शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

भाताला शासनाने दिला जास्त भाव, रवींद्र चव्हाण यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2019 02:53 IST

आघाडी सरकारच्या काळात भाताला प्रतिक्विंटलला ७५० रुपये भाव दिला जात होता. मात्र, भाजपा सरकारने एक हजार ७५० रुपयांचा भाव दिला आहे, अशी माहिती राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी गुरुवारी येथे दिली.

डोंबिवली : आघाडी सरकारच्या काळात भाताला प्रतिक्विंटलला ७५० रुपये भाव दिला जात होता. मात्र, भाजपा सरकारने एक हजार ७५० रुपयांचा भाव दिला आहे, अशी माहिती राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी गुरुवारी येथे दिली.राज्य सरकारच्या कृषी विभागाने डोंबिवलीतील क्रीडासंकुलात भरवलेल्या ‘कृषी महोत्सव २०१९’ चे उद्घाटन चव्हाण यांच्या हस्ते गुरुवारी झाले. याप्रसंगी महापौर विनीता राणे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंजूषा जाधव, कृषी सहसंचालक विकास पाटील, आत्मा प्रकल्पाचे संचालक पी.एम. चांदवडे, कृषी अधिकारी अंकुश माने आदी मान्यवर उपस्थित होते.चव्हाण यांनी सांगितले की, ‘द्राक्षे उत्पादन करणारा नाशिकचा शेतकरी सधन आहे. ठाणे जिल्ह्यातील शेतकरीदेखील सधन झाला पाहिजे. झटपट पैसा मिळवण्याच्या नादात ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेतजमीन विकू नये. शेतकºयांनी शेतीत काय उत्तम पिकू शकते, हे जाणून घेण्यासाठी कृषी अधिकाºयांमार्फत मुद्रा (सॉइल) कार्ड तयार केले पाहिजे. तसेच शेतीला पूरक असलेल्या जोडव्यवसायांकडेही वळले पाहिजे.’/चव्हाण पुढे म्हणाले की, ‘बाजारात गीर गायीच्या तुपाला जास्त किंमत मिळते. गीर गायींचे पालन करण्यासाठी सरकार पैसा देते. त्यामुळे पशुपालनाचा विचार जिल्ह्यातील शेतकºयांनी केला पाहिजे.’चव्हाण पुढे म्हणाले, ‘शेततळ्यासाठी सरकार अनुदान देते. त्या माध्यमातून शेततळे उभारल्यास त्यातून शेतीला पाणी मिळू शकते. तसेच शेततळ्यात मत्स्यशेतीही केली जाऊ शकते. बासा माशाला बाजारात चांगली मागणी आहे. मोठ्या हॉटेल्समध्ये हा मासा खाल्ला जातो. त्याला चांगला भाव मिळतो. त्यामुळे शेततळ्याच्या माध्यमातून मत्स्यशेती करण्यावर भर दिला पाहिजे. खाडी परिसरातील शेतात कडधान्यांचे पीक घेता येऊ शकते. भातशेतीसह पशुपालन, फुलशेती, फळभाज्यांची शेती याकडे शेतकºयांनी वळल्यास त्यांना जोडधंदा मिळून त्यांच्या हाती पैसा येऊ शकतो. त्यातून तो सधन होऊ शकतो.’सहसंचालक पाटील म्हणाले, गटशेती योजनेच्या माध्यमातून एका गटाला शेतीसाठी एक कोटी रुपये दिले जातात. मागच्या व यंदाच्या वर्षी मिळून नऊ कोटी रुपयांचे अनुदान देण्यासाठी १४ गटांची निवड केली आहे. यांत्रिकीकरणासाठी शेतकºयांना दीड कोटी रुपयांचे वाटप केले आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकºयांना भरपाईपोटी २४ कोटी रुपयांचे वाटप केले आहे. भात आणि आंबा पीक विमा योजनेंतर्गत नुकसान झालेल्या पिकांसाठी अडीच कोटींची भरपाई दिली आहे.ठाणे जिल्ह्यातील शेतकरी भेंडीचे उत्पादन घेतात. निर्यात करण्याच्या दर्जाची भेंडी पिकवली जाते. एक हजार भेंडी पीक उत्पादकांची नोंदणी जिल्ह्यात करण्यात आली आहे. त्याचबरोबर फळबागांची ४५० हेक्टर जमिनीवर लागवड केली आहे. ठिबक व सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून पिके घेतली जात आहेत, असे पाटील यांनी यावेळी सांगितले.शेतकºयांचा सत्कार : यावेळी मान्यवरांच्या हस्ते शेतकरी दिलीप देशमुख, सुरेश भोईर, विनायक पोटे, विजया पोटे, लक्ष्मण पागी, कैलास बराड आदी ३१ शेतकºयांचा सत्कार करण्यात आला. टिटवाळा येथील माँ जिजाऊ अपंग गट, घोटसईला तीन लाख ३१ हजार रुपयांचा धनादेश मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला.हळद, सेंद्रिय गूळ, औषधी वनस्पतीकृषी महोत्सव यापूर्वी ठाण्यात भरवला होता. डोंबिवलीत सरकारच्या पुढाकाराने प्रथमच तो होत आहे. ११ फेब्रुवारीपर्यंत सकाळी ९ ते रात्री ८ यावेळेत त्याला भेट देता येईल. महोत्सवात हळद, सेंद्रिय गूळ, कडधान्ये, विविध प्रकारचा तांदूळ, मिरगुंडे, औषधी वनस्पती विक्रीस असून त्यांचे १३५ स्टॉल्स आहेत.मंत्र्यांनी फिरवली पाठकृषी महोत्सवाचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार होते. याप्रसंगी पालकमंत्री एकनाथ शिंदे व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत उपस्थित राहणार होते. मात्र, या तिन्ही मंत्र्यांनी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी पाठ फिरवल्याने महोत्सवाचे उद्घाटन एक तास उशिराने झाले.ठाणे जिल्ह्यात खातेदार असलेल्या शेतकºयांची संख्या एक लाख ३२ हजार आहे. असे असताना उद्घाटनाच्या वेळी शेतकºयांची उपस्थिती कमी होती.दरम्यान, यावेळी भेंडी उत्पादक शेतकºयांनी राज्यमंत्री चव्हाण यांना भेंडीचा एक बॉक्स भेट दिला.

टॅग्स :thaneठाणे