शहरं
Join us  
Trending Stories
1
मेवाड-जैसलमेर-बूंदी...! राजस्थानला मराठा साम्राज्याचा नकाशा खुपू लागला; एनसीईआरटीच्या पुस्तकावरून वाद
2
राहुल गांधी, संजय राऊतांसह अनेक खासदार पोलिसांच्या ताब्यात; 'मतचोरी'वरून विरोधकांचा निवडणूक आयोगावर मोर्चा
3
"CCTV पाहिल्यापासून झोप येत नाही..."; १५ महिन्यांच्या मुलीला डे-केअरमध्ये मारहाण, आई ढसाढसा रडली
4
ICICI बँकेचा शेअरधारकांना सुखद धक्का! प्रति शेअर इतक्या रुपयांचा लाभांश जाहीर, तुम्हीही घेऊ शकता लाभ
5
भारताला 'डेड इकॉनॉमी' म्हणणाऱ्या ट्रम्प यांचा 'डॉलर'च धोक्यात; एक्सपर्टनं दिला मोठा इशारा
6
श्रावण सोमवारी दु:खाचा डोंगर; पाथरीत कावड यात्रेत कार घुसली, दोन भाविकांचा जागीच मृत्यू
7
इस्रायलने पत्रकारांच्या छावणीवर हल्ला केला; अल-जझीराचे पाच पत्रकार ठार, आयडीएफ म्हणतेय...
8
पुन्हा जिवंत करण्यासाठी तरुणाचा मृतदेह ५ दिवस पाण्यात ठेवला अन् बाजूला बँड वाजवत बसले! कुठे घडला 'हा' प्रकार?
9
१५ महिन्यांच्या चिमुकल्याला ढकलले, मारले आणि मग..., डे-केअर सेंटरमधील धक्कादायक प्रकार
10
"भारत चकचकित मर्सिडीज, पाकिस्तान कचऱ्यानं भरलेला ट्रक", फील्ड मार्शल आसिम मुनीर यांनी PAK ची अब्रू वेशीवर टांगली!
11
कोण म्हणतोय प्रेमात धोका... भारतीय सुधारले; २ वर्षांत १६% कमी झाले, नात्यात हे निवडू लागले...
12
Shravan Somvar 2025: शिवलिंगावर अभिषेक करताना तुम्हीसुद्धा 'ही' चूक करताय का? पूजा राहील अपूर्ण!
13
सरकार बँक ऑफ महाराष्ट्र-LIC सह 'या' ५ बँकांमधील हिस्सा विकणार, गुंतवणूकदारांना काय फायदा?
14
दिलदार! भीक मागून १.८३ लाख जमवले, मंदिरासाठी दान केले; रंगम्माच्या मनाचा मोठेपणा
15
Donald Trump Tariff on India: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर सरकारचा प्लान तयार, आता देणार ‘जशास तसं’ उत्तर
16
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय कधी आहे? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, मान्यता
17
रुग्णवाहिकेचा भीषण अपघात; पतीचा मृतदेह घेऊन जाणाऱ्या पत्नीचा दुर्दैवी अंत
18
भावाचा जीव वाचवण्यासाठी गेलेल्या बहिणीलाच मृत्यूने कवटाळलं; रक्षाबंधनच्या दिवशीच कुटुंबावर शोककळा
19
श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: धन-धान्य-ऐश्वर्य लाभेल, ‘हे’ उपाय अवश्य करा; गणपती शुभच करेल!
20
निम्म्यापेक्षाही अधिक घसरण, ५ दिवसांत ४०% नं घसरला हा मल्टिबॅगर शेअर; तुमच्याकडे आहे का?

"भोंगे, हनुमान चालीसा नको, आम्हाला पाणी द्या," शहापूर तालुक्यातील आदिवासी महिलांची साद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2022 11:09 IST

पाच वर्षांच्या लहानग्यांपासून ६५ वर्षांच्या वृद्धांपर्यंत सर्वच पाण्यासाठी ३ ते ४ किलोमीटरपर्यंतच्या डोंगरदऱ्यात चढ-उतार करत आहेत.

श्याम धुमाळकसारा : शहापूर तालुक्यात तीन महाकाय धरणे, तर दाेन लहान धरणे असूनही अतिदुर्गम आदिवासी पाड्यांसह काही शहरी भाग पाण्यासाठी संघर्ष करीत आहे. पाच वर्षांच्या लहानग्यांपासून ६५ वर्षांच्या वृद्धांपर्यंत सर्वच पाण्यासाठी ३ ते ४ किलोमीटरपर्यंतच्या डोंगरदऱ्यात चढ-उतार करत आहेत. त्यामुळे भोंगे, हनुमान चालीसा, ईडीचे राजकारण बाजूला ठेवा आणि आमच्यासाठी पाण्याची व्यवस्था करा, अशी साद ग्रामीण भागातील महिलांनी राजकारण्यांना घातली आहे.मुंबई-नाशिक महामार्गावरील बिबलवाडी, चिंतामणवाडी, दांड उंभ्रावणे, नारळवाडी, पारधवाडी यासह दापूरमाळ, सावरकूट, विहिगाव, माळ, उठवा, अजनुप, चांदा, रातांधळे, अनेक गावपाड्यांत तीव्र पाणीटंचाई आहे. या गावातील माता-भगिनी, लहान मुले, गर्भवती माता व घरातील पुरुष मंडळीही सकाळी पाण्याच्या शोधात भटकंती करत आहेत. काही ठिकाणी पाण्याचे टँकर सुरू आहेत. मात्र, गरजेपेक्षा ते फारच कमी आहेत. पाळीव जनावारांसाठी पाणी शोधावे लागते. टँकरचे पाणी प्रतिघर ४ ते ५ हंडे मिळते. राजकारण्यांनी ग्रामीण भागातील पाणीटंचाई दूर करण्याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी हाेत आहे.

बिबलवाडीतील ज्येष्ठ ग्रामस्थ बबन ठाकरे यांनी सध्याच्या राजकारणावर नाराजी व्यक्त केली. बिबलवाडी गावातील ग्रामस्थांना दाेन ते तीन किलाेमीटर उतरून महामार्गाजवळील टाेप बावडीतून पाणी न्यावे लागत आहे. हे हाल राजकारण्यांना दिसत नाहीत का, असा प्रश्न त्यांनी केला. लोकप्रतिनिधींना भोंगे, हनुमान चालीसा, ईडी यातच जास्त रस आहे. राज्य असो वा केंद्र सरकार, सध्या कुरघोडीच्या राजकारणात दंग आहेत, त्यांना पाण्यासाठी मरण यातना भाेगणाऱ्या आदिवासींच्या हालअपेष्टांकडे लक्ष देण्यास वेळ नाही, अशी खंत ठाकरे यांनी व्यक्त केली.

  • पौष, माघ, चैत्र, वैशाख, आषाढ या महिन्यांत आम्हाला पाणीटंचाईला तोंड द्यावे लागते.
  • लहान-माेठी सर्वच माणसे पाण्यासाठी दाेन किलाेमीटरचा पायी प्रवास दिवसभरात किमान चार वेळा करतात. याच पाणीटंचाईमुळे चार वर्षांपूर्वी माझ्या मुलाचा मृत्यू झाला.
  • सर्व राजकारण्यांना विनंती आहे की, तुम्ही भांडणे करा, परंतु आमचा पाणीप्रश्न सोडविण्याकडे लक्ष द्या, अशी आर्जव कसारा खुर्दच्या सखुबाई आगिवले यांनी राज्य व केंद्र शासनाला केली.

उन्हाचा तडाखा असला तरी पाण्यासाठी जावे लागते. अनेक गर्भवती, वयोवृद्ध महिला पाण्यासाठी दाेन किलोमीटरपर्यंत चढ-उतार करत असतात. टँकर एकदा येतो. एका टँकरमधून ४ ते ५ हंडे पाणी मिळते.दुर्गाताई ठाकरे, बिबळवाडी.

आमच्या दांड, उंभ्रावणे परिसरात पाणी अडविण्यासाठी पर्यायी दरी आहे. या ठिकाणी छोटे-छोटे धरणवजा तलाव उभारण्यासाठी मागणी करत आहोत, पण आम्हा आदिवासींच्या या तोंडी मागणीकडे कोणीही लक्ष देत नाही.काशीनाथ मांगे, चिंतामणवाडी.

टॅग्स :WaterपाणीEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयPoliticsराजकारण