शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

भातसा धरणातून आरक्षित पाणी मिळावे; भिवंडी पालिकेची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2020 23:07 IST

वाढत्या लोकसंख्येनुसार अपुरा पुरवठा, प्रस्ताव सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला

वासिंद : भिवंडी महापालिका क्षेत्रातील वाढती लोकसंख्या, नागरीकरण यामुळे अपुरी पाणी समस्या जाणवत असल्याने शहराला भातसा धरणातून आरक्षित पाणी मिळावे अशी मागणी करण्यात आली आहे.

ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात असलेले भातसा धरणाचे पाणी शेती सिंचन तसेच व इतर वापरासाठी उपयुक्त ठरत आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायती, कारखाने, वीजनिर्मिती प्रकल्प, भातशेती यांच्यासह ठाणे व मुंबई महापालिका यांच्या मागणीनुसार पाणी पुरवठा करण्यात येतो. या धरणाची ९७६.१० दशलक्ष घनमीटर पाणी क्षमता असून सध्या ७३५.०६८ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध आहे.ठाणे, मुंबई महापालिका बरोबरच वाढत्या पाण्याच्या गरजेनुसार भिवंडी महापालिकेनेही शहराला १०० दशलक्ष लिटर पाणी मिळावे अशी मागणी केली असून हा प्रस्ताव सरकारकडे पाठविण्यात आला असल्याचे भातसा कालवा विभागाकडून सांगण्यात आले.भातसा नदीजवळ असलेल्या शहापूर, कल्याण व इतर तालुक्यातील ३८ ग्रामपंचायती, जे.एस.डब्ल्यू, व लिबर्टी कंपनी तसेच भातसाधरण, सरलांबे, खुटघर, कासगांव येथील वीजनिर्मिती प्रकल्प केंद्र यांना पाणी दिले जाते. त्याचबरोबर ठाणे, मुंबई महापालिकेच्या मागणीनुसार पाणी पुरवठा केला जात असून सध्या ठाणे २०० दशलक्ष लिटर तर मुंबई १८५० दशलक्ष लिटर रोजची मागणी आहे. हंगाम लागवडीसाठी सध्या उजव्या तीर (कालव्याद्वारे) १७५ क्युसेसने पाणी सोडण्यात आले आहे. भातसा धरणातील पाणी भातसा उजवा कालवाद्वारे हंगाम भातशेतीसाठी तर भातसा नदीतून पिसे बंधाऱ्यापर्यंत पोहचवून त्यानंतर ठाणे-मुंबई शहराला पुरवठा तसेच नदीतून इतरांना वापरासाठी उचलले जाते.

टॅग्स :Damधरण