शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

सत्ताधारी भाजपाची बहुमताच्या जोरावरील करवाढ अन्यायकारक; काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिल सावंत यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2018 17:27 IST

मीरा-भार्इंदर महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या हेतूने सत्ताधारी भाजपाने थेट नागरीकांच्या माथी करवाढीसह नवीन कर लागू करण्याचा अन्यायकारक कारभार सुरु केला आहे. भाजपा बहुमताच्या जोरावर करीत असलेला हा कारभार आक्षेपार्ह असुन होणारी करवाढ मागे न घेतल्यास तीव्र जनआंदोलन छेडू, असा...

 भार्इंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या हेतूने सत्ताधारी भाजपाने थेट नागरीकांच्या माथी करवाढीसह नवीन कर लागू करण्याचा अन्यायकारक कारभार सुरु केला आहे. भाजपा बहुमताच्या जोरावर करीत असलेला हा कारभार आक्षेपार्ह असुन होणारी करवाढ मागे न घेतल्यास तीव्र जनआंदोलन छेडू, असा इशारा मीरा-भार्इंदर शहर (जिल्हा) काँग्रेस अध्यक्ष अनिल सावंत यांनी दिला आहे. 

सत्ताधारी भाजपा जनतेचा विश्वासघात करीत असल्याचा आरोप सावंत यांनी केला असुन यापुर्वीच्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सत्ताधाऱ्यांनी अशी भरमसाठ कधीही केली नव्हती, असा दावा केला आहे. तत्कालिन स्थायी समितीच्या बैठकांत मालमत्ता करवाढीसह पाणीपट्टीत वाढ करण्यास सत्ताधारी भाजपाने बहुमताने मान्यता दिली आहे. या करवाढीखेरीज नवीन मलप्रवाह कर, घनकचरा शुल्क, पाणीपुरवठा लाभ कर लागू करण्यासही मान्यता दिली असुन यामुळे नागरीकांना वर्षाकाठी अडीच ते दोन हजारांची अन्यायकारक करवाढ सहन करावी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.  भाजपाने एकहाती सत्ता येताच नागरीकांच्या माथी कराचे ओझे टाकण्यास सुरुवात केली आहे. भाजपा सत्ताधारी नागरीकांना अच्छे दिनाऐवजी बुरे दिनातच ढकलत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पालिकेच्या चालू वर्षाच्या अंदाजपत्रकातील आकडे देखील भाजपाच्याच सत्ताकाळात वाढविण्यात आले असुन त्यात देण्यात आलेल्या उत्पन्नाच्या वसुलीचे उद्दीष्ट गाठण्यासाठी अद्याप ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे पालिकेकडे विकासकामांसाठी पुरेसा निधी उपलब्ध नाही. घनकचरा प्रकल्प अद्याप सुरु झाला नसतानाही अन्यायकारक घनकचरा शुल्क लागू करण्यास स्थायीने मान्यता दिली आहे.  ७५ एमएलडी पाणीपुरवठा योजना अद्याप पुर्णपणे कार्यान्वित न होता पालिकेकडुन सध्या केवळ ५० एमएलडी पाणीपुरवठाच नागरीकांना केला जात आहे. उर्वरीत २५ एमएलडी पाणीपुरवठ्याचा अद्याप पत्ता नाही. असे असतानाही भाजपाने पाणीपुरवठा लाभ कर लागू करण्यास मान्यता दिली आहे. हि करवाढ अयोग्य असल्याचे मत सावंत यांनी व्यक्त करुन भाजपाने आपल्या कार्यकाळात कोणतेही लोकाभिमुख कामे न करता त्यात आलेले अपयश झाकण्यासाठीच दरवाढीचा उपद्व्याप सुरु केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. भाजपाने शहरात विविध विकासकामांसाठी कोट्यावधींचा निधी उपलब्ध झाल्याची जाहिरातबाजी केली होती. तो निधी गेला कुठे, असा प्रश्न उपस्थित करुन भाजपाने नागरीकांची केलेली दिशभूल त्वरीत थांबवावी, अशी मागणी त्यांनी यांनी केली आहे. येत्या २० फेब्रुवारीला महासभेऐवजी भाजपाने विशेष महासभा आयोजित केली आहे. हा प्रशासनाचा नव्हे तर भाजपाचा एकतर्फी कारभार सुरु आहे. त्या महाभसेत करवाढीला मान्यता दिल्यास जनक्षोभ उसळून काँग्रेस तीव्र जनआंदोलन छेडेल, असा इशारा त्यांनी दिला आहे. 

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकcongressकाँग्रेस