पावसाळी पिकनिक पोस्टपोन्ड
By Admin | Updated: June 21, 2016 01:09 IST2016-06-21T01:09:59+5:302016-06-21T01:09:59+5:30
पावसाळ्याला नुकतीच सुरुवात झाल्याने अनेक सहलप्रेमींच्या पावसाळी सहलीच्या बेतांना सुरुवात झाली आहे. तसाही पावसाळा लांबल्याने त्यांचा चांगलाच हिरमोड झाला होता

पावसाळी पिकनिक पोस्टपोन्ड
प्रज्ञा म्हात्रे, ठाणे
पावसाळ्याला नुकतीच सुरुवात झाल्याने अनेक सहलप्रेमींच्या पावसाळी सहलीच्या बेतांना सुरुवात झाली आहे. तसाही पावसाळा लांबल्याने त्यांचा चांगलाच हिरमोड झाला होता. मात्र, आता नुकतीच पावसाने हजेरी लावल्याने वीकेंड्सना पर्यटनस्थळी झुंबड उडण्याची शक्यता आहे.
पावसाळ्यात निसर्ग बहरलेला असतो. हा बहरेलाला निसर्ग सहलप्रेमींना खुणावत असतो. त्यामुळे जून महिना सुरू झाला की सहलप्रेमींच्या पिकनिक प्लॅनला उधाण येते. सोशल साईट्सपासून अगदी मित्रांच्या कट्ट्यावर सहलींच्या चर्चा रंगू लागतात. मग जवळच्या ठिकाणी जायचे का लांबच्या, धबधबे, फार्महाऊसला जायचे की, ट्रेकिंग, रिसॉर्टला यावर गप्पा सुरू होतात. लोणावळा, भंडारदरा, कोंडेश्वर, वदप, भुशी डॅम, भिवपुरी, माशळेज, पळसदरी, माथेरान तर ट्रेकिंगसाठी गड - किल्ले अशा अनेक ठिकाणांची निवड सुरू होते. या सर्वच ठिकाणी जाण्यासाठी सहलप्रेमी उत्सुक आहेत. परंतु, निम्मा जून उलटला तरी पावसाचे चिन्ह नसल्याने त्यांच्या प्लानला कात्री लागली. पहिला पाऊस गेल्या आठवड्यात झाला खरा परंतु, काही वेळापुरताच. पहिल्या पावसानंतर पाऊस गायब झाला आहे. तो अद्याप बरसायचे काही नाव घेईना. गेल्या वर्षीदेखील जून महिन्यातील विकेण्ड कोरडेच गेले होते आणि शेवटच्या आठवड्यात धुवाधार पावसाने एन्ट्री केली होती. मात्र यंदाही सहलप्रेमींच्या प्लानवर पाणी फेरले गेले असून पावासाची वाट पाहण्याशिवाय कोणता पर्याय उरलेला नाही.
पाऊस लांबल्याने आमच्या पूर्ण ग्रुपचा हिरमोड झाला आहे. यंदाच्या उन्हाने हैराण झाल्याने आम्ही पावसाचा आनंद लुटण्यासाठी पिकनिकला जाण्याचे ठरविले होते. परंत, मान्सूनच्या लेट एन्ट्रीमुळे सर्वच प्लॅनवर पाणी फिरले आहे. लोणावळा खंडाळ््याच्या निसर्गाचा, धबधब्यांचा आनंद लुटण्यासाठी अजून किती दिवस वाट पाहावी लागेल. चातकाप्रमाणे आम्हीदेखील पावसाची वाट पाहत आहोत.
- अजिंक्य गावकर
नेहमीप्रमाणे यंदाही पावसाळ्यात पिकनिकला जाण्याचे ठरविले खरे, परंतु पावसाने दांडी मारल्याने हिरमोड झाला आहे.
- संतोष शर्मा
पाऊस पडत नसल्यामुळे पिकनिकवर पाणी तर फिरले गेलेच. पण या अवघ्या महाराष्ट्राचीदेखील चिंता वाटत आहे. पाऊस लवकर यावा आणि पाण्याची आणि पिकनिकची तहान भागवावी.
- पुष्कर रासम
पावसाने हुल दिल्यामुळे सर्वच जण पेचात पडले आहेत. उन्हाळयाने त्रस्त झालेल्यांना पावसाळी पिकनिकला जाण्याची आस लागली आहे. प्लॅन तर करत आहोत. पण ते सध्या पेण्डिंग ठेवले आहेत.
- हनिफ तडवी