शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

शिवसेना मीरा- भाईंदर विधानसभा विभागप्रमुखांचा राष्ट्रवादीत प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2019 19:52 IST

शिवसेनेचे मीरा भाईंदर विधानसभा क्षेत्र प्रमुख तथा माजी उपनगराध्यक्ष अरुण कदम यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला आहे.

मीरारोड - शिवसेनेचे मीरा भाईंदर विधानसभा क्षेत्र प्रमुख तथा माजी उपनगराध्यक्ष अरुण कदम यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला आहे. स्थानिक नागरी समस्यांवर आवाज उठवण्याची जबाबदारी न मिळाल्याने राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे सांगत कदम यांनी सेनेच्या काही स्थानिक पदाधिकारायांवर निशाणा साधला आहे. सेनेचे मीरा भाईंदर जिल्हाप्रमुख पद न मिळाल्याने कदम नाराज होते. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसे असा अरुण कदम यांचा राजकीय प्रवास राहिला असुन त्यांच्या पत्नी शिवसेनेच्या नगरसेविका आहे.मीरा भाईंदर मध्ये एकाकाळी सत्तेत असणारी तसेच खासदार, आमदार देणाराया राष्ट्रवादी काँग्रेसची शहरात पुरती वाताहत झाली आहे. स्थानिक पातळीवर जनतेसह राजकारण व प्रशासनावर प्रभाव टाकु असेल असा चेहरा व नेतृत्व राष्ट्रवादीत नाही. त्यातच कदम यांनी राष्ट्रवादीचे नेते तथा आमदार जितेंद्र आव्हाड यांची संतोष धुवाळींसह भेट घेऊन राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. कदम यांच्या रुपाने शहरात एक नेतृत्व मिळाले असा विश्वास राष्ट्रवादीच्या स्थानिकांकडुन केला जात आहे.राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापने नंतर कदम यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. आधी ते काँग्रेससह विरारचे आमदार हितेंद्र ठाकुर सोबत असायचे. नगरपालिका असताना ते उपनगराध्यक्ष झाले. महापालिका झाल्यानंतर ते शिवसेनेत गेले होते. पण त्यावेळी संपर्क प्रमुख असेलेले विनोद घोसाळकर आणि स्थानिक पदाधिकारी प्रभाकर म्हात्रे यांच्याशी नेतृत्वावरुन खटके उडाल्याने त्यांनी मनसेच्या स्थापने नंतर मनसेत प्रवेश केला. २००७ च्या पालिका निवडणुकीत मनसेचे चार नगरसेवक निवडुन आले व कदम यांना देखील स्विकृत नगरसेवक पद मिळाले.

मनसेत तत्कालिन स्थानिक प्रमुखाxसोबत देखील न जमल्याने मनसे सोडुन कदम पुन्हा शिवसेनेत गेले. कदम यांच्यावर मीरा भाईंदर विधानसभा मतदार संघाचे क्षेत्र प्रमुख म्हणुन जबाबदारी देण्यात आली. सेनेच्या स्थानिक प्रमुख नेत्यां पैकी कदम मानले जात होते. सेना नेते रामदास कदम यांचे निकवर्तिय मानल्या जाणाराया अरुण कदम यांना सेनेचे मीरा भाईंदर जिल्हा प्रमुख पद मिळेल असे अपेक्षित होते. परंतु ते पद प्रभाकर म्हात्रे यांच्या पारड्यात पडल्याने कदम नाराज होते.२०१७ साली झालेल्या पालिका निवडणुकीत कदम यांच्या पत्नी अर्चना भाईंदर पुर्व भागातुन शिवसेनेच्या नगरसेविका म्हणुन निवडुन आल्या आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी सेनेचे प्रताप सरनाईक यांच्या विजयासाठी काम करतानाच मीरा भाईंदर मतदार संघात भाजपाचे नरेंद्र मेहता यांना धोबीपछाड देण्यासाठी अपक्ष उमेदवार गीता जैन यांचा उघड प्रचार केला होता.परंतु शिवसेनेतील स्थानिक पातळीवरील प्रोटोकॉल आणि शहरातील नागरी समस्यांवर तसेच पालिकेतील गैरप्रकारांवर आक्रमकपणे लढण्यासाठी अडचन जाणवत होती. त्यामुळेच आपण पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. पक्षा कडुन जी जबाबदारी मिळेल त्या नुसार काम करु असे सांगतानाच स्थानिक शिवसेना, काँग्रेस नेतृत्व व कार्यकर्त्यांशी आपले चांगले संबध आजही कायम आहेत असे ते म्हणाले.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv SenaशिवसेनाJitendra Awhadजितेंद्र आव्हाडMira Bhayanderमीरा-भाईंदर