शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

उल्हासनगरमध्ये सत्तारूढ भाजपा फुटली; शिवसेनेचा कमळाला 'धोबीपछाड'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2019 1:02 PM

उल्हासनगर महापालिकेच्या निवडणुकीत सत्तारूढ भाजपमधील 11 पेक्षा अधिक नगरसेवकांचा गट फुटून बाहेर पडल्याने सभागृहात शिवसेना सदस्यांच्या शेजारी बसल्याने सभागृहात अभूतपूर्व गोंधळ सुरू आहे.

उल्हासनगर - उल्हासनगर महापालिकेच्या निवडणुकीत सत्तारूढ भाजपमधील 11 पेक्षा अधिक नगरसेवकांचा गट फुटून बाहेर पडल्याने आणि तो सभागृहात शिवसेना सदस्यांच्या शेजारी बसल्याने सभागृहात अभूतपूर्व गोंधळ सुरू आहे. शिवसेना- भाजपमध्ये घोषणाबाजी, बाचाबाची, नगरसेवक पळवापळवीचे आरोप, आपापल्या नगरसेवकांना खेचून नेण्याचे प्रकार सुरू असल्याने महापौरपदाची निवडणूक खोळंबली आहे. एक तृतीयांशपेक्षा अधिक सदस्य फुटल्याने या पालिकेतील भाजपची सत्ता जवळपास गेल्यात जमा आहे. ज्या ओमी कलानी यांच्या मदतीमुळे उल्हासनगर महापालिकेत भाजपची सत्ता आली, त्यांना सत्तेचा वाटा देण्यापासून भाजपच्या एका सतत रोखले, कोंडी केली आणि आमदाकरीच्या निवडणुकीवेळी ज्योती कलानी यांना राष्ट्रवादी सोडायला लावून नंतर भाजपतर्फेही उमेदवारी दिली नाही. त्यानंतर उल्हासनगरच्या राजकारणातून कलानी कुटुंब संपवल्याची भाषा केली. त्याचा परिणाम आजच्या घडामोडींवर दिसून आला. भाजपाने या संधीचा फायदा उठवला. उल्हासनगर पालिकेत महापौरपदासाठी ४० सदस्यांची आवश्यकता आहे. सध्या शिवसेनेकडे त्यांचे २५, राष्ट्रवादीचे ४, रिपाइंचे ३, काँग्रेस, भारिप, पीआरपीचे प्रत्येकी एक असे ३५ सदस्य आहेत. त्यात भाजपाचा फुटीर गट समाविष्ट झाल्याने ही संख्या ४६ पेक्षा अधिक झाली आहे. भाजपकडे स्वतःचे ३१, घाईघाईने विलीन करून घेतलेले साई पक्षाचे १० आणि विलीन न होता वेगळे राहिलेले साई पक्षाचेच दोन असे ४३ चे संख्याबळ होते. पण त्यातील किमान ११ पेक्षा अधिक नगरसेवक फुटल्याने त्यांची संख्या घटून ३२ पर्यंत खाली आली आहे. परिणामी शिवसेनेच्या लीलाबाई आशान या महापौर होण्याची दाट शक्यता आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर