शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

शिंदेंसाठी डोंबिवली, कल्याण पूर्वसह, अंबरनाथ हिताचे, तर पाटलांची भिस्त कळवा-मुंब्य्रावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 01:57 IST

कसे असणार मतांचे गणित : भूमिपुत्राचा नारा ग्रामीणसाठी राष्ट्रवादीला हितकारक

प्रशांत माने ।लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : कल्याण लोकसभा मतदारसंघात काही अपक्ष उमेदवारांची भाऊगर्दी दिसत असली, तरी शिवसेनेचे डॉ. श्रीकांत शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबाजी पाटील यांच्यातच मुख्यत्वे लढत पाहायला मिळणार आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदीलाटेत शिंदे यांना कळवा-मुंब्रा मतदारसंघ वगळता अन्य पाच मतदारसंघांमध्ये भरभरून मते मिळाली होती. यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीची भिस्त कळवा-मुंब्रा मतदारसंघावरच असेल, त्याचबरोबर भूमिपुत्राचा नारा हा कल्याण ग्रामीणमध्ये फायदेशीर ठरू शकतो, तर डोंबिवलीसह कल्याण पूर्व, उल्हासनगर, अंबरनाथ हे मतदारसंघ शिंदेंसाठी फायद्याचे ठरू शकतात.

कल्याण लोकसभा मतदारसंघ शिवसेना-भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या मतदारसंघातील कळवा-मुंब्रा वगळता उर्वरित मतदारसंघांवर शिवसेना-भाजपची पकड आहे. २०१४ च्या निवडणुकीत मनसे रिंगणात होती, परंतु शिवसेना आणि राष्ट्रवादी अशीच लढत त्यावेळी झाली होती. यंदा या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीसह अन्य छोटे पक्ष रिंगणात असले, तरी यावेळीही प्रमुख लढत सेना विरुद्ध राष्ट्रवादी अशीच पाहायला मिळणार आहे. येथील सहा विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेता शिवसेना दोन, सहयोगी अपक्षासह भाजपचे दोन, राष्ट्रवादीचे दोन असे आमदार आहेत. मागील लोकसभा निवडणुकीत कळवा-मुंब्रा वगळता उर्वरित सर्वच मतदारसंघांत शिवसेनेचे उमेदवार शिंदे यांना मोठ्या प्रमाणावर मते मिळाली होती. कळवा-मुंब्रा मतदारसंघात मात्र परांजपे यांना शिंदे यांच्यापेक्षा १२ हजार मते अधिक मिळाली होती. आताही याच मतदारसंघावर राष्ट्रवादीची भिस्त राहणार असून उर्वरित मतदारसंघांतून कशा प्रकारे राष्ट्रवादीचे पाटील मते मिळवतात, यावर त्यांच्या यशाचे गणित अवलंबून असणार आहे.

भूमिपुत्राचा नारा देत कल्याण ग्रामीणमध्ये मते मिळवण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न राहणार आहे. २७ गावांचा मुद्दा याठिकाणी प्रामुख्याने गाजणार आहे. सरकारविरोधात मतदान करा, असे आवाहन सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीने घेतला, पण या समितीमध्ये शिवसेना आणि भाजपचे सदस्य असल्याने या आवाहनाला कितपत दाद मिळते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.बाबाजी पाटील - केडीएमसीमध्ये राष्ट्रवादीचे अवघे दोन नगरसेवक आहेत. उल्हासनगर आणि अंबरनाथमध्ये अनुक्रमे चार आणि पाच नगरसेवक आहेत. शिवसेनेचे केडीएमसीत ५२ नगरसेवक आहेत. उल्हासनगरमध्ये २५ तर अंबरनाथमध्ये २२ नगरसेवक आहेत.डोंबिवलीमधून ९० हजार, कल्याण पूर्वेतून ७१ हजार ७६३, कल्याण ग्रामीण ८७ हजार ९२७, अंबरनाथ ६९ हजार ५९५ , उल्हासनगरमधून ६८ हजार २६ मते शिंदेंना २00९ च्या निवडणुकीत मिळाली होती. त्यावेळी परांजपे यांना कळवा-मुंब्रा येथून १२ हजारांचे मताधिक्य मिळाले होते.

श्रीकांत शिंदे - डोंबिवली, कल्याण पूर्व, ग्रामीण, उल्हासनगर, अंबरनाथ हे मतदारसंघ शिवसेनेसाठी नेहमीच निर्णायक ठरले आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत या पाच मतदारसंघांतूनच शिवसेनेच्या शिंदेंना मताधिक्य मिळाले होते.

टॅग्स :thane-pcठाणेkalyan-pcकल्याण