शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

भातसा धरणातून आरक्षित पाणी मिळावे; भिवंडी पालिकेची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2020 23:07 IST

वाढत्या लोकसंख्येनुसार अपुरा पुरवठा, प्रस्ताव सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला

वासिंद : भिवंडी महापालिका क्षेत्रातील वाढती लोकसंख्या, नागरीकरण यामुळे अपुरी पाणी समस्या जाणवत असल्याने शहराला भातसा धरणातून आरक्षित पाणी मिळावे अशी मागणी करण्यात आली आहे.

ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात असलेले भातसा धरणाचे पाणी शेती सिंचन तसेच व इतर वापरासाठी उपयुक्त ठरत आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायती, कारखाने, वीजनिर्मिती प्रकल्प, भातशेती यांच्यासह ठाणे व मुंबई महापालिका यांच्या मागणीनुसार पाणी पुरवठा करण्यात येतो. या धरणाची ९७६.१० दशलक्ष घनमीटर पाणी क्षमता असून सध्या ७३५.०६८ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध आहे.ठाणे, मुंबई महापालिका बरोबरच वाढत्या पाण्याच्या गरजेनुसार भिवंडी महापालिकेनेही शहराला १०० दशलक्ष लिटर पाणी मिळावे अशी मागणी केली असून हा प्रस्ताव सरकारकडे पाठविण्यात आला असल्याचे भातसा कालवा विभागाकडून सांगण्यात आले.भातसा नदीजवळ असलेल्या शहापूर, कल्याण व इतर तालुक्यातील ३८ ग्रामपंचायती, जे.एस.डब्ल्यू, व लिबर्टी कंपनी तसेच भातसाधरण, सरलांबे, खुटघर, कासगांव येथील वीजनिर्मिती प्रकल्प केंद्र यांना पाणी दिले जाते. त्याचबरोबर ठाणे, मुंबई महापालिकेच्या मागणीनुसार पाणी पुरवठा केला जात असून सध्या ठाणे २०० दशलक्ष लिटर तर मुंबई १८५० दशलक्ष लिटर रोजची मागणी आहे. हंगाम लागवडीसाठी सध्या उजव्या तीर (कालव्याद्वारे) १७५ क्युसेसने पाणी सोडण्यात आले आहे. भातसा धरणातील पाणी भातसा उजवा कालवाद्वारे हंगाम भातशेतीसाठी तर भातसा नदीतून पिसे बंधाऱ्यापर्यंत पोहचवून त्यानंतर ठाणे-मुंबई शहराला पुरवठा तसेच नदीतून इतरांना वापरासाठी उचलले जाते.

टॅग्स :Damधरण