शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
2
इकडे सुप्रिम कोर्टात सुनावणी, तिकडे दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? गोंडस नाव दिले, म्हणे उद्धव ठाकरेंची परवानगी...
3
दिल्ली ब्लास्टचं इंटरनॅशनल कनेक्शन? पाकिस्तानच नव्हे, 'या' मुस्लीम देशाचं नावही येतंय समोर; पासपोर्टवरून धक्कादायक खुलासा!
4
'त्या' पोस्टरनं उलगडलं जैशचं टेरर मॉड्युल; समोर आला फोटो, एक महिना आधीच पाकिस्तानातून..
5
Bihar Election Exit Poll: मैथिली ठाकूर हरणार की जिंकणार, एक्झिट पोलचा अंदाज काय?
6
बापरे... ६ बायका...! सर्व जणी एकाच वेळी प्रेग्नन्ट; इंटरनेटवर व्हायरल होतोय हा युवक; बघा VIDEO
7
Motorola: ६.६७ इंचाचा डिस्प्ले, ५००० एमएएचची बॅटरी; 'हा' वॉटरप्रूफ फोन झाला आणखी स्वस्त!
8
शिवसेना कुणाची? आता सुप्रीम कोर्टात पुढच्याच वर्षी अंतिम सुनावणी होणार; आजची तारीख पुढे ढकलली
9
₹१ च्या शेअरची कमाल, १ लाखांच्या गुंतवणूकीचे झाले ₹१ कोटी; ₹१४५ वर आला भाव, तुमच्याकडे आहे का?
10
लग्नात बूट चोरल्यानं भडकला नवरा, वरमाला फेकली; नाराज नवरीनेही लग्न मोडले, अनवाणीच परत पाठवला
11
वनप्लस 15 ची किंमत रिलायन्स डिजिटलने लीक केली, डिलीटही केली पण...; गुगलवर आताही दिसतेय...
12
Swami Samartha: देवाजवळ दिवा लावताना काच फुटली, दिवा पडला तर स्वामींना करावी 'ही' प्रार्थना!
13
अतूट प्रेम! कोमात असलेल्या लेकीला शुद्धीवर आणण्यासाठी १० वर्ष आईने रोज केला डान्स अन्...
14
सलग तिसऱ्या दिवशी बाजारात तेजी! IT शेअर्समध्ये जोरदार खरेदी, एशियन पेंट्स टॉप गेनर, कुठे झाली घसरण?
15
Delhi Blast : "दावत के लिए बिरयानी तैयार..."; दिल्ली स्फोटासाठी खास कोडवर्ड, चॅट बॉक्समध्ये धक्कादायक खुलासा
16
Shreeji Global FMCG Shares: पहिल्याच दिवशी शेअरची स्थिती खराब; १२५ रुपयांचा शेअर आला ९९ रुपयांवर, गुंतवणूकदारांवर डोकं धरण्याची वेळ
17
बिहार निवडणुकीत NDA पराभूत झाल्यास निफ्टी ७% पर्यंत घसरू शकतो? ब्रोकरेज फर्मने दिला इशारा
18
सोनम-राजाचं लग्न ते बेवफाई अन् हत्या... सगळं समोर येणार! राजा रघुवंशी हत्या प्रकरणात कुणी दिली पहिली साक्ष?
19
जीएसटी रद्द झाल्यानं जीवन, आरोग्य विमा घेण्याचं प्रमाण वाढलं; प्रीमियम वाढून ३४,००७ कोटी रुपयांवर 
20
'पैसे दुप्पट' करणारा ते अल फलाह युनिव्हर्सिटीचा मालक; हा जावेद अहमद सिद्दीकी कोण?

"भोंगे, हनुमान चालीसा नको, आम्हाला पाणी द्या," शहापूर तालुक्यातील आदिवासी महिलांची साद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2022 11:09 IST

पाच वर्षांच्या लहानग्यांपासून ६५ वर्षांच्या वृद्धांपर्यंत सर्वच पाण्यासाठी ३ ते ४ किलोमीटरपर्यंतच्या डोंगरदऱ्यात चढ-उतार करत आहेत.

श्याम धुमाळकसारा : शहापूर तालुक्यात तीन महाकाय धरणे, तर दाेन लहान धरणे असूनही अतिदुर्गम आदिवासी पाड्यांसह काही शहरी भाग पाण्यासाठी संघर्ष करीत आहे. पाच वर्षांच्या लहानग्यांपासून ६५ वर्षांच्या वृद्धांपर्यंत सर्वच पाण्यासाठी ३ ते ४ किलोमीटरपर्यंतच्या डोंगरदऱ्यात चढ-उतार करत आहेत. त्यामुळे भोंगे, हनुमान चालीसा, ईडीचे राजकारण बाजूला ठेवा आणि आमच्यासाठी पाण्याची व्यवस्था करा, अशी साद ग्रामीण भागातील महिलांनी राजकारण्यांना घातली आहे.मुंबई-नाशिक महामार्गावरील बिबलवाडी, चिंतामणवाडी, दांड उंभ्रावणे, नारळवाडी, पारधवाडी यासह दापूरमाळ, सावरकूट, विहिगाव, माळ, उठवा, अजनुप, चांदा, रातांधळे, अनेक गावपाड्यांत तीव्र पाणीटंचाई आहे. या गावातील माता-भगिनी, लहान मुले, गर्भवती माता व घरातील पुरुष मंडळीही सकाळी पाण्याच्या शोधात भटकंती करत आहेत. काही ठिकाणी पाण्याचे टँकर सुरू आहेत. मात्र, गरजेपेक्षा ते फारच कमी आहेत. पाळीव जनावारांसाठी पाणी शोधावे लागते. टँकरचे पाणी प्रतिघर ४ ते ५ हंडे मिळते. राजकारण्यांनी ग्रामीण भागातील पाणीटंचाई दूर करण्याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी हाेत आहे.

बिबलवाडीतील ज्येष्ठ ग्रामस्थ बबन ठाकरे यांनी सध्याच्या राजकारणावर नाराजी व्यक्त केली. बिबलवाडी गावातील ग्रामस्थांना दाेन ते तीन किलाेमीटर उतरून महामार्गाजवळील टाेप बावडीतून पाणी न्यावे लागत आहे. हे हाल राजकारण्यांना दिसत नाहीत का, असा प्रश्न त्यांनी केला. लोकप्रतिनिधींना भोंगे, हनुमान चालीसा, ईडी यातच जास्त रस आहे. राज्य असो वा केंद्र सरकार, सध्या कुरघोडीच्या राजकारणात दंग आहेत, त्यांना पाण्यासाठी मरण यातना भाेगणाऱ्या आदिवासींच्या हालअपेष्टांकडे लक्ष देण्यास वेळ नाही, अशी खंत ठाकरे यांनी व्यक्त केली.

  • पौष, माघ, चैत्र, वैशाख, आषाढ या महिन्यांत आम्हाला पाणीटंचाईला तोंड द्यावे लागते.
  • लहान-माेठी सर्वच माणसे पाण्यासाठी दाेन किलाेमीटरचा पायी प्रवास दिवसभरात किमान चार वेळा करतात. याच पाणीटंचाईमुळे चार वर्षांपूर्वी माझ्या मुलाचा मृत्यू झाला.
  • सर्व राजकारण्यांना विनंती आहे की, तुम्ही भांडणे करा, परंतु आमचा पाणीप्रश्न सोडविण्याकडे लक्ष द्या, अशी आर्जव कसारा खुर्दच्या सखुबाई आगिवले यांनी राज्य व केंद्र शासनाला केली.

उन्हाचा तडाखा असला तरी पाण्यासाठी जावे लागते. अनेक गर्भवती, वयोवृद्ध महिला पाण्यासाठी दाेन किलोमीटरपर्यंत चढ-उतार करत असतात. टँकर एकदा येतो. एका टँकरमधून ४ ते ५ हंडे पाणी मिळते.दुर्गाताई ठाकरे, बिबळवाडी.

आमच्या दांड, उंभ्रावणे परिसरात पाणी अडविण्यासाठी पर्यायी दरी आहे. या ठिकाणी छोटे-छोटे धरणवजा तलाव उभारण्यासाठी मागणी करत आहोत, पण आम्हा आदिवासींच्या या तोंडी मागणीकडे कोणीही लक्ष देत नाही.काशीनाथ मांगे, चिंतामणवाडी.

टॅग्स :WaterपाणीEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयPoliticsराजकारण