शहरं
Join us  
Trending Stories
1
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशूंशी संवाद
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
3
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
4
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
5
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
6
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
9
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
10
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
11
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
12
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
13
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
14
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
15
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
19
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
20
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 

तहानलेल्या ठाण्याच्या जखमेवर चोळले मीठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 00:12 IST

मुंबईची तहान वर्षानुवर्षे भागवणाऱ्या ठाणे जिल्ह्याने भविष्यात नाशिक-अहमदनगर जिल्ह्यांची तहान भागवावी, असा फतवा केंद्रीय परिवहन व जलसंधारणमंत्री नितीन गडकरी यांनी काढल्याने ठाणेकरांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

- नारायण जाधवठाणे : मुंबईची तहान वर्षानुवर्षे भागवणाऱ्या ठाणे जिल्ह्याने भविष्यात नाशिक-अहमदनगर जिल्ह्यांची तहान भागवावी, असा फतवा केंद्रीय परिवहन व जलसंधारणमंत्री नितीन गडकरी यांनी काढल्याने ठाणेकरांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर उल्हासनगर, भिवंडी, मीरा-भार्इंदर अशी सर्वच शहरे भीषण पाणीटंचाईचा सामना करत असताना ३० हजार कोटी रुपयांची धरणे ठाणे जिल्ह्यात बांधून येथील लोकांना तहानलेले ठेवण्याचा गडकरी यांचा उफराटा न्याय कमालीचा अन्यायकारक असल्याचे बोलले जात आहे.गेल्या वर्षीच्या सुरुवातीलाच मुंबई उच्च न्यायालयाने पाणीटंचाईवरून ‘ठाणे जिल्ह्याचा मराठवाडा करणार का’, असे गंभीर भाष्य करून घोडबंदर पट्ट्यातील नव्या बांधकामांवर बंदी घातली होती. आता त्याच ठाणे जिल्ह्यावर गडकरी हे नाशिक-अहमदनगर या दोन जिल्ह्यांची तहान भागवण्याची जबाबदारी ढकलत आहेत.सर्वच राज्यकर्त्यांनी पाण्याच्या बाबतीत ठाणे जिल्ह्याला सापत्न वागणूक दिली आहे. सध्या ठाणे जिल्ह्यात २२ टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील आदिवासी गावपाड्यांसह महानगरांना तहानलेले ठेवून मुंबईतील उत्तुंग टॉवर्संना मुबलक पाणी देण्यात येत असल्याने नागरिकांत संताप असताना गडकरी यांनी जिल्ह्यातील एक कोटी जनतेच्या जखमेवर मीठ चोळल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.ठाण्यात प्रचंड नागरिकीकरण होत आहे. शंभरच्या आसपास गावांतील शेती नष्ट होऊन औद्योगिकीकरण आणि नागरिकीकरणामुळे सिमेंटचे जंगल वाढले आहे. सध्या ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ-बदलापूर या शहरांची पाण्याची गरज १३०७ दशलक्ष लीटर आहे. मात्र भातसा, तानसा, वैतरणा, बारवी, चिखलोली आणि शहाड-टेमघरमधून १२१२ लीटरच पाणी मिळत आहे. वाढते शहरीकरण आणि नव्याने होणाºया उत्तुंग वसाहतींमुळे या परिसरात पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष जाणवत आहे. येथील राज्यकर्ते मात्र सुसरी, मुमरी, शाई, काळू, धरणाचे स्वप्न दाखवत आहेत. त्यासाठी २० वर्षांत त्यांना जमीन संपादित करता आलेली नाही. यामुळे ठाण्याचा मराठवाडा करणार का, ही न्यायालयाने व्यक्त केलेली भीती रास्त आहे.ठाणे जिल्ह्यावरअत्याचाराचा कहर / पान ३>संभाव्य जलस्रोतमुंबई महानगर प्रदेशाची भविष्यातील वाढत्या लोकसंख्येची तहान भागवण्यासाठी पिंजाळ, गारगाई, सुसरी, काळू, कवडास, शाई, पोशीर ही जलसंपदा विभागाची प्रस्तावित धरणे ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत आकार घेणार असून त्यासाठी ठाणे-पालघर जिल्ह्यांतील हजारो हेक्टर शेतजमिनीसह वनजमीन जाणार आहे. हजारो शेतकरी भूमिहीन होणार असून लक्षावधी वृक्षांची कत्तल होणार आहे. हा सर्व आघात ठाणे-पालघर जिल्ह्यांवर होणार असून केंद्रीय मंत्री गडकरी ठाणेकरांना तहानलेले ठेवून नाशिक-अहमदनगरसाठी नव्या धरणांची काळजी वाहू लागले आहेत. ब्रिटिशकाळापासून मुंबई शहराची तहान ठाणे जिल्हा भागवत आला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणे काठोकाठ भरलेली, पण ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील महिला, मुले हंडे-कळशा घेऊन पाण्याकरिता वणवण करत असल्याचे चित्र कित्येक वर्षे दिसत आहे. नितीन गडकरींच्या घोषणेनुसार ३० हजार कोटी रुपये खर्च करून नवी धरणे ठाणे जिल्ह्यात बांधल्यानंतर स्थानिकांना पाण्याकरिता वणवण करावीच लागणार, हे निश्चित आहे.