शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
2
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
3
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
4
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
5
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
6
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
7
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
8
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
9
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
10
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
11
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
12
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
13
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
14
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
15
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
16
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
17
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
18
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
19
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
20
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले

जिल्हाधिकाऱ्यांकडून संचारबंदीचे निर्बंध शिथील; व्यापाऱ्यांमध्ये समाधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2021 17:54 IST

जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाच्या आदेशान्वये त्यांच्या नियंत्रणातील क्षेत्रतील सर्व अत्यावश्यक सेवांची दुकाने सायंकाळी 4 वाजेर्पयत सुरू ठेवण्याच्या आदेशासह याच कालावधीत इतर वस्तूंचा व्यवहार करणाऱ्या आस्थापना सोमवार ते शुक्र वारपर्यंत सुरू ठेवण्यास सहमती दिली आहे.

ठळक मुद्देकेंद्र व राज्य शासनाने नागरिकांची गर्दी होऊ नये आणि परस्पर संपर्क वाढून विषाणूचा संसर्ग वाढू नये, यासाठी संपूर्ण राज्यभरात वेळोवेळी संचार बंदी घोषीत करून मार्गदर्शक सूचना, आदेश जारी केले आहेत

ठाणे :  जिल्ह्यातील कोरोना रूग्ण संख्या वाढीचा व उपाचार्थी रूग्णांचा दर लक्षात घेऊन ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी लागू असलेल्या संचारबंदीचे निर्बंध नव्याने काही अंशी शिथील केल्याचे आदेश सोमवारपासून जारी केले आहेत. त्यामध्ये सोमवार ते शुक्रवार या कालावधीत दुकानांना सायंकाळी 4 वाजेर्पयत सुरू ठेवण्याच्या परवानगीसह परिवहन सेवा 100 टक्के प्रवासी क्षमतेने सुरू ठेवणे, लग्न समारंभासाठी 50 जणांची उपस्थिती, अंत्यविधीला 20 जणं, मॉल, सिनेमागृह मात्र बंदच असणार आहेत. तर, शनिवार, रविवार या सुटीच्या दिवसी मात्र आत्ताचे निर्बंध लागू ठेवले आहेत.        

केंद्र व राज्य शासनाने नागरिकांची गर्दी होऊ नये आणि परस्पर संपर्क वाढून विषाणूचा संसर्ग वाढू नये, यासाठी संपूर्ण राज्यभरात वेळोवेळी संचार बंदी घोषीत करून मार्गदर्शक सूचना, आदेश जारी केले आहेत. मात्र शासनाच्या नवीन आदेशास अनुसरून या र्निबधांना पुन्हा शिथील करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी मिरा-भाईंदर, भिवंडी-निजामपूर, उल्हासनगर महानगरपालिकां, अंबरनाथ, कुळगांव-बदलापूर नगरपरिषद, शहापूर, मुरबाड नगर पंचायत क्षेत्र व संपूर्ण ग्रामीण भागात लागू केले आहेत. यासाठी जारी केलेले आदेश 7 जून रोजी सकाळी 7 वाजेपासून 13 जून रोजी मध्यरात्री 12 वाजेर्पयत लागू केलेले आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाच्या आदेशान्वये त्यांच्या नियंत्रणातील क्षेत्रतील सर्व अत्यावश्यक सेवांची दुकाने सायंकाळी 4 वाजेर्पयत सुरू ठेवण्याच्या आदेशासह याच कालावधीत इतर वस्तूंचा व्यवहार करणाऱ्या आस्थापना सोमवार ते शुक्र वारपर्यंत सुरू ठेवण्यास सहमती दिली आहे. तर मॉल व सिनेमागृह,नाटय़गृह बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहे. रेस्टॉरंटस सोमवार ते शुक्र वार 50 टक्के बैठक क्षमतेने सायंकाळी 4 वाजेर्पयत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. यानंतर मात्र शनिवारी आणि रविवारी फक्त टेक अवे, पार्सल सर्विसेस आणि होम डिलेव्हरी सेवा देता येणार आहे.  

उपनगरीय लोकल वाहतुकीबाबत बृहन्ममुंबई महानगरपालिकेने निर्गमित केलेले आदेश लागू ठेवलेले आहेत. सार्वजनिक ठिकाणो, खुली मैदाने, चालणे, सायकलींग दररोज सकाळी 5 वाजेपासून सकाळी 9 वाजेर्पयत सुरू ठेवता येतील. खासगी कार्यालयांना कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सायंकाळी 4 वाजेपर्यंत सूट देण्यात आलेली आहे. कार्यालयीन उपस्थिती शासकीय कार्यालयांसह खाजगी कार्यालयांना 50 टक्के क्षमतेने सुरू राहील. चित्रीकरण सायंकाळी 4 वाजेर्पयत ठेवता येईल. यानंतर मात्र कोणत्याही हालचाली सुरू ठेवण्यात मनाई करण्यात आली आहे.

सामाजिक मेळावे, सांस्कृतिक, करमणूक कार्यक्रम 50 टक्के क्षमतेने सोमवार ते शुक्रवार सायंकाळर्पयत ठेवण्यास परवानगी आहे. लग्न समारंभ फक्त 5क् लोकांच्या उपस्थितील करता येईल. अंत्यसंस्कार विधी फक्त 20 लोकांच्या उपस्थितीमध्ये पार पडेल. बैठका, सहकारी संस्थांच्या निवडणूका सभागृहाच्या 50 टक्के बैठक क्षमतेने घेता येतील. बांधकामे केवळ ऑनसाईट मजूर राहणाऱ्या ठिकाणी किंवा सायंकाळी 4 वाजेपर्यंत कामगारांनी कामाचे ठिकाण सोडले पाहिजे, या अटीवर परवानगी आहे. कृषि सेवा दुकाने परवानगी दिलेल्या वेळेत सुरू राहणार आहेत.                  ई-कॉमर्स साहित्य व सेवा पूर्वीप्रमाणो नियमीत सुरू ठेवता येतील. जमावबंदी सायंकाळी 5 वाजेर्पयत व संचारबंदी सायंकाळी 5 वाजेपासून लागू राहणार आहे. व्यायामशाळा, केश कर्तनालय, ब्यूटी सेंटर्स, स्पा, वेलनेस सेंटर्स सायंकाळर्पयत अध्र्या क्षमतेने सुरू ठेवता येतील. सार्वजनीक परिवहन सेवा 100 टक्के बैठक क्षमतेने सुरू ठेवता येणार आहे. मात्र, प्रवाशांना उभे राहून प्रवास करण्यास मनाई आहे. मालवाहतूक जास्तीत जास्त तीन व्यक्तींसह करता येईल. खासगी कार, टॅक्सी, बस लांब पल्ल्याच्या गाड्याद्वारे होणाऱ्या प्रवासासाठी परवानगी घ्यावी लागेल. उत्पादन निर्यातीचे बंधन पूर्ण करण्याची आवश्यकता असलेल्या एमएसएमईसह निर्यात करणारे यूनिट नियमीतपणो राहील. उत्पादन सेक्टरमधील यूनिट केवळ 50 टक्के कर्मचारी क्षमतेने सुरू ठेवण्यास परवानगी आहे.

ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकां क्षेत्रामध्ये संबंधित महानगरपालिका आयुक्त तथा इन्सीहन्ट कमांडर यांनी पारीत केलेले आदेश त्या-त्या महापालिका क्षेत्रमध्ये आपत्ती व्यवस्थापन कायद्याखाली लागू राहतील. या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश आहे. या आदेशाची अंमलबजावणी करण्यास कोणत्याही व्यक्तीने टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधीताचे विरुद कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका