शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
4
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
5
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
6
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
7
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
8
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
9
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
10
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
11
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
12
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
13
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
14
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
15
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
17
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
18
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
19
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
20
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...

'‘त्या’ महाराष्ट्राच्या कन्या होत्या तर भावे कोण होते?'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 00:44 IST

डॉ. सच्चिदानंद शेवडे यांचा सवाल : ‘राम मंदिरच का?’ पुस्तकाचे प्रकाशन

डोंबिवली : यवतमाळ येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात लेखिका नयनतारा सेहगल यांना आमंत्रण पाठवून ते नंतर नाकारले, त्यावरून बराच वाद झाला होता. त्यावेळी अभिव्यक्तिस्वातंत्र्याबाबत एका व्यक्तीने मला नयनतारा या महाराष्ट्राच्या कन्या आहेत. त्यांचा अपमान करणे ही आपली संस्कृती नाही, असा मेसेज पाठवला होता. त्यावर मग पु. भा. भावे कोण होते? त्यांचे भाषण पुण्यात उधळून लावले होते. तेव्हा कोणाला का पुळका आला नाही? असा प्रश्न पडला. डावे नेहमीच आपली सोय पाहतात, हेच यावरून स्पष्ट होत असल्याचे मत डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी व्यक्त केले.‘पै फेण्ड्स लायब्ररी’च्या सौजन्याने नावीन्य प्रकाशन प्रकाशित डॉ. सच्चिदानंद शेवडे आणि डॉ. परीक्षित शेवडे लिखित ‘राममंदिरच का?’ या पुस्तकाचे प्रकाशन शास्त्री सभागृहात शनिवारी करण्यात आले. यावेळी जोशी बोलत होते. शुक्रवारी हा कार्यक्रम झाला. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार सुधीर जोगळेकर, अभिनेते मनोज जोशी डॉ. परीक्षित शेवडे, डॉ. सच्चिदानंद शेवडे, पुंडलिक पै, नितीन खैर आदी मान्यवर उपस्थित होते.डॉ. शेवडे म्हणाले की, इतिहास आहे तसा लोकांपर्यंत पोहोचविला पाहिजे. पण ते आपल्याकडे होत नाही. पाकिस्तानमध्ये तसे होत नाही. गेली ७० वर्षे इतिहासकारांनी घोळ घालून ठेवला आहे. तो तसाच सुरू आहे. चार वर्षांत सध्याचे सरकार ही काही करू शकले नाही. या सर्वांना बाहेरचा रस्ता दाखविला नाही. मीडियाला हे सरकार घाबरते की काय असे वाटते.परीक्षित शेवडे म्हणाले की, साहित्यातील संदर्भ पाहताना, संशोधन करीत असताना असे लक्षात येते की पुढच्या आवृत्तीमधील काही गोष्टी सोयीस्कररीत्या वगळण्यात आल्या आहेत. राजकारण हे खोलवर सुरू असते. मालिका हे इतिहास सांगण्याचे साधन नाही, पण त्यांचा बोलबोला जास्त आहे. शाळांमधूनही खरा इतिहास शिकविला जात नाही. जोशी म्हणाले की, राम या देशाची आस्था, श्रद्ध आणि या जगाचा प्राणवायू आहे. राम ज्यांच्यात नाही ते डावे आहेत आणि ज्यांच्यात राम आहे ते उजवे आहेत.वसीम रिझवी यांचा ‘रामजन्म भूमी’ यावर लवकरच एक चित्रपट येणार आहे. हा चित्रपट सेन्सॉरला गेला आहे. लवकरच तो तुम्हाला बघायला मिळेल. रिझवी यांची मुलाखतही या पुस्तकात आहे. या पुस्तकाचे प्रत्येक भाषेत भाषांतर व्हावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.सुनावणीच्या विलंबास काँग्रेस जबाबदार!जोगळेकर म्हणाले की, जागृत जनमानस उभे राहिले तर रामजन्मभूमीवर राममंदिर बांधलेले दिसेल. भैय्याजी जोशी यांनी पत्रकार परिषदेत आणि जाहीर भाषणात २०२५ मध्ये मंदिर बांधलेले दिसेल. त्यांच्या मते सर्वोच्च न्यायलयातील सुनावणीमधून असे पुरावे बाहेर येतील की जेणेकरून राममंदिराच्या बांधणीचा मार्ग खुला होईल.यांच्या या वक्तव्याचा काही जणांनी हे सरकार राममंदिर बांधणार नाही असा अर्थ काढला. या सुनावणी प्रक्रियेतील ललित न्यायमूर्ती यांना काढावे, असा अर्ज काँग्रेसने केला आहे.त्यामुळे सुनावणीला उशीर होत आहे. आता २९ जानेवारीपासून सुनावणी सुरू होईल, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिर