शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
2
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
3
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
4
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
5
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
6
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
7
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!
8
सोन्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा? SBI ची मोठी मागणी, म्हणाले घरांमध्ये पडून असलेलं सोनं..
9
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
10
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
11
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
12
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
13
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन
14
धक्कादायक! अखेर ७ सिंहांना मृत्यूदंडाची शिक्षा; 'जंगलाच्या राजा'ला मारण्याची तयारी कोण करतंय?
15
₹१६०० पर्यंत जाणार Paytm चा शेअर; एक्सपर्ट बुलिश, आजही शेअरमध्ये मोठी तेजी
16
'एकाच ठिकाणी.. कुठे तरी राहा' राज ठाकरेंनी पिट्याभाईला सुनावले
17
...अन् व्हीलचेअरवर बसलेल्या प्रतीकासाठी PM मोदींनी स्वतः आणून दिला तिच्या आवडीचा पदार्थ (VIDEO)
18
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
19
Video - बापाची धडपड! ट्रॅफिकमध्ये अडकलेली रुग्णवाहिका, आजारी लेकीला उचलून घेऊन...
20
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती

‘समृद्धी’ची वाट आणखी बिकट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 01:42 IST

मुंबई ते नागपूर हा महाराष्ट्र समृद्धी कॉरिडोर (एमएससी) ७१० किलोमीटरचा असून, ठाणे जिल्ह्यातील ४४ गावांमधून हा महामार्ग जात आहे.

- सुरेश लोखंडेठाणे : मुंबई ते नागपूर हा महाराष्ट्र समृद्धी कॉरिडोर (एमएससी) ७१० किलोमीटरचा असून, ठाणे जिल्ह्यातील ४४ गावांमधून हा महामार्ग जात आहे. जिल्ह्यात या राष्ट्रीय महामार्गाच्या कामास लवकरच प्रारंभ होणार असून त्यासाठी लागणारी वाहने आणि अवाढव्य यंत्रसामग्रीच्या वाहतुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे. या यंत्रसामग्रीच्या वाहतुकीसाठी जिल्ह्याच्या ग्रामीण भागामधील रस्ते वापरले जाणार आहेत; मात्र ते वापरण्यास या गावांमधील ग्रामस्थांकडून विरोध केला जात असल्याने ‘समृद्धी’ची वाट पुन्हा बिकट झाली आहे.शहापूर येथील विहिगाव ते भिवंडी येथील वडपे या दोन गावांदरम्यान ८० ते ८५ किलोमीटरचा समृद्धी महामार्ग जात आहे. त्यासाठी भूसंपादन जवळजवळ पूर्ण झाले आहे. आता हा महामार्ग तयार करण्यासाठी मोठमोठी यंत्रसामग्री आणण्यासह बांधकाम साहित्यपुरवठ्यासाठी वाहनांची येजा राहणार आहे. त्यासाठी लागणाऱ्या रस्त्यांची चाचपणी या महामार्गाचे काम करणाºया कंपनीने केली आहे. मात्र, या वाहनांमुळे रस्त्यांची चाळण होऊन ग्रामीण जनतेला विविध समस्यांना तोंड द्यावे लागणार, म्हणून गावकरी व लोकप्रतिनिधींकडून ग्रामीण रस्त्यांच्या वापरास विरोध केला जात आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेतही या रस्ते वापरण्याच्या ठरावास सदस्यांनी कडाडून विरोध केला.या तीव्र विरोधामुळे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत रस्तेवापराचा ठराव मंजूर होऊ शकला नाही. या वाहनांमुळे खराब होणाºया रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी लागणारा निधी संबंधित कंपनीकडून आधीच जमा करून घेण्याच्या मुद्यालाही विरोध झाल्यामुळे जिल्हा परिषदेला हा ठराव अखेर मागे घ्यावा लागला आहे. समृद्धी राष्टÑीय महामार्ग राज्यातील नागपूर, अमरावती, औरंगाबाद व नाशिक व कोकण या पाच महसूल विभागांतील नागपूर, वर्धा, अमरावती, वाशीम, बुलडाणा, जालना, औरंगाबाद अहमदनगर, नाशिक व ठाणे या १० जिल्ह्यांतील २७ तालुक्यांच्या ३५० गावांमधून जात आहे. नागपूर ते भिवंडीपर्यंतच्या ७१० किलोमीटर अंतराच्या नियोजित मार्गाची आखणी करताना प्रामुख्याने दाट लोकवस्ती, बागायती जमीन, मोठी धरणे, वनजमिनी, जलाशये आणि जंगलांचा भाग वगळण्यात आला आहे.या महामार्गाची रुंदी १२० मीटर एवढी प्रशस्त असून, त्यासाठी ५२ हजार एकर जमिनीचा वापर होत आहे. त्यामध्ये ठाणे जिल्ह्यातील ४४ गावांमधील ९८० शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचा समावेश आहे. हा नागपूर ते मुंबई महाराष्ट्र समृद्धी महामार्ग ठाणे जिल्ह्याच्या भिवंडी, कल्याण या दोन तालुक्यांतून प्रत्येकी १० किलोमीटर गेला आहे. शहापूर तालुक्यातून सर्वाधिक ६० ते ६५ किलोमीटर जात आहे. हा महामार्ग तयार करण्यासाठी आता जोरदार हालचाली सुरू आहेत. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या नियंत्रणातील रस्त्यांचा वापर करून महामार्ग तयार करण्यासाठी लागणारी वाहने, विविध स्वरूपाची यंत्रसामग्री आणण्यासाठी रस्त्यांची शोधाशोध सुरू झाली आहे.महामार्गाच्या कामासाठी मोठ्या प्रमणात जेसीबी, डम्पर, ट्रक, रोलर आणि मोठ्या यंत्रसामग्रीची वाहतूक करण्यासाठी मोठमोठी अवजड वाहने लागणार आहेत. त्यांची ठाणे जिल्ह्यातील रस्त्यांवरून सतत येजा सुरू राहणार आहे. त्यासाठी शहापूर तालुक्यातील दांडा-फुगाळे ते वाशाळा, ढाकणे कोथळे, हिंगळूद या रस्त्यांवरून वाहने रात्रंदिवस येजा करणार आहेत. या रस्त्यांच्या वापरासाठी जिल्हा परिषदेची परवानगी घेणे संबंधित कंपनीला क्रमप्राप्त आहे. त्यासाठी कंपनीने जिल्हा परिषदेकडे पत्रव्यवहार करून परवानगी मागितली आहे. मात्र, अवजड वाहनांच्या वापरासाठी ग्रामीण रस्त्यांची क्षमता नाही. या वाहनांमुळे खराब होणाºया या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठीच करोडो रुपये जिल्हा परिषदेला मोजावे लागतील. याकडेही सदस्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधून बांधकाम विभागाला चांगलेच धारेवर धरले.दुरूस्तीसाठी जिल्हा परिषदेकडे नाही निधी, ग्रामस्थांचाही विरोधयंत्रसामग्रीच्या वाहतुकीमुळे खराब होणाºया रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी जिल्हा परिषदेकडे पुरेसा निधी नसल्यामुळे रस्ते दुरुस्त होणार नाहीत आणि संबंधित गावकºयांना जीवघेण्या रस्त्यांचा वापर करावा लागेल. प्रसंगी त्यात जीव जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही.गावकºयांचे, आदिवासी समाजाचे श्रद्धास्थान असलेले देवस्थान, मंदिर, पवित्र स्थळे या वाहनांच्या वाहतुकीसाठी केल्या जाणाºया रस्ता रूंदीकरणात उद्ध्वस्त करावे लागणार आहेत. रात्रंदिवस वाहतूक करणाºया या वाहनांमुळे गावकºयांचे, गायीगुरांचे, जनावरांचे अपघात होऊन जीव जातील.वर्षानुवर्षे जपलेल्या रस्त्यांच्या दुतर्फा असलेली झाडे रुंदीकरणामुळे तोडली जातील. या आणि अन्य समस्यांकडे लक्ष केंद्रित करून रस्त्यांच्या वापरास जिल्हा परिषदेने विरोध केल्यामुळे समृद्धी महामार्गाचा प्रवास अवघड झाला आहे. ग्रामस्थही या मुद्यावर विरोध करण्याच्या तयारीत आहेत.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गthaneठाणे