शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

ठाणे: शिवसेना-भाजपा दोघांचाही राष्ट्रवादीसोबत सत्तेचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 02:16 IST

राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेत जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्याचा दावा शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पक्षांनी केल्याने राजकारण रंगतदार वळणावर येऊन ठेपले आहे.

ठाणे/भिवंडी : राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेत जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्याचा दावा शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पक्षांनी केल्याने राजकारण रंगतदार वळणावर येऊन ठेपले आहे.भाजपापुरस्कृत अपक्षाला शिवेसेनेने पक्षात घेण्याची खेळी केल्याने भाजपाच्या गोटात खळबळ उडली, तेवढीच राष्ट्रवादीत नाराजी पसरली. त्याचा फायदा घेत भाजपाने वरिष्ठ नेत्यांना मध्यस्थी करायला लावत राष्ट्रवादी काँग्रेसला आपल्या गोटात वळवण्याचा प्रयत्न सुरू केला. भाजपाच्या नेत्यांनी अशा वाटाघाटी सुरू असल्याचे उघड केल्याने सत्ता स्थापन होईपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसला कधी नव्हे, एवढे महत्त्व आले आहे.शिवसेनेचे ठाणे ग्रामीण प्रमुख प्रकाश पाटील यांनी शिवसेनेला स्वबळावर बहुमत मिळाले, तरी राष्ट्रवादीची साथ सोडणार नसल्याचे स्पष्ट केले. राष्ट्रवादीलाही सत्तेत सहभागी करून घेणार असल्याची आमची भूमिका कायम आहे, असेही त्यांनी सांगितले.त्या पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख बाळ््यामामा यांनी तर खासदार कपिल पाटील यांच्यावर फोडाफोडीचे राजकारण करत असल्याचा आरोप केला. ते सत्तेचा गैरवापर करत आहेत. त्यांनी पराभव मान्य करायला हवा. सत्तेत आम्हीच असू, हे पाटील यांनी स्वीकारावे, अशी भूमिका त्यांनी मांडली.राष्ट्रवादीचे स्थानिक नेते इरफान भुरे यांनीही शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढले. त्यामुळे ते एकत्र सत्तेत असतील, असा विश्वास व्यक्त केला. भाजपासोबत जाण्याचा विचार नसल्याचे सांगताना आम्ही एकत्र काम करत राहू, असे त्यांनी सांगितले.भाजपाचे जिल्हा संपर्कप्रमुख दयानंद चोरघे यांनी मात्र पाठिंब्यासाठी राष्ट्रवादीशी वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असल्याचे मान्य केले. ठाणे जिल्ह्याचा, ग्रामीण भागाचा विकास करायचा असेल तर त्यासाठी निधी आणण्याचे काम भाजपाच करू शकते, याकडे लक्ष वेधत ते म्हणाले, त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसशी युतीसाठी वरिष्ठ पातळीवर बोलणी सुरू आहेत.शेलारला आले महत्त्व-निकाल लागताच लगेचच भिवंडीतील शेलार गटातील आणि शेलार, कोलिवली या गणात फेरमतदान होणार होते. मात्र त्याची तारीख निवडणूक आयोगाने अद्याप जाहीर केलेली नाही. भाजपाने आपला पुरस्कृत अपक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस यांना एकत्र आणले. काँग्रेसच्या सदस्याचे मन वळवले, तर त्यांना एका जागेची गरज आहे आणि त्यासाठी त्यांच्या आशा शेलार गटावर केंद्रित आहेत. यामुळे शेलार गटातील फेरमतदानाला महत्त्व आले आहे.

टॅग्स :thaneठाणेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा