शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
2
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
3
'तुम्ही सांगा फक्त, नरेंद्र मोदी मतांसाठी स्टेजवर नाचायलाही तयार होतील,' राहुल गांधींची टीका
4
"महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणी SIT स्थापन करा, रणजितसिंह निंबाळकरांना तात्काळ अटक करा’’, कांग्रेसची मागणी 
5
‘केंद्रच्या कर्मचाऱ्यांचा डेटा गेला चीनकडे, देशातील गल्लीबोळाची त्यांना माहिती’, बड्या टेक तज्ज्ञाचा सनसनाटी दावा 
6
बाबोsss.... फुटबॉल विश्वचषकासाठी सौदी अरेबिया बांधणार जगातील पहिले 'स्काय स्टेडियम'
7
डॉक्टर तरुणी रात्री १.३० वाजता हॉटेलमध्ये आली होती; सीसीटीव्ही फुटेज पहिल्यांदाच समोर आले
8
रामकेशच्या हत्येचा फूलप्रूफ प्लॅन बनवला; मग खूनी गर्लफ्रेंडचं रहस्य कसं उघड झालं? पोलिसांनी सांगितली संपूर्ण कहाणी
9
Guruvar Ke Upay: गुरुवार विशेष उपाय कराल, तर एका हळदीच्या गाठीने मालामाल व्हाल!
10
भारताच्या डावपेचामुळे पाकिस्तानचं टेन्शन वाढलं; ८ हजार किमी सीमेवर युद्धाचं सावट, काय घडतंय?
11
IND vs AUS : सूर्याचं 'ग्रहण' सुटलं! हिटमॅन रोहितच्या क्लबमध्ये एन्ट्री; MS धोनीचा विक्रमही मोडला
12
Fact Check: कंडोममुळं तुंबली गर्ल्स हॉस्टेलची पाईपलाईन? व्हायरल व्हिडीओमुळे नको ‘त्या’ चर्चा!
13
मोठी बातमी! भारताकडे निघालेला रशियन तेलाचा टँकर समुद्रातून अचानक माघारी वळला; रिफायनरींची चिंता वाढली...
14
८ व्या वेतन आयोगाचा केव्हापासून मिळणार फायदा, संपूर्ण प्रक्रियेला किती वेळ लागणार? जाणून घ्या
15
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
16
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत दिसल्या स्क्वॉड्रन लीडर शिवांगी सिंग! 'त्या' एका फोटोने पाकिस्तानचा होईल जळफळाट
17
पाकिस्तान करणार हमासचा खात्मा? अमेरिकेची 'चलाख' खेळी; असीम मुनीर २० हजार सैन्य उतरवणार
18
VIDEO: बकरीसोबत रील बनवत होती एक मुलगी, अचानक बकरीने जे केलं... पाहून तुम्हालाही येईल हसू
19
'कांतारा'फेम ऋषभ शेट्टीने साकारला होता 'घाशीराम', गाजलेल्या मराठी नाटकाशी आहे 'हे' कनेक्शन
20
आजोबांच्या संपत्तीवर नातवंडांचा जन्मसिद्ध हक्क नाही; मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय, प्रकरण काय?

काटई-कोळे येथील सखाराम शेठ विद्यालयाची पन्नाशी, मराठी माध्यमाच्या शाळेची आशादायी वाटचाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2017 16:32 IST

शिक्षणात प्रगत झाल्याचा दावा करणा-या सरकारने कमी गुणवत्तेमुळे पटसंख्या खालावत चालल्याने राज्यभरातील तेराशे शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्रजीला वाढावा दिल्याने मराठी शाळा बंद पडत असताना काटई कोळे गाव या ग्रामीण भागातील सखाराम शेठ या शाळेने तब्बल 50 वर्षाची वाटचाल पूर्ण केली आहे.

डोंबिवली : शिक्षणात प्रगत झाल्याचा दावा करणा-या सरकारने कमी गुणवत्तेमुळे पटसंख्या खालावत चालल्याने राज्यभरातील तेराशे शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्रजीला वाढावा दिल्याने मराठी शाळा बंद पडत असताना काटई कोळे गाव या ग्रामीण भागातील सखाराम शेठ या शाळेने तब्बल 50 वर्षाची वाटचाल पूर्ण केली आहे. मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये सखाराम शेठ विद्यालयाची ही पन्नाशी खरोखरच चर्चेचा आणि उल्लेखनिय शैक्षणिक कार्याचा एक चालते बोलते उदाहरण ठरले आहे.  या परिसरातील आागरी नेतृत्व असलेल्या सखाराम शेठ, रतनबुवा पाटील, नकूल पाटील आणि कान्हा पाटील या मंडळींनी मिळून 50 वर्षापूर्वी ग्रामीण भागातील तळागाळातील आगरी समाजातील मुलांना व शेतक-यांच्या मुलांना शिक्षण मिळावे यासाठी शाळा सुरु केली. शाळा अत्यंत छोट्याशा वास्तुत सुरु करण्यात आली होती. त्यासाठी शेतकरी जागृती मंडळाची स्थापना करण्यात आली होती. या मंडळाने या शाळेचा कारभार पाहिला आहे. या मंडळाने ही शाळा तब्बल 50 वर्षे चांगल्या प्रकारे चालविली आहे. एक मराठी शाळा मराठीविषयी प्रतिकूल वातावरण असताना 50 वर्षे चालते. त्यातून अनेक विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडतात. त्यांच्या यशाकडे वाटचाल करतात. हे शाळेसाठी समाधानकारक आहे. शाळेचे अध्यक्ष व माजी विद्यार्थी रमेश पाटील यांनी माजी विद्यार्थ्यांना सोबत घेऊन लोकवर्गणीतून शाळेच्या नव्या इमारतीचे बांधकाम केले. इंग्रजी शाळांना लाजवेल असे सखाराम शेठ विद्यालयाचे रुप पालटले. आजही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सखाराम शेठ विद्यालय हे हक्काचे घर आहे. त्याठिकाणी विद्यार्थ्याला प्रवेश हमखास मिळतो. सरकारकडून मराठी माध्यमाच्या शाळांची गळचेपी केली जात असताना सखाराम शेठ विद्यालय आजही सुरु आहे. प्रतिकूल परिस्थितीत शाळेची 50 वर्षाची वाटचाल ही खरोखरच वाखाणण्या जोगी आहेत. शाळेने 50 वर्षा निमित्त 23 तारखेपासून विविध कार्यक्रम आयोजित केले होते. त्यात आंतरशालेय स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम होते. त्यात विद्यार्थ्यांनी मोठया उत्साहाने सहभाग घेतला. त्यात शिक्षणक वृंदानेही चांगली मेहनत घेतली. आजच्या शेवटच्या दिवशी शाहीर नंदेश उमप यांनी लोकसंस्कृतीचा जागर घातला. तर गायक स्वप्नील बांदोडकर व वेला शेंडे यांच्या गाण्यांनी सगळ्य़ांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत जात असताना त्याचा कळस गाठला तो चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाने सगळ्य़ांच्या पोट्यात यावेळी हसून हसून गोळा आाहे. विद्यार्थ्यांनी काढलेल्या रांगोळया, भरविलेले विज्ञान प्रदर्शन आणि भजन स्पर्धेला उपस्थित मान्यवरांनी चांगली दाद दिली. 

टॅग्स :dombivaliडोंबिवली