शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

'‘त्या’ महाराष्ट्राच्या कन्या होत्या तर भावे कोण होते?'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 00:44 IST

डॉ. सच्चिदानंद शेवडे यांचा सवाल : ‘राम मंदिरच का?’ पुस्तकाचे प्रकाशन

डोंबिवली : यवतमाळ येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात लेखिका नयनतारा सेहगल यांना आमंत्रण पाठवून ते नंतर नाकारले, त्यावरून बराच वाद झाला होता. त्यावेळी अभिव्यक्तिस्वातंत्र्याबाबत एका व्यक्तीने मला नयनतारा या महाराष्ट्राच्या कन्या आहेत. त्यांचा अपमान करणे ही आपली संस्कृती नाही, असा मेसेज पाठवला होता. त्यावर मग पु. भा. भावे कोण होते? त्यांचे भाषण पुण्यात उधळून लावले होते. तेव्हा कोणाला का पुळका आला नाही? असा प्रश्न पडला. डावे नेहमीच आपली सोय पाहतात, हेच यावरून स्पष्ट होत असल्याचे मत डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी व्यक्त केले.‘पै फेण्ड्स लायब्ररी’च्या सौजन्याने नावीन्य प्रकाशन प्रकाशित डॉ. सच्चिदानंद शेवडे आणि डॉ. परीक्षित शेवडे लिखित ‘राममंदिरच का?’ या पुस्तकाचे प्रकाशन शास्त्री सभागृहात शनिवारी करण्यात आले. यावेळी जोशी बोलत होते. शुक्रवारी हा कार्यक्रम झाला. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार सुधीर जोगळेकर, अभिनेते मनोज जोशी डॉ. परीक्षित शेवडे, डॉ. सच्चिदानंद शेवडे, पुंडलिक पै, नितीन खैर आदी मान्यवर उपस्थित होते.डॉ. शेवडे म्हणाले की, इतिहास आहे तसा लोकांपर्यंत पोहोचविला पाहिजे. पण ते आपल्याकडे होत नाही. पाकिस्तानमध्ये तसे होत नाही. गेली ७० वर्षे इतिहासकारांनी घोळ घालून ठेवला आहे. तो तसाच सुरू आहे. चार वर्षांत सध्याचे सरकार ही काही करू शकले नाही. या सर्वांना बाहेरचा रस्ता दाखविला नाही. मीडियाला हे सरकार घाबरते की काय असे वाटते.परीक्षित शेवडे म्हणाले की, साहित्यातील संदर्भ पाहताना, संशोधन करीत असताना असे लक्षात येते की पुढच्या आवृत्तीमधील काही गोष्टी सोयीस्कररीत्या वगळण्यात आल्या आहेत. राजकारण हे खोलवर सुरू असते. मालिका हे इतिहास सांगण्याचे साधन नाही, पण त्यांचा बोलबोला जास्त आहे. शाळांमधूनही खरा इतिहास शिकविला जात नाही. जोशी म्हणाले की, राम या देशाची आस्था, श्रद्ध आणि या जगाचा प्राणवायू आहे. राम ज्यांच्यात नाही ते डावे आहेत आणि ज्यांच्यात राम आहे ते उजवे आहेत.वसीम रिझवी यांचा ‘रामजन्म भूमी’ यावर लवकरच एक चित्रपट येणार आहे. हा चित्रपट सेन्सॉरला गेला आहे. लवकरच तो तुम्हाला बघायला मिळेल. रिझवी यांची मुलाखतही या पुस्तकात आहे. या पुस्तकाचे प्रत्येक भाषेत भाषांतर व्हावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.सुनावणीच्या विलंबास काँग्रेस जबाबदार!जोगळेकर म्हणाले की, जागृत जनमानस उभे राहिले तर रामजन्मभूमीवर राममंदिर बांधलेले दिसेल. भैय्याजी जोशी यांनी पत्रकार परिषदेत आणि जाहीर भाषणात २०२५ मध्ये मंदिर बांधलेले दिसेल. त्यांच्या मते सर्वोच्च न्यायलयातील सुनावणीमधून असे पुरावे बाहेर येतील की जेणेकरून राममंदिराच्या बांधणीचा मार्ग खुला होईल.यांच्या या वक्तव्याचा काही जणांनी हे सरकार राममंदिर बांधणार नाही असा अर्थ काढला. या सुनावणी प्रक्रियेतील ललित न्यायमूर्ती यांना काढावे, असा अर्ज काँग्रेसने केला आहे.त्यामुळे सुनावणीला उशीर होत आहे. आता २९ जानेवारीपासून सुनावणी सुरू होईल, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिर