शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

शिवसेनेनं दिली भाजपाला साथ, आगामी सेना-भाजपा युतीचे मिळाले संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2019 4:11 AM

भाजपाच्या मंडळींनी आपल्या दोन उमेदवारांना अतिरिक्त मते वाटल्याने तिसरा उमेदवार धापा टाकत ९६ मतांवर अडकला. मनसेच्या उमेदवारालाही तेवढीच मते पडली.

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहन समितीच्या निवडणुकीत शिवसेनेने भाजपाच्या तिसऱ्या उमेदवाराला दिलेला हात भविष्यातील लोकसभा, विधानसभा निवडणुका लक्षात घेता अपेक्षित होता. भाजपाचे दिनेश गोर यांना विजयी करण्याकरिता शिवसेनेबरोबर एमआयएम पक्षाची मते घ्यावी लागली. गुजराती समाजाला आपलेसे करण्यासाठी आणि युतीचा धर्म पाळण्यासाठी शिवसेनेने स्वत:हून एक पाऊल पुढे टाकत भाजपाच्या गुजराती समाजाच्या सदस्याच्या पारड्यात महापौरांचे निर्णायक मत टाकले. त्यामुळे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भाजपाला खिंडीत पकडण्याची कोणतीही संधी सोडत नसतांना पालकमंत्री एकनाथ शिंदे व राज्यमंत्री रवींद्र चव्हाण हे मात्र हातात हात घालून महापालिकेचे राजकारण करीत आहेत.

भाजपाच्या मंडळींनी आपल्या दोन उमेदवारांना अतिरिक्त मते वाटल्याने तिसरा उमेदवार धापा टाकत ९६ मतांवर अडकला. मनसेच्या उमेदवारालाही तेवढीच मते पडली. हातातोंडाशी आलेला घास शिवसेनेने टाळी दिली तर पोटात जाणार होता. मात्र सेनेनी भाजपासोबत युतीची पोळी पिकवल्याने मनसेचा उमेदवार पराभूत झाला. भाजपाच्या दिनेश गौर आणि मनसेचे मिलिंद म्हात्रे या दोघांना प्रत्येकी ९६ मते पडल्याने शिवसेनेच्या महापौर विनीता राणे यांची खरी कसोटी होती. त्यांनी (अर्थातच ‘पती विश्वनाथ राणे’ आणि ‘पक्षश्रेष्ठीं’च्या आदेशांनुसार) युतीधर्म पाळत भाजपाच्या पारड्यात निर्णायक मत टाकले.

पक्षीय बलाबलानुसार शिवसेनेचे महापालिकेत ५५ सदस्य आहेत. त्यामुळे परिवहन समितीवर त्यांचे तीन सदस्य सहज निवडून जाणारच होते आणि ते गेलेही. भाजपाचे संख्याबळ ४७ असतांनाही राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या आग्रहाखातर तीन सदस्य रिंगणात उतरवले. राज्यमंत्र्यांनी गौर हा गुजराती समाजाचा आपला अत्यंत विश्वासू कार्यकर्ता तिसरा उमेदवार म्हणून दिला होता. यामुळे या निवडणुकीत पहिल्या दिवसापासून चुरस निर्माण झाली होती.लोकसभा, विधानसभा निवडणुका तोंडावर असल्याने आणि युतीची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याने निवडणुकीचा निकाल अपेक्षित असाच लागला. शिवसेनेने भाजपाला साथ दिली. मराठमोळ््या डोंबिवलीमध्ये जैन, गुजराती समाजाचे प्राबल्य वाढलेले आहे. त्यासाठी दोन्ही पक्षांनी नमो रमो दांडिया, रासरंग भरवून हे समाज जोडून ठेवले आहेत. कल्याण लोकसभा मतदारसंघातून डॉ. श्रीकांत शिंदे पुन्हा निवडणूक लढवतील हे बहुतांश नक्की आहे. त्यामुळे युती झाली तर त्यांना भाजपाची व भाजपाशी जोडलेल्या वेगवेगळ््या जाती-धर्मांच्या समूहाची साथ लागणार हे उघड आहे. त्यामुळे शिंदे-चव्हाण यांनी युतीचा धर्म पाळला हे उघड आहे.परिवहनसाठी ‘कधीपण, काहीपण’ करण्याची मानसिकता असलेल्या नेत्यांना काहीही पावले उचलू नका, असे भविष्यवेधी संकेत शिंदे यांनी दिले होते. शिंदे हे मुरब्बी आणि चाणाक्ष राजकारणी असल्याची अनुभूती पुन्हा पदाधिकाºयांना आली. राज्यमंत्री चव्हाण हेही निवडणुकीच्या राजकारणात गिरीश महाजन यांच्या पावलावर पाऊल टाकून सत्ता हस्तगत करु शकतात हे या निमित्ताने पुन्हा एकदा स्पष्ट झाले.भाजपामधील अंतर्गत कुरबुरींनाही निकालाने लगाम लागण्याची शक्यता आहे. पांढरा हत्ती असलेल्या परिवहन निवडणुकीला अचानक महत्त्व आले होते. भाजपामध्ये लाखोंची बोली लागल्याचे आरोप झाले होते. थेट सत्ताधारी पक्षांच्या पक्षश्रेष्ठींवर २५ लाख रुपये घेतल्याचे आरोप झाले होते. आता निकालानंतर सत्ताधारी पक्ष काय कारवाई करतो? याकडे साºयांचे लक्ष आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुका तोंडावर असल्याने पक्ष बोटचेपी भूमिका घेणार का, हाही प्रश्न आहे. शिवसेनेमध्येही लोकशाहीमुळे अंतर्गत नाराजी झाली, आरोप प्रत्यारोप झाले. आता शिवसेना बंडोबांवर काय कारवाई करणार, हा प्रश्न शिवसैनिकांना पडला आहे. भाजपा व शिवसेना या दोन्ही पक्षांचे सत्तेमुळे काँग्रेसीकरण झाले असून आता लोक नेतृत्वाविरुद्ध उघडपणे बोलायला घाबरत नाहीत, हे पुन्हा दिसून आले आहे.

पुढील निवडणुकांपूर्वी पक्षांतर्गत मतभेद, नाराजी दूर करणे अत्यावश्यक आहे. अन्यथा ही नाराजी डोकेदुखी वाढवू शकते. राजकारणात वेगवेगळ््या लोकांना पदांची गाजरे दाखवण्यामुळे भाजपा असो की शिवसेना या दोन्ही पक्षात नाराजांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दोन्ही पक्षांचे नेते नाराजांना काय ‘चॉकलेट’ देतात हे बघणे औत्सुक्याचे आहे.मनसेच्या उमेदवाराला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी साथ दिली. येत्या निवडणुकीत युती विरोधात अन्य पक्षांची आघाडी करण्याचे प्रयत्न सुरु असून त्यामध्ये राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मनसेलाही सहभागी करुन घेतले जाणार आहे. त्याचा छोटा प्रयोग परिवहनच्या निवडणुकीत केला गेला. राजकीयदृष्ट्या अडचणीत असलेल्या मनसेकरिता हा प्रयत्न दिलासादायक ठरणार आहे.भाजपा, शिवसेना आणि एमआयएम यांचे नाते हे साप-मुंगुसाचे असल्याचे आपण पाहतो. राष्ट्रीय व राज्यस्तरीय राजकारणात हे पक्ष एकमेकांवर हल्ले करीत असले तरी हिंदुत्वाचे राजकारण करणारे हे दोन पक्ष आणि कट्टरतावादी मुस्लिम राजकारण करणारा एमआयएम या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, हेही परिवहन निवडणुकीत दिसले. एमआयएमने भाजपाला १२ मते दिली. भाजपा फोफावली तरच एमआयएम फोफावते हाच विचार या सलगीमागे असू शकतो. सध्या खूप प्रयत्न करुनही एमआयएम निवडणुकीत मुस्लिम मतदारांना आकर्षित करु शकत नाही. चेतवू शकत नाही. त्यामुळे परस्परपूरक राजकारणाचे हे संकेत आहेत.कल्याण-डोंबिवली परिवहन समितीच्या निवडणुकीत शिवसेनेने भाजपाला साथ दिली आणि भविष्यात लोकसभा व विधानसभा निवडणुकीत होणाºया युतीचे संकेत दिले आहेत. भाजपाने आपल्या दोन उमेदवारांना अतिरिक्त मते दिल्याने तिसरा उमेदवार आणि मनसेचा उमेदवार यांच्यात काँटे की टक्कर होती. मात्र, शिवसेना आणि एमआयएम यांनी भाजपाची साथ दिली.च्नव्याने निवडून गेलेल्या परिवहन सदस्यांनी केवळ जिंकल्याचे समाधान न मानता, परिवहनची डबघाईला आलेली परिस्थिती सुधारण्यावर भर दिला पाहिजे.च्प्रतिदिन ७ लाखांची असलेली उलाढाल कशी वाढेल, याकडे लक्ष द्यावे. परिवहन म्हणजे घोटाळ््यांची खाण हा कलंक पुसण्यासाठी प्रयत्न करणे अपेक्षित आहे.च्उत्तमोत्तम सेवा-सुविधा, देऊन कल्याण डोंबिवलीकरांचा प्रवास सुखकर करणे अपेक्षित आहे. इंधन चोरी, इंजिन, तिकीट घोटाळ््यांची पुनरावृत्ती करू नये.च्प्रामाणिकपणे पारदर्शी कारभार करण्याचे मोठे आव्हान नवनिर्वाचितांसमोर आहे.

टॅग्स :thaneठाणेShiv Senaशिवसेना