शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

वालधुनी नदीचा शहरांना धोका, गावातील धरणाची भिंत फुटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2019 15:36 IST

वांगणी येथे महापूरस्थिती निर्माण झाल्यानंतर आज जीआयपीआर धरणाची संरक्षक भिंत फुटली.

ठळक मुद्देवांगणी येथे महापूरस्थिती निर्माण झाल्यानंतर आज जीआयपीआर धरणाची संरक्षक भिंत फुटली.अंबरनाथ तालुक्यातील काकोले गावात असणाऱ्या ब्रिटिश कालीन तलावाची ओव्हरफ्लोची भिंत फुटली आहे.

अंबरनाथ - तालुक्यातील काकोळे गावाच्या शिवारात असलेल्या काकोले जीआयपीआर धरणाची संरक्षण भिंत मुसळधार पावसाने फुटली. त्यामुळे आजुबाजूच्या शहरांना धोका निर्माण झाला आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधून उगम पावणाऱ्या वालधुनी नदीवरच्या जीआयपीआर धरणाच्या संरक्षक भिंतीला तडे गेले होते. तडे गेल्‍याने त्यामधून मोठ्या प्रमाणात पाण्याचे विसर्ग होत होता, हे धरण रेल्‍वे प्रशासनाच्या अखत्‍यारीत येत असल्‍याने नागरिकांनी याविषयी रेल्‍वे प्रशासनाकडे तक्रार केली होती. मात्र, रेल्वे प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. 

वांगणी येथे महापूरस्थिती निर्माण झाल्यानंतर आज जीआयपीआर धरणाची संरक्षक भिंत फुटली. यामुळे काकोले गावांसह आजुबाजूच्या शहरांना धोका निर्माण झाला आहे. अंबरनाथ तालुक्यातील काकोले गावात असणाऱ्या ब्रिटिश कालीन तलावाची ओव्हरफ्लोची भिंत फुटली आहे. त्यामुळे भात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर उल्हासनगर, अंबरनाथ, कल्याण आदी शहरांना व रहिवाशांना या पाण्याचा धोका निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वी स्थानिकांनी संरक्षण भिंतीला तडे गेल्‍याचे वृत्त प्रसारित केले होते. मात्र, रेल्वे प्रशासनाने वेळीच दखल न घेतल्याने सध्या आजुबाजूच्या शहरांना या पाण्याचा धोका निर्माण झाला आहे. हजारो एकर जमिनीवरील भात पीक पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले असून, अनेक शेतीचे बांध फुटले आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. कल्याण, विठ्ठलवाडी, उल्हासनगर, अंबरनाथमध्ये वालधुनी नदीचे पाणी शिरुन शहरांना मोठा घोका निर्माण झाला आहे. 

टॅग्स :thaneठाणेambernathअंबरनाथDamधरणRainपाऊसrailwayरेल्वे