शहरं
Join us  
Trending Stories
1
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
2
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
3
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
5
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
6
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
7
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
8
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

‘टोरंट’विरोधात रहिवासी आज उतरणार रस्त्यावर; साखळी उपोषणाच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2019 12:10 AM

कळवा, मुंब्रा, दिवा परिसरात तीव्र असंतोष

ठाणे : कळवा-मुंब्रा-शीळ-देसाई-दिवा विभागातील वीजवितरण आणि वीजबिल वसुलीचे खाजगीकरण करण्यात आले असून त्याचे कंत्राट टोरंट या कंपनीला दिले आहे. यामुळे महावितरणला सक्षम करून टोरंट कंपनीला हद्दपार करा या मागणीसाठी अनेक दिवसांपासून या भागात आंदोलन सुरू असून आता त्याची धार अधिक तीव्र करण्यात आली आहे. त्यानुसार गुरुवारी टोरेन्ट हटाव, वीज ग्राहक बचाव अशी मागणी करून जिल्हाधिकारी कार्यालयावर जनमोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती टोरंट हटाव कृती समितीने दिली.

टोरंट हटाव कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. यावेळी शिवसेनेचे नगरसेवक उमेश पाटील, माजी नगरसेवक हिरा पाटील आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते. टोरेन्ट संदर्भात यापूर्वी वारंवार बैठकीचे आश्वासन देण्यात आले होते. त्यानुसार तीन वेळा बैठका लावण्यात आल्या. मात्र, त्या रद्द करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. मध्यतंरी खासदार श्रीकांत शिंदे यांनी यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्यापही त्यावर योग्य तो तोडगा निघालेला नाही. भिवंडीतील रहिवासी या खाजगीकरणाच्या विरोधात आहेत, त्यामुळे उद्या या भागात खाजगीकरण झाले तर येथील समस्यांमध्ये आणखी भर पडणार आहे.या उलट महावितरणचे सक्षमीकरण करण्यात यावे, नवीन भरती प्रक्रिया राबवावी, प्रिपेड मीटर लावावेत अशी मागणीही यावेळी त्यांनी केली आहे.तर नोव्हेंबरपासून उपोषणआता विविध आंदोलने, मोर्चे काढूनही कळवा आणि मुंब्रा भागात या कंपनीच्या माध्यमातून कामे सुरू झाली आहेत. तसेच येत्या ३१ आॅक्टोबरच्या रात्रीपासून ते खऱ्या अर्थाने वेगाने काम सुरूअसल्याची शक्यताही वर्तविली जात आहे. त्यामुळेच आम्ही हा मोर्चा काढत असल्याचे सांगितले. यानंतरही शासनाला जाग आली नाही तर मात्र नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ साखळी उपोषण केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. तर या मोर्चात आमदार जितेंद्र आव्हाड, राजू पाटील हेदेखील सहभागी होणार असल्याचा दावाही त्यांनी केला.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडmumbraमुंब्रा