शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

शिंदेंसाठी डोंबिवली, कल्याण पूर्वसह, अंबरनाथ हिताचे, तर पाटलांची भिस्त कळवा-मुंब्य्रावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 01:57 IST

कसे असणार मतांचे गणित : भूमिपुत्राचा नारा ग्रामीणसाठी राष्ट्रवादीला हितकारक

प्रशांत माने ।लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : कल्याण लोकसभा मतदारसंघात काही अपक्ष उमेदवारांची भाऊगर्दी दिसत असली, तरी शिवसेनेचे डॉ. श्रीकांत शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबाजी पाटील यांच्यातच मुख्यत्वे लढत पाहायला मिळणार आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदीलाटेत शिंदे यांना कळवा-मुंब्रा मतदारसंघ वगळता अन्य पाच मतदारसंघांमध्ये भरभरून मते मिळाली होती. यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीची भिस्त कळवा-मुंब्रा मतदारसंघावरच असेल, त्याचबरोबर भूमिपुत्राचा नारा हा कल्याण ग्रामीणमध्ये फायदेशीर ठरू शकतो, तर डोंबिवलीसह कल्याण पूर्व, उल्हासनगर, अंबरनाथ हे मतदारसंघ शिंदेंसाठी फायद्याचे ठरू शकतात.

कल्याण लोकसभा मतदारसंघ शिवसेना-भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या मतदारसंघातील कळवा-मुंब्रा वगळता उर्वरित मतदारसंघांवर शिवसेना-भाजपची पकड आहे. २०१४ च्या निवडणुकीत मनसे रिंगणात होती, परंतु शिवसेना आणि राष्ट्रवादी अशीच लढत त्यावेळी झाली होती. यंदा या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीसह अन्य छोटे पक्ष रिंगणात असले, तरी यावेळीही प्रमुख लढत सेना विरुद्ध राष्ट्रवादी अशीच पाहायला मिळणार आहे. येथील सहा विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेता शिवसेना दोन, सहयोगी अपक्षासह भाजपचे दोन, राष्ट्रवादीचे दोन असे आमदार आहेत. मागील लोकसभा निवडणुकीत कळवा-मुंब्रा वगळता उर्वरित सर्वच मतदारसंघांत शिवसेनेचे उमेदवार शिंदे यांना मोठ्या प्रमाणावर मते मिळाली होती. कळवा-मुंब्रा मतदारसंघात मात्र परांजपे यांना शिंदे यांच्यापेक्षा १२ हजार मते अधिक मिळाली होती. आताही याच मतदारसंघावर राष्ट्रवादीची भिस्त राहणार असून उर्वरित मतदारसंघांतून कशा प्रकारे राष्ट्रवादीचे पाटील मते मिळवतात, यावर त्यांच्या यशाचे गणित अवलंबून असणार आहे.

भूमिपुत्राचा नारा देत कल्याण ग्रामीणमध्ये मते मिळवण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न राहणार आहे. २७ गावांचा मुद्दा याठिकाणी प्रामुख्याने गाजणार आहे. सरकारविरोधात मतदान करा, असे आवाहन सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीने घेतला, पण या समितीमध्ये शिवसेना आणि भाजपचे सदस्य असल्याने या आवाहनाला कितपत दाद मिळते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.बाबाजी पाटील - केडीएमसीमध्ये राष्ट्रवादीचे अवघे दोन नगरसेवक आहेत. उल्हासनगर आणि अंबरनाथमध्ये अनुक्रमे चार आणि पाच नगरसेवक आहेत. शिवसेनेचे केडीएमसीत ५२ नगरसेवक आहेत. उल्हासनगरमध्ये २५ तर अंबरनाथमध्ये २२ नगरसेवक आहेत.डोंबिवलीमधून ९० हजार, कल्याण पूर्वेतून ७१ हजार ७६३, कल्याण ग्रामीण ८७ हजार ९२७, अंबरनाथ ६९ हजार ५९५ , उल्हासनगरमधून ६८ हजार २६ मते शिंदेंना २00९ च्या निवडणुकीत मिळाली होती. त्यावेळी परांजपे यांना कळवा-मुंब्रा येथून १२ हजारांचे मताधिक्य मिळाले होते.

श्रीकांत शिंदे - डोंबिवली, कल्याण पूर्व, ग्रामीण, उल्हासनगर, अंबरनाथ हे मतदारसंघ शिवसेनेसाठी नेहमीच निर्णायक ठरले आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत या पाच मतदारसंघांतूनच शिवसेनेच्या शिंदेंना मताधिक्य मिळाले होते.

टॅग्स :thane-pcठाणेkalyan-pcकल्याण