शहरं
Join us  
Trending Stories
1
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
2
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
3
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
4
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
5
स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यावर प्राणघातक हल्ला, रुग्णालयात दाखल 
6
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
7
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
8
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
9
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
10
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
11
दिव्या खोसलासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर भूषण कुमार यांनी सोडलं मौन; म्हणाले...
12
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
13
CAA अंतर्गत भारताचे नागरिकत्व देण्यास सुरुवात, गृहमंत्रालयाने 14 जणांना दिली प्रमाणपत्रे...
14
"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं
15
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
16
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
17
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
18
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
19
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
20
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  

दुसऱ्यांदा चूक झाली की पुन्हा संधी मिळत नाही : जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 3:43 PM

कोकण इतिहास परिषद, आनंद विश्व गुरु कुल ज्येष्ठ रात्र महाविद्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कै. डॉ. दाऊद दळवी स्मृती व्याख्यानमालेचे (पुष्प दुसरे) आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्देदुसऱ्यांदा चूक झाली की पुन्हा संधी मिळत नाही : जिल्हाधिकारी राजेश नार्वेकरकै. डॉ. दाऊद दळवी स्मृती व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प पहिला क्षण हुकल्यावर दुसरा क्षण टिपला तर यश नक्की मिळते : डॉ. आनंद देशमुख

ठाणे : कोकण इतिहास परिषद, आनंद विश्व गुरु कुल ज्येष्ठ रात्र महाविद्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कै. डॉ. दाऊद दळवी स्मृती व्याख्यानमालेत ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, एकदा चूक झाली की दुसºयांदा संधी मिळते पण दुसºयांदा चूक झाली की पुन्हा संधी मिळत नाही. आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर केल्यावर खुप चांगले आयुष्य जगता येते. ज्या माणसाचे छंद आणि व्यवसाय एक आहे त्याच्यासारखा जगात सुखी माणूस नाही.ही व्याख्यानमाला महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी नार्वेकर हे प्रमुख पाहुणे व उद्घाटक म्हणुन उपस्थित होते. पुर्वी ठाणे हे व्याख्यानाचे शहर होते. आजच्या मुलांना इतिहास कालबाह्य झाला असे वाटते. हा समज ३० ते ३५ वर्षांपुर्वी उदयास आला आणि आता ही परिस्थीती सत्य असल्याचा त्यांना वाटत आहे. एकदा अवकाशात झेप घ्यायचे ठरवले की त्या आकाशाची उंची किती आहे याचा विचार करु नका ते गाठायचे ठरले तर निश्चित गाठा असे सांगत त्यांनी आपले अनुभव कथन केले. इतिहास आणि मराठी हे दोन्ही विषय माझ्या आवडीचे होते. जेव्हा या विषयांकडे वळलो तेव्हा तो ध्यास निर्माण झाला. १२ - १४ तास या विषयांचा अभ्यास करु लागलो. त्यानंतर इतिहासात एमए करायचे ठरविले. याच विषयात पीएचडी करण्यासाठी केंद्र सरकारची फेलोशिप देखील मिळाली. डॉक्टर, इंजिनिअर हीच क्षेत्र करिअर नाहीत. जर आवड असेल तर सामाजिक शास्त्रातील विषयाला तेवढीच गती मिळते. दुर्दैवाने पीएचडी करण्याची माझी इच्छा अपुर्ण राहीली परंतू ठाण्यात आल्यावर ही इच्छा पुर्ण करायला हरकत नाही. इतिहास व मराठी वाड्.मय हे विषय घेऊन जो प्रवास सुरू झाला तो विद्यार्थी या पदावरुन जिल्हाधिकारी या पदावर येईपर्यंत ३० वर्षे लागली असे त्यांनी सांगितले. प्रमुख वक्ते म्हणुन उपस्थित असलेले ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. आनंद देशमुख म्हणाले की, इतिहास जगणारा शिक्षक विद्यार्थ्यांा इतिहास शिकवायला भेटला तर मुलांमध्ये या विषयाची आवड निर्माण होईल. पहिला क्षण हुकल्यावर दुसरा क्षण टिपला तर यश नक्की मिळते. इतिहास वेळोवेळी आंतरदृष्टी देते, नविन काहीतरी सुचवत असते. यावेळी कोकण इतिहास परिषदेचे अध्यक्ष रविंद्र लाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर प्रा. प्रदीप ढवळ यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी कोकण इतिहास परिषदेचे कार्यवाह सदाशिव टेटविलकर, विलास ठुसे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. आदीत्य दवणे यांनी केले.

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकMumbaiमुंबई