शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
2
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
3
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
4
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
5
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
6
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
7
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
8
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
9
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
10
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
11
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
12
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
13
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
14
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
15
कफ सिरपने जीव घेणारी यंत्रणाच ‘विषारी’
16
बांबू मेंटॅलिटी असेल तर यश तुमचेच आहे...
17
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
18
भाई, बाळासाहेबांबद्दल नेमके काय झाले होते, सांगता का..?
19
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

वालधुनी नदीचा शहरांना धोका, गावातील धरणाची भिंत फुटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2019 15:36 IST

वांगणी येथे महापूरस्थिती निर्माण झाल्यानंतर आज जीआयपीआर धरणाची संरक्षक भिंत फुटली.

ठळक मुद्देवांगणी येथे महापूरस्थिती निर्माण झाल्यानंतर आज जीआयपीआर धरणाची संरक्षक भिंत फुटली.अंबरनाथ तालुक्यातील काकोले गावात असणाऱ्या ब्रिटिश कालीन तलावाची ओव्हरफ्लोची भिंत फुटली आहे.

अंबरनाथ - तालुक्यातील काकोळे गावाच्या शिवारात असलेल्या काकोले जीआयपीआर धरणाची संरक्षण भिंत मुसळधार पावसाने फुटली. त्यामुळे आजुबाजूच्या शहरांना धोका निर्माण झाला आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधून उगम पावणाऱ्या वालधुनी नदीवरच्या जीआयपीआर धरणाच्या संरक्षक भिंतीला तडे गेले होते. तडे गेल्‍याने त्यामधून मोठ्या प्रमाणात पाण्याचे विसर्ग होत होता, हे धरण रेल्‍वे प्रशासनाच्या अखत्‍यारीत येत असल्‍याने नागरिकांनी याविषयी रेल्‍वे प्रशासनाकडे तक्रार केली होती. मात्र, रेल्वे प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. 

वांगणी येथे महापूरस्थिती निर्माण झाल्यानंतर आज जीआयपीआर धरणाची संरक्षक भिंत फुटली. यामुळे काकोले गावांसह आजुबाजूच्या शहरांना धोका निर्माण झाला आहे. अंबरनाथ तालुक्यातील काकोले गावात असणाऱ्या ब्रिटिश कालीन तलावाची ओव्हरफ्लोची भिंत फुटली आहे. त्यामुळे भात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर उल्हासनगर, अंबरनाथ, कल्याण आदी शहरांना व रहिवाशांना या पाण्याचा धोका निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वी स्थानिकांनी संरक्षण भिंतीला तडे गेल्‍याचे वृत्त प्रसारित केले होते. मात्र, रेल्वे प्रशासनाने वेळीच दखल न घेतल्याने सध्या आजुबाजूच्या शहरांना या पाण्याचा धोका निर्माण झाला आहे. हजारो एकर जमिनीवरील भात पीक पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले असून, अनेक शेतीचे बांध फुटले आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. कल्याण, विठ्ठलवाडी, उल्हासनगर, अंबरनाथमध्ये वालधुनी नदीचे पाणी शिरुन शहरांना मोठा घोका निर्माण झाला आहे. 

टॅग्स :thaneठाणेambernathअंबरनाथDamधरणRainपाऊसrailwayरेल्वे