शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
7
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
8
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
9
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
10
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
11
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
12
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
13
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
14
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
15
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
16
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
17
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
18
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
19
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

ठाण्यात शिवसेना-राष्ट्रवादीची सत्ता, जिल्हा परिषद निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 03:25 IST

राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेत शिवसेनेने ठाणे जिल्हा परिषद ताब्यात घेतली आहे. भाजपाला १४ जागांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीमुळे जिल्ह्याच्या राजकारणात वेगळी समीकरणे उदयाला आली आहेत.

ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेत शिवसेनेने ठाणे जिल्हा परिषद ताब्यात घेतली आहे. भाजपाला १४ जागांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीमुळे जिल्ह्याच्या राजकारणात वेगळी समीकरणे उदयाला आली आहेत.मागील निवडणुकीवेळी ६६ जागा असलेल्या जिल्हा परिषदेत पालघर जिल्हा निर्मितीमुळे सदस्यसंख्या ५३ झाली आहे. या जिल्हा परिषदेसोबतच भिवंडी, शहापूर, मुरबाड, कल्याण आणि अंबरनाथ या पंचायत समित्यांच्या एकूण १०६ जागांची निवडणूकही पार पडली. पाच पंचायत समित्यांपैकी फक्त मुरबाडची भाजपाच्या हाती पडली आहे. उरलेल्या भिवंडी, शहापूर, कल्याण आणि अंबरनाथ पंचायत समित्यांवर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांची सत्ता असेल.समृद्धी महामार्गासह ठाणे जिल्ह्यातून जाणाºया वेगवेगळ्या प्रकल्पांना ग्रामीण भागातून विरोध आहे. त्यातही शेतजमिनी देण्याविरोधात आंदोलनही झाले होते. त्यामुळे दीड वर्षाने होणाºया विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकºयांचा कौल समजून घेण्याच्या दृष्टीने ही निवडणूक महत्त्वाची होती. त्यामुळेच भाजपाने ती प्रतिष्ठेची केली. त्याविरोधात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले. त्यांना काँग्रेस, मनसे, कुणबी सेना, रिपब्लिकन पक्ष सेक्युलर यांनी साथ दिली. परिणामी, गावागावानुसार व गटा-गणानुसार लढतीचे स्वरूप बदलले. त्याला मतदार कसा प्रतिसाद देतात हा प्रश्न होता. पण हे राजकीय समीकरण मतदारांनी स्वीकारल्याचे त्यांनी दिलेल्या कौलातून समोर आले.पक्षीय बलाबलठाणे जिल्हा परिषदएकूण जागा - ५३शिवसेना - २६राष्ट्रवादी - १०भाजपा - १४काँग्रेस - १ (बिनविरोध)अपक्ष - १एका जागेची मतमोजणी स्थगितपंचायतसमितीएकूण जागा - १०६शिवसेना - ४७राष्ट्रवादी - १६भाजपा - ३७काँग्रेस - २मनसे - १रिपब्लिकन पक्ष -१दोन गणांची मतमोजणी स्थगित

टॅग्स :thaneठाणे