शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

आरटीईच्या दुसऱ्या फेरीतील प्रवेशाना विलंग;ठाणेच्या पालकांमध्ये तीव्र संताप

By सुरेश लोखंडे | Updated: May 26, 2019 19:01 IST

सुरेश लोखंडे लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : शिक्षणाचा हक्क (आरटीई) या कायद्याखाली जिल्ह्यातील इंग्रजी व मराठी माध्यमांसह अन्य भाषीक ...

ठळक मुद्देपहिल्या फेरीत पाच हजार ८९६ बालकांची निवड झाली दुस-या फेरीच्या प्रवेश विलंब- पालकांमध्ये संतापतीन किमी. लांबच्या शाळांमध्ये आता प्रवेश

सुरेश लोखंडेलोकमत न्यूज नेटवर्कठाणे : शिक्षणाचा हक्क (आरटीई) या कायद्याखाली जिल्ह्यातील इंग्रजी व मराठी माध्यमांसह अन्य भाषीक माध्यमांच्या शाळांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल व मागासवर्गीय कुटुंबातील बालकांच्या प्रवेशासाठी २५ टक्के जागा आरक्षित ठेवण्यात आलेल्या आहेत. या आरक्षिात जागांवर पहिल्या फेरीचे प्रवेश झाले. मात्र दुस-या फेरीच्या प्रवेशासाठी २० मेपर्यंत सोडत काढली जाणार होती. मात्र त्यास विलंब झाल्यामुळे पालकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.केजी ते पहिलीच्या वर्गात बालकांना विनामूल्य प्रवेश दिला जाणार आहे. यासाठी जिल्ह्यातीलमराठी, हिंदी आणि इंग्रजी माध्यमाचे दर्जेदार शिक्षण देणा-या ६५२ शाळांमध्ये यंदा १३ हजार ४०० प्रवेश आरटीई कायद्याखाली आरक्षित ठेवले आहेत. यापैकी आतापर्यंत तीन हजार ५९७ विद्यार्थ्यांचे पहिल्या फेरीत केजी ते पहिलीच्या वर्गात प्रवेश झाले आहे. उर्वरित प्रवेशासाठी दुस-या फेरीसाठी अजूनही सोडत काढण्यात आलेली नाही. यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण असून संतापही व्यक्त होत आहे.आरटीईचे प्रवेश यंदाही उशिराने होत असल्यामुळे संबंधीत बालकांच्या पालकांना या उन्हाळ्याच्या सुटीत ही गावी किंवा अन्यत्र जाता आले नाही. कोणत्याही क्षेणी बालकाच्या प्रवेशासाठी बोलवण्यात येईल. त्यापेक्षा गावी किंवा अन्यत्र फिरायला जाणे पालकांनी टाळले आहेत. या दुसºया फेरीत संधीत मिळताच प्रवेश घेऊन पालक गांवी जाण्याच्या मानसिकतेत होते. परंतू जूनच्या पहिल्या आठवड्यात या दुस-या फिेरीसाठी सोडत काढण्यात येणार असल्याची चर्चा सुरू झाल्यामुळे पालकांमध्ये तीर्व संताप ऐकायला मिळत आहे.जिल्ह्याभरात ११ हजार ७७६ प्रवेश पहिलीच्या वर्गात होतील. यातून पहिल्या फेरीत पाच हजार ८९६ बालकांची निवड झाली असता यातील चार हजार ६२० बालकांचे पहिलीच्या वर्गात प्रवेश होणार होते. मात्र तीन हजार १९० बालकांचे प्रवेश झाले. पूर्व प्राथमिक म्हणजे केजीच्या वर्गातील प्रवेशासाठी एक हजार २७६ बालकांची निवड झाली होती त्यापैकी ७६७ बालकांचे संबंधीत शाळांमध्ये प्रवेश झाले. आता दुस-या फेरीच्या प्रवेशाना विलंब करून पालकांना वेठीस धरले जात धरले जात असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे.* तीन किमी. लांबच्या शाळांमध्ये आता प्रवेश -पहिल्या सोडतमध्ये निवड झालेल्या बालकांचे प्रवेश एक किमी. अंतरावरील शाळांमध्ये झाले आहेत. आता दुसºया सोडतमध्ये निवड होणा-या बालकांचे प्रवेश १ ते तीन किमी.च्या अंतरावरील शाळांमध्ये होणार आहे.

टॅग्स :thaneठाणेSchoolशाळाStudentविद्यार्थी