शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

भातसा धरणातून आरक्षित पाणी मिळावे; भिवंडी पालिकेची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2020 23:07 IST

वाढत्या लोकसंख्येनुसार अपुरा पुरवठा, प्रस्ताव सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला

वासिंद : भिवंडी महापालिका क्षेत्रातील वाढती लोकसंख्या, नागरीकरण यामुळे अपुरी पाणी समस्या जाणवत असल्याने शहराला भातसा धरणातून आरक्षित पाणी मिळावे अशी मागणी करण्यात आली आहे.

ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात असलेले भातसा धरणाचे पाणी शेती सिंचन तसेच व इतर वापरासाठी उपयुक्त ठरत आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायती, कारखाने, वीजनिर्मिती प्रकल्प, भातशेती यांच्यासह ठाणे व मुंबई महापालिका यांच्या मागणीनुसार पाणी पुरवठा करण्यात येतो. या धरणाची ९७६.१० दशलक्ष घनमीटर पाणी क्षमता असून सध्या ७३५.०६८ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध आहे.ठाणे, मुंबई महापालिका बरोबरच वाढत्या पाण्याच्या गरजेनुसार भिवंडी महापालिकेनेही शहराला १०० दशलक्ष लिटर पाणी मिळावे अशी मागणी केली असून हा प्रस्ताव सरकारकडे पाठविण्यात आला असल्याचे भातसा कालवा विभागाकडून सांगण्यात आले.भातसा नदीजवळ असलेल्या शहापूर, कल्याण व इतर तालुक्यातील ३८ ग्रामपंचायती, जे.एस.डब्ल्यू, व लिबर्टी कंपनी तसेच भातसाधरण, सरलांबे, खुटघर, कासगांव येथील वीजनिर्मिती प्रकल्प केंद्र यांना पाणी दिले जाते. त्याचबरोबर ठाणे, मुंबई महापालिकेच्या मागणीनुसार पाणी पुरवठा केला जात असून सध्या ठाणे २०० दशलक्ष लिटर तर मुंबई १८५० दशलक्ष लिटर रोजची मागणी आहे. हंगाम लागवडीसाठी सध्या उजव्या तीर (कालव्याद्वारे) १७५ क्युसेसने पाणी सोडण्यात आले आहे. भातसा धरणातील पाणी भातसा उजवा कालवाद्वारे हंगाम भातशेतीसाठी तर भातसा नदीतून पिसे बंधाऱ्यापर्यंत पोहचवून त्यानंतर ठाणे-मुंबई शहराला पुरवठा तसेच नदीतून इतरांना वापरासाठी उचलले जाते.

टॅग्स :Damधरण