शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
8
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
9
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
10
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
11
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
12
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
13
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
14
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
15
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
16
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
17
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
18
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
19
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
20
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षा भाडेवाढीने सर्वसामान्यांचे गणित आणखी कोलमडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : संपूर्ण ठाणे शहरात २५ हजार, तर जिल्हाभर सव्वालाखांच्या घरात अधिकृत रिक्षांची संख्या आहे. सध्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : संपूर्ण ठाणे शहरात २५ हजार, तर जिल्हाभर सव्वालाखांच्या घरात अधिकृत रिक्षांची संख्या आहे. सध्या १८ रुपये प्रती दीड किलोमीटर असलेल्या प्रवासी मीटर भाड्यात तीन रुपयांची भर पडणार आहे. त्यामुळे ते एकदम २१ रुपयांवर जाणार आहे. आधीच पेट्रोलसह इतर वस्तूंच्या वाढलेल्या किमतींमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले असतानाच, आता या भाडेवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित आणखी कोलमडणार आहे. रिक्षा चालकांनी मात्र या भाडेवाढीचे समर्थन केले आहे.

कोरोनाच्या काळात रिक्षा चालकांनी नियमांचे पालन केले. मात्र, अनलॉकनंतर अनेक नियमांचे रिक्षा चालकांकडून सर्रास उल्लंघन होत आहे. दोनऐवजी चार ते पाच प्रवाशांची वाहतूक बेकायदेशीरपणे केली जाते. मास्क आणि सॅनिटायझरही अनेक रिक्षांमधून गायब झाले आहे. पेट्रोल, डिझेल दरवाढीमुळे रिक्षांनाही भाडेवाढ लागू केली आहे. खरे तर शहरी भागात सीएनजीवरील रिक्षांचे प्रमाण जास्त असताना, ही भाडेवाढ होणे योग्य नसल्याचे मत अनेक प्रवाशांनी व्यक्त केले आहे. ही भाडेवाढ करण्याआधीच लोकमान्यनगर ते ठाणे रेल्वे स्थानक शेअररिंगच्या रिक्षामध्ये १८ रुपये भाडे लॉकडाऊनच्या आधी लागत होते. ते नंतर प्रति प्रवासी थेट ३० रुपये केले. ठाणे ते कळवादरम्यानचे भाडे १२ वरून १५ रुपये झाले. माजीवडा येथील प्रवासासाठीही २० वरून ३० रुपये केले आहेत. ठाणे स्थानक ते मानपाडा ३० वरून ४० रुपये केले आहेत. अशा अनेक ठिकाणी रिक्षा चालकांनी अघोषित भाडेवाढ प्रवाशांवर लादलेलीच होती, तशी ती सध्याही सुरू आहे. मीटरवरील काही रिक्षा चालकांनी प्रामाणिकपणे व्यवसाय केला. यात अनेकांवर कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊनच्या काळात उपासमारीची वेळ आली. अनेकांना बँकेचे हप्ते भरणेही मुश्कील झाले, परंतु काहींनी याही काळात ठाण्यातून घोडबंदर आणि मीरा रोड किंवा भिवंडीत जाण्यासाठी अव्वाच्या सव्वा भाडे घेतले. सध्याही ठाणे स्थानकातून मीरा रोड किंवा भिवंडीला जाण्यासाठी मीटरने ४०० ते ४५० रुपये होतात. त्याऐवजी ६०० ते ७०० रुपयांचे बोली भाडे सांगितले जाते. यात नवखा प्रवासी असेल, तर त्याच्याकडून याहीपेक्षा जास्त भाडे उकळले जाते. तीनहात नाका येथूनही घोडबंदरकडे जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात भाडे आकारले जाते. जांभळी नाका येथून रेल्वे स्थानक भागातून नौपाडा किंवा तीनहात नाका भागाकडे जाण्यासाठी भाडे नाकारले जाते. नौपाड्यातून ठाणे रेल्वे स्थानकाकडे जाण्यासाठीही रिक्षा मिळत नाही. अनेकदा प्रवाशांसोबत अरेरावी केली जाते. भाडेवाढ करताना ती एकदम तीन रुपये नको, रिक्षा चालकांनीही सौजन्याने वागणूक दिली पाहिजे, अशा माफक अपेक्षा प्रवाशांनी व्यक्त केल्या आहेत.

.............

मुळात, २०१५ नंतर रिक्षाची भाडेवाढ झालेली नव्हती. भारतीय प्रशासकीय सेवेतील निवृत्त अधिकारी खटुआ यांच्या समितीने सुचविलेली भाडेवाढ शासनाने मान्य केली आहे. ती सुरुवातीच्या दीड किलोमीटरसाठी १८ वरून २१ रुपये होणार आहे.

जयंत पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, ठाणे

..........................

रिक्षा प्रवासाची भाडेवाढ ही सर्वसामान्यांना परवडणारी नाही. जसे पेट्रोल, डिझेलचे दर वाढले, तसे खासगी आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारातही वाढ होणे अपेक्षित आहे. तसे झाले, तर रिक्षाप्रमाणे इतरही महागाईचा फटका सर्वसामान्यांना बसणार नाही.

सरिता कांबळे, प्रवासी, ठाणे

..........................

सहा वर्षांपासून रिक्षाची भाडेवाढ नव्हती. सर्व स्पेअर पार्टच्या आणि सीएनजीच्या दरातही गेल्या सहा वर्षांत वाढ झाली. कोरोना काळातही रिक्षा चालकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. त्यामुळे ही भाडेवाढ योग्यच आहे.

सुनिल वाघमारे, रिक्षा चालक, ठाणे

....................

शासनाने केलेली ही भाडेवाढ आहे. सर्वसामान्य रिक्षा चालकांना यातून दिलासा मिळेल.

बाळासाहेब पाटील, पोलीस उपायुक्त, ठाणे शहर

.................

भाडेवाढीचा निर्णय उत्तम. कोरोनाचे जे संकट आहे, त्यावर काही प्रमाणात तरी दिलासा मिळेल.

रवींद्र पाफाळे, रिक्षा चालक, मानपाडा, ठाणे

...........................

कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. अनेकांचे पगार निम्मे झालेत. त्यात रिक्षाची भाडेवाढ होणे, म्हणजे सामान्य प्रवाशांना मोठा भुर्दंड पडणार आहे. भाडेवाढ आणखी काही कालांतराने व्हायला अपेक्षित होती.

उत्तम लोखंडे, प्रवासी, ठाणे