमाफीवरून शिवसेना कोंडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 00:03 IST

मित्रपक्ष भाजपासह विरोधकांचा प्रहार; प्रशासनाचे कायद्यावर बोट

ठाणे : मुंबईत ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ताकरात सवलत देण्याचा निर्णय राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. परंतु, ठाणेकरांच्या तोंडाला मात्र सत्ताधारी शिवसेनेने पानेच पुसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता भाजपासह विरोधकांकडून ऐन लोकसभा निवडणुकीत शिवसेनेची चांगलीच कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.ठाण्यातील सत्ताधाऱ्यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठाणेकरांना दिलेला शब्द पूर्ण करता आला नाही, अशी टीका भाजपने केली आहे. तर दुसरीकडे मालमत्ताकर माफीची तरतूद कायद्यात नव्हती, ही माहिती सत्ताधाऱ्यांना माहित नव्हती का ?असा प्रश्न उपस्थित करून शिवसेनेचा हा केवळ चुनावी जुमला होता अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. शिवसेनेने मात्र सावध भूमिका घेऊन प्रशासकीय पातळीवर या प्रस्तावाचे काय झाले याची माहिती घेतली जाईल, असे सांगूत यावर पांघरून घालण्याचेच प्रयत्न केले आहेत.२०१७ मध्ये झालेल्या पालिकांच्या निवडणुका लढविताना मुंबई आणि ठाण्यातील ५०० चौरस फुटांच्या घरांना मालमत्ताकरमाफी आणि ७०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना करात सवलत देण्याची घोषणा खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली होती. शिवसेनेच्या वचननाम्यात तसा उल्लेखही आहे. मुंबई महापालिकेत या करमाफीचा प्रस्ताव मंजूर केल्यानंतर आयुक्तांनी तो राज्य सरकारच्या अंतिम मंजुरीसाठी धाडला होता. ठाणे महापालिकेत सत्ताधारी शिवसेनेवर कुरघोडी करण्यासाठी विरोधकांनीच या करमाफीचे प्रस्ताव सभागृहात दाखल केले होते. त्यावर पालिका प्रशासनाने उचित कारवाई करावी, असा ठराव सभागृहात केला. मात्र, प्रशासनाने त्यावर कोणतीही हालचाल केली नाही. राज्य सरकारकडून एका पत्रान्वये या करमाफीबाबतची विचारणा केली होती. त्यावर पालिकेच्या अधिनियमात अशी करसवलत देण्याची तरतूद नसल्याचे पालिका प्रशासनाने राज्य सरकारला कळविले आहे.लोकसभेची आचारसंहिता जाहीर होण्यास अवघे काही दिवस शिल्लक असताना शुक्र वारी राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत मुंबईतील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना करमाफी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, त्यात ठाणे शहराबाबत कोणताही उल्लेख नसल्याने ठाणेकरांना ती मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण ठामपाच्या तिजोरीवर शंभर कोटींचा बोजा पडेल असा अंदाज आहे.करमाफीचा जो प्रस्ताव सभागृहात मांडला गेला होता त्याची माहिती सरकारला दिली आहे. मात्र, अशी कोणत्याही प्रकारची तरदूत कायद्यात नाही, असे कर विभागाचे उपायुक्त ओमप्रकाश दिवटे म्हणाले.शिवसेने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी करमाफीचा दिलेला शब्द ठाण्यातील सत्ताधाऱ्यांना पूर्ण करता आलेला नाही. त्यामुळे ठाणेकरांची ही निव्वळ फसवणूक झालेली आहे. केवळ निवडणुकांपुरते ठाणेकरांना हे आश्वासन देण्यात आले होते. मी स्वत: करमाफीचा प्रस्ताव सभागृहात मांडला होता. मात्र, त्यावर काहीही हालचाल झालेली नाही. याबाबत पुन्हा एकदा स्मरणपत्र देण्यात येणार आहे.- कृष्णा पाटील,नगरसेवक - भाजपाकरमाफीची कायद्यात तरतूद नव्हती तर सत्ताधाºयांनी याची घोषणा केलीच कशी? कारमाफीची घोषणा ही केवळ चुनावी जुमला होता. त्याच्यापलीकडे शिवसेनेने काहीही केले नाही .- मिलिंद पाटील,विरोधी पक्षनेतेकरमाफीच्या प्रस्तावावर प्रशासकीय पातळीवर काय हालचाली झाल्या आहेत त्याची माहिती घेण्यात येईल. त्यानंतरच यावर भाष्य करता येईल. मात्र, करमाफी व्हावी ही शिवसेनेची कायम भूमिका आहे आणि तीच राहणार आहे.- मीनाक्षी शिंदे, महापौर, ठा. म. पा.करमाफीची घोषणा जरी शिवसेनेने केली असली तरी ठाण्यातील सत्ताधाºयांकडून सभागृहात करमाफीचा कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव आणण्यात आला नाही. उलट विरोधी पक्ष असताना मी स्वत: कर माफीचा प्रस्ताव सभागृहात आणला होता. त्याला सभागृहात मंजुरी देखील मिळाली आहे. मात्र, शिवसेना पक्षाने प्रशासकीय पातळीवर कोणत्याच प्रकारचे प्रयत्न केले नाहीत.- हणमंत जगदाळे, गटनेते, राष्ट्रवादी काँग्रेस , ठा.म.पा.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाShiv Senaशिवसेना