शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

शिवसेना मीरा- भाईंदर विधानसभा विभागप्रमुखांचा राष्ट्रवादीत प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2019 19:52 IST

शिवसेनेचे मीरा भाईंदर विधानसभा क्षेत्र प्रमुख तथा माजी उपनगराध्यक्ष अरुण कदम यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला आहे.

मीरारोड - शिवसेनेचे मीरा भाईंदर विधानसभा क्षेत्र प्रमुख तथा माजी उपनगराध्यक्ष अरुण कदम यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला आहे. स्थानिक नागरी समस्यांवर आवाज उठवण्याची जबाबदारी न मिळाल्याने राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे सांगत कदम यांनी सेनेच्या काही स्थानिक पदाधिकारायांवर निशाणा साधला आहे. सेनेचे मीरा भाईंदर जिल्हाप्रमुख पद न मिळाल्याने कदम नाराज होते. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसे असा अरुण कदम यांचा राजकीय प्रवास राहिला असुन त्यांच्या पत्नी शिवसेनेच्या नगरसेविका आहे.मीरा भाईंदर मध्ये एकाकाळी सत्तेत असणारी तसेच खासदार, आमदार देणाराया राष्ट्रवादी काँग्रेसची शहरात पुरती वाताहत झाली आहे. स्थानिक पातळीवर जनतेसह राजकारण व प्रशासनावर प्रभाव टाकु असेल असा चेहरा व नेतृत्व राष्ट्रवादीत नाही. त्यातच कदम यांनी राष्ट्रवादीचे नेते तथा आमदार जितेंद्र आव्हाड यांची संतोष धुवाळींसह भेट घेऊन राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. कदम यांच्या रुपाने शहरात एक नेतृत्व मिळाले असा विश्वास राष्ट्रवादीच्या स्थानिकांकडुन केला जात आहे.राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापने नंतर कदम यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. आधी ते काँग्रेससह विरारचे आमदार हितेंद्र ठाकुर सोबत असायचे. नगरपालिका असताना ते उपनगराध्यक्ष झाले. महापालिका झाल्यानंतर ते शिवसेनेत गेले होते. पण त्यावेळी संपर्क प्रमुख असेलेले विनोद घोसाळकर आणि स्थानिक पदाधिकारी प्रभाकर म्हात्रे यांच्याशी नेतृत्वावरुन खटके उडाल्याने त्यांनी मनसेच्या स्थापने नंतर मनसेत प्रवेश केला. २००७ च्या पालिका निवडणुकीत मनसेचे चार नगरसेवक निवडुन आले व कदम यांना देखील स्विकृत नगरसेवक पद मिळाले.

मनसेत तत्कालिन स्थानिक प्रमुखाxसोबत देखील न जमल्याने मनसे सोडुन कदम पुन्हा शिवसेनेत गेले. कदम यांच्यावर मीरा भाईंदर विधानसभा मतदार संघाचे क्षेत्र प्रमुख म्हणुन जबाबदारी देण्यात आली. सेनेच्या स्थानिक प्रमुख नेत्यां पैकी कदम मानले जात होते. सेना नेते रामदास कदम यांचे निकवर्तिय मानल्या जाणाराया अरुण कदम यांना सेनेचे मीरा भाईंदर जिल्हा प्रमुख पद मिळेल असे अपेक्षित होते. परंतु ते पद प्रभाकर म्हात्रे यांच्या पारड्यात पडल्याने कदम नाराज होते.२०१७ साली झालेल्या पालिका निवडणुकीत कदम यांच्या पत्नी अर्चना भाईंदर पुर्व भागातुन शिवसेनेच्या नगरसेविका म्हणुन निवडुन आल्या आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी सेनेचे प्रताप सरनाईक यांच्या विजयासाठी काम करतानाच मीरा भाईंदर मतदार संघात भाजपाचे नरेंद्र मेहता यांना धोबीपछाड देण्यासाठी अपक्ष उमेदवार गीता जैन यांचा उघड प्रचार केला होता.परंतु शिवसेनेतील स्थानिक पातळीवरील प्रोटोकॉल आणि शहरातील नागरी समस्यांवर तसेच पालिकेतील गैरप्रकारांवर आक्रमकपणे लढण्यासाठी अडचन जाणवत होती. त्यामुळेच आपण पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. पक्षा कडुन जी जबाबदारी मिळेल त्या नुसार काम करु असे सांगतानाच स्थानिक शिवसेना, काँग्रेस नेतृत्व व कार्यकर्त्यांशी आपले चांगले संबध आजही कायम आहेत असे ते म्हणाले.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv SenaशिवसेनाJitendra Awhadजितेंद्र आव्हाडMira Bhayanderमीरा-भाईंदर