शहरं
Join us  
Trending Stories
1
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
2
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
3
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
4
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
5
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
6
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
7
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
9
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
10
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
11
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
12
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
14
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
15
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
16
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
17
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
18
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
19
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
20
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते

१५ आॅगस्टपासून हंगाम सुरू करा : मासेमारीसाठी निम्म्याच बोटी समुद्रात, मच्छीमार चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 3:07 AM

सरकारने तीन वर्षांपासून मासेमारीचा १ आॅगस्टपासूनचा ठरवलेला मुहूर्त उत्तन व परिसरातील मच्छीमारांसाठी नुकसानीचा ठरत आहे. खवळलेला समुद्र, वादळी वारे व पाऊस यामुळे उत्तन ते चौक परिसरातील ७५० मासेमारी बोटींपैकी शुक्र वारपर्यंत जेमतेम निम्म्या बोटी मासेमारीसाठी गेल्या.

- धीरज परबमीरा रोड: सरकारने तीन वर्षांपासून मासेमारीचा १ आॅगस्टपासूनचा ठरवलेला मुहूर्त उत्तन व परिसरातील मच्छीमारांसाठी नुकसानीचा ठरत आहे. खवळलेला समुद्र, वादळी वारे व पाऊस यामुळे उत्तन ते चौक परिसरातील ७५० मासेमारी बोटींपैकी शुक्र वारपर्यंत जेमतेम निम्म्या बोटी मासेमारीसाठी गेल्या. खवळलेल्या समुद्रामुळे अनेक बोटी परतल्या. नारळी पौर्णिमा किंवा १५ आॅगस्टपासून मासेमारीचा हंगाम सुरू करा, अशी मागणी मच्छीमारांनी चालवली आहे.दुसरीकडे कर्नाटक, गोवा व गुजरातच्या बोटी राज्याच्या हद्दीत घुसखोरी करतात. शिवाय, पर्सेसीन नेट व मोठ्या यांत्रिकी बोटींची मासेमारी मात्र आधीपासूनच सुरू असल्याने मासळी मिळत नाही. मच्छीमारांकडून पावसाळ्यात बंद असलेली मासेमारी सुरू करण्यासाठी पिढ्यान्पिढ्या परंपरेप्रमाणे चालत आलेल्या नारळी पौर्णिमेचा मुहूर्त ठरलेला असायचा. मासेमारीचा कालावधी व ती कधीपासून सुरू करायची, यावरून विविध भागांतील मच्छीमार यांच्यात मतभेद होत होते. यांत्रिकी बोटी मासेमारीचा हंगाम सुरू होताच जमेल तशी झपाट्याने मासेमारी करत असल्याने पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांच्या हाती नंतर फारशी मासळी लागत नसल्याची तक्र ारही सतत होत असते.तीन वर्षांपासून सरकारने मासेमारी १ आॅगस्टपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला. १ आॅगस्ट उजाडताच यांत्रिकी बोटी समुद्रात मासेमारीसाठी सुसाट जातात. मच्छीमार मात्र खवळलेला समुद्र, वादळी वारे व पावसामुळे अडखळतात. त्याचा पुरेपूर फायदा यांत्रिक बोटीचे मालक घेतात.यामुळे बºयाच मच्छीमारांचे उत्पन्न तर बुडालेच पण साहित्य, पगार यांचा भुर्दंड सोसावा लागला.मत्स्य विभागाकडून मच्छीमारांना टोकन देण्यास सुरूवातउत्तन, पाली, चौक आदी भागांत मासेमारी करणाºया सुमारे ७५० बोटी आहेत. नाखवांनी मासेमारीला जाण्यासाठी लागणारा बर्फ, डिझेल, किराणा आदी भरून घेतले. परंतु, खवळलेला समुद्र आणि वादळी वाºयामुळे निम्म्याच बोटी मासेमारीसाठी रवाना झाल्या. त्यातही अनेक बोटी माघारी फिरल्या.समुद्र खवळलेला असल्याने मासेमारीसाठी मत्स्य विभागाकडून रोज दिले जाणारे टोकनचे कामदेखील बंद केले होते. ११ आॅगस्टपासून टोकन देण्यास पुन्हा सुरुवात झाली आहे. वातावरण चांगले असल्यास आजपासून बोटी मच्छीमारीसाठी जातील, असे बोलले जात आहे.परंपरेप्रमाणे नारळी पौर्णिमेला समुद्राला नारळाचा मान देऊन मासेमारी सुरू करण्यामागे शास्त्रोक्त कारण योग्यच होते. आम्हीही नारळी पौर्णिमा किंवा १५ आॅगस्ट आधी जे येईल, त्यापासून मासेमारी सुरू करा, असे सांगत आहोत. पण, पर्सेसीन नेट व मोठ्या यांत्रिकी बोटी तसेच अन्य राज्यांतील बोटी घुसखोरी करून आधीच मासेमारी करून मोकळे होतात.- बर्नड डिमेलो, मच्छीमार नेतेसुरुवातीचा हंगाम जर सामान्य मच्छीमारांच्या हातून जात असेल, तर १ आॅगस्टपासून मासेमारीचा सरकारचा निर्णय आमच्यासाठी नुकसानकारक ठरला.- विल्यम गोविंद, संचालक,चौक मच्छीमार संस्था

टॅग्स :fishermanमच्छीमारMira Bhayanderमीरा-भाईंदर