शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
8
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
11
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
12
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
13
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
14
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
15
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
16
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
17
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
18
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
19
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
20
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?

'‘त्या’ महाराष्ट्राच्या कन्या होत्या तर भावे कोण होते?'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 00:44 IST

डॉ. सच्चिदानंद शेवडे यांचा सवाल : ‘राम मंदिरच का?’ पुस्तकाचे प्रकाशन

डोंबिवली : यवतमाळ येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात लेखिका नयनतारा सेहगल यांना आमंत्रण पाठवून ते नंतर नाकारले, त्यावरून बराच वाद झाला होता. त्यावेळी अभिव्यक्तिस्वातंत्र्याबाबत एका व्यक्तीने मला नयनतारा या महाराष्ट्राच्या कन्या आहेत. त्यांचा अपमान करणे ही आपली संस्कृती नाही, असा मेसेज पाठवला होता. त्यावर मग पु. भा. भावे कोण होते? त्यांचे भाषण पुण्यात उधळून लावले होते. तेव्हा कोणाला का पुळका आला नाही? असा प्रश्न पडला. डावे नेहमीच आपली सोय पाहतात, हेच यावरून स्पष्ट होत असल्याचे मत डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी व्यक्त केले.‘पै फेण्ड्स लायब्ररी’च्या सौजन्याने नावीन्य प्रकाशन प्रकाशित डॉ. सच्चिदानंद शेवडे आणि डॉ. परीक्षित शेवडे लिखित ‘राममंदिरच का?’ या पुस्तकाचे प्रकाशन शास्त्री सभागृहात शनिवारी करण्यात आले. यावेळी जोशी बोलत होते. शुक्रवारी हा कार्यक्रम झाला. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार सुधीर जोगळेकर, अभिनेते मनोज जोशी डॉ. परीक्षित शेवडे, डॉ. सच्चिदानंद शेवडे, पुंडलिक पै, नितीन खैर आदी मान्यवर उपस्थित होते.डॉ. शेवडे म्हणाले की, इतिहास आहे तसा लोकांपर्यंत पोहोचविला पाहिजे. पण ते आपल्याकडे होत नाही. पाकिस्तानमध्ये तसे होत नाही. गेली ७० वर्षे इतिहासकारांनी घोळ घालून ठेवला आहे. तो तसाच सुरू आहे. चार वर्षांत सध्याचे सरकार ही काही करू शकले नाही. या सर्वांना बाहेरचा रस्ता दाखविला नाही. मीडियाला हे सरकार घाबरते की काय असे वाटते.परीक्षित शेवडे म्हणाले की, साहित्यातील संदर्भ पाहताना, संशोधन करीत असताना असे लक्षात येते की पुढच्या आवृत्तीमधील काही गोष्टी सोयीस्कररीत्या वगळण्यात आल्या आहेत. राजकारण हे खोलवर सुरू असते. मालिका हे इतिहास सांगण्याचे साधन नाही, पण त्यांचा बोलबोला जास्त आहे. शाळांमधूनही खरा इतिहास शिकविला जात नाही. जोशी म्हणाले की, राम या देशाची आस्था, श्रद्ध आणि या जगाचा प्राणवायू आहे. राम ज्यांच्यात नाही ते डावे आहेत आणि ज्यांच्यात राम आहे ते उजवे आहेत.वसीम रिझवी यांचा ‘रामजन्म भूमी’ यावर लवकरच एक चित्रपट येणार आहे. हा चित्रपट सेन्सॉरला गेला आहे. लवकरच तो तुम्हाला बघायला मिळेल. रिझवी यांची मुलाखतही या पुस्तकात आहे. या पुस्तकाचे प्रत्येक भाषेत भाषांतर व्हावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.सुनावणीच्या विलंबास काँग्रेस जबाबदार!जोगळेकर म्हणाले की, जागृत जनमानस उभे राहिले तर रामजन्मभूमीवर राममंदिर बांधलेले दिसेल. भैय्याजी जोशी यांनी पत्रकार परिषदेत आणि जाहीर भाषणात २०२५ मध्ये मंदिर बांधलेले दिसेल. त्यांच्या मते सर्वोच्च न्यायलयातील सुनावणीमधून असे पुरावे बाहेर येतील की जेणेकरून राममंदिराच्या बांधणीचा मार्ग खुला होईल.यांच्या या वक्तव्याचा काही जणांनी हे सरकार राममंदिर बांधणार नाही असा अर्थ काढला. या सुनावणी प्रक्रियेतील ललित न्यायमूर्ती यांना काढावे, असा अर्ज काँग्रेसने केला आहे.त्यामुळे सुनावणीला उशीर होत आहे. आता २९ जानेवारीपासून सुनावणी सुरू होईल, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिर