शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

वालधुनी नदीचा शहरांना धोका, गावातील धरणाची भिंत फुटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2019 15:36 IST

वांगणी येथे महापूरस्थिती निर्माण झाल्यानंतर आज जीआयपीआर धरणाची संरक्षक भिंत फुटली.

ठळक मुद्देवांगणी येथे महापूरस्थिती निर्माण झाल्यानंतर आज जीआयपीआर धरणाची संरक्षक भिंत फुटली.अंबरनाथ तालुक्यातील काकोले गावात असणाऱ्या ब्रिटिश कालीन तलावाची ओव्हरफ्लोची भिंत फुटली आहे.

अंबरनाथ - तालुक्यातील काकोळे गावाच्या शिवारात असलेल्या काकोले जीआयपीआर धरणाची संरक्षण भिंत मुसळधार पावसाने फुटली. त्यामुळे आजुबाजूच्या शहरांना धोका निर्माण झाला आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधून उगम पावणाऱ्या वालधुनी नदीवरच्या जीआयपीआर धरणाच्या संरक्षक भिंतीला तडे गेले होते. तडे गेल्‍याने त्यामधून मोठ्या प्रमाणात पाण्याचे विसर्ग होत होता, हे धरण रेल्‍वे प्रशासनाच्या अखत्‍यारीत येत असल्‍याने नागरिकांनी याविषयी रेल्‍वे प्रशासनाकडे तक्रार केली होती. मात्र, रेल्वे प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. 

वांगणी येथे महापूरस्थिती निर्माण झाल्यानंतर आज जीआयपीआर धरणाची संरक्षक भिंत फुटली. यामुळे काकोले गावांसह आजुबाजूच्या शहरांना धोका निर्माण झाला आहे. अंबरनाथ तालुक्यातील काकोले गावात असणाऱ्या ब्रिटिश कालीन तलावाची ओव्हरफ्लोची भिंत फुटली आहे. त्यामुळे भात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर उल्हासनगर, अंबरनाथ, कल्याण आदी शहरांना व रहिवाशांना या पाण्याचा धोका निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वी स्थानिकांनी संरक्षण भिंतीला तडे गेल्‍याचे वृत्त प्रसारित केले होते. मात्र, रेल्वे प्रशासनाने वेळीच दखल न घेतल्याने सध्या आजुबाजूच्या शहरांना या पाण्याचा धोका निर्माण झाला आहे. हजारो एकर जमिनीवरील भात पीक पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले असून, अनेक शेतीचे बांध फुटले आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. कल्याण, विठ्ठलवाडी, उल्हासनगर, अंबरनाथमध्ये वालधुनी नदीचे पाणी शिरुन शहरांना मोठा घोका निर्माण झाला आहे. 

टॅग्स :thaneठाणेambernathअंबरनाथDamधरणRainपाऊसrailwayरेल्वे