शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
प्रकाश महाजन शिंदेसेनेत प्रवेश करणार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
3
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
4
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, भरबाजारात मारहाण करून घेतला जीव
5
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
8
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
9
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
10
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
11
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
12
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
13
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
14
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे फळबागांचेही नुकसान, शेतकरी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 02:25 IST

ठाणे जिल्ह्यातील ४२ हजार २६२.३१ हेक्टरवरील भात पिकांचे नुकसान झाल्याचे जाहीर झाले. मात्र याप्रमाणेच उपयुक्त असलेल्या २४.१७ हेक्टरवर असलेल्या फळबागांचे नुकसानही कल्याण व अंबरनाथ तालुक्यात झाल्याचे निदर्शनास आले आहे.

ठाणे : जिल्ह्यातील ४२ हजार २६२.३१ हेक्टरवरील भात पिकांचे नुकसान झाल्याचे जाहीर झाले. मात्र याप्रमाणेच उपयुक्त असलेल्या २४.१७ हेक्टरवर असलेल्या फळबागांचे नुकसानही कल्याण व अंबरनाथ तालुक्यात झाल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे १३ लाखांच्या जवळपास नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यांच्या नुकसान भरपाईच्या दृष्टीने प्रयत्न होण्याची गरज आहे.भाताच्या ४२ हजार हेक्टरसह नागलीचे १२७ हेक्टर आणि वरी पिकाचे ३७ हेक्टर आदी ४२ हजार ४२६.३१ हेक्टरवरील पिकांच्या नुकसान भरपाईसाठी पहिल्या टप्प्यात आठ कोटी २० लाख ६८ हजार रूपयांची भरपाई आली आहे. तहसीलदारांच्या नियंत्रणात या रकमेचे वाटपही जिल्ह्यात सुरू आहे. पण फळबागांच्या नुकसानीचीदेखील भरपाई शेतकऱ्यांना मिळणे अपेक्षित आहे. कल्याण तालुक्यात ८.७२ हेक्टरवरील फळबागा आणि अंबरनाथ तालुक्यातील १५.४५ हेक्टर आदी २४ हेक्टरपेक्षा जास्त फळबागांच्या नुकसानीचा फटका शेतकºयांना बसला आहे. त्यांचीदेखील नुकसान भरपाई शेतकºयाना मिळण्याची अपेक्षा शेतकºयांकडून व्यक्त होत आहे.रब्बी हंगामाच्या जनजागृतीसाठी जिल्ह्यात शेतक-यांचे मेळावेठाणे : यंदा जिल्ह्यात अतिवृष्टी, पूरस्थिती आणि अवकाळी पावसाने शेतीचे नुकसान झाले. या संकटावर मात करण्यासाठी रब्बी हंगामाचे क्षेत्र वाढविण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेच्या कृषि विभागाव्दारे विविध उपक्र म हाती घेण्यात आले आहेत. ३० नोव्हेंबरपर्यंत गावोगावी कृषी मेळावे घेवून भाजीपाल्याचे जास्तीत जास्त उत्पादन घेण्याबाबत मार्गदर्शन केले जात आहे. कल्याण येथील बापसई येथील मेळाव्यात कलापथकाच्या माध्यमातून शेतकºयांना रब्बीचे महत्त्व पटवून दिले आहे. बापसईचा शेतकरी मेळावा जिल्हा परिषदेचे कृषी, पशुसंवर्धन व दुग्धशाळा सभापती किशोर जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी कल्याण पंचायत समिती सभापती भारती टेभे, कल्याण तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, तसेच कृषि विकास अधिकारी मनोजकुमार ढगे, गटविकास अधिकारी श्वेता पालवे आदी उपस्थित होते. या मेळाव्यात कोसबड हिल कृषी केंद्राचे शास्त्रज्ञ, सर्व कृषी अधिकारी व विस्तार अधिकारी यांनी भात पीक व भाजीपाला व इतर सर्व पिकाची लागवड, उत्पन्न, सेंद्रीय खतांचा वापर याबाबत योग्य मार्गदर्शन केले. यावेळी कृषी विभागाच्या विविध योजना व पिकाच्या माहितीची घडी पत्रिका वाटप करण्यात आली. एमएसआरएलएम हिरकणी योजनेव्दारे सहा बचत गटांना ५२ हजार ५०० रूपयांच्या धनादेशाचे वाटप यावेळी करण्यात आले. जिल्ह्यातील अन्य गावखे्यांमध्येही रब्बी हंगामाच्या जनजागृतीसाठी उपक्रम हाती घेतले आहेत. त्याद्वारे घेण्यात येत असलेल्या मेळाव्यांमध्ये, गावसभेत शेतकºयांना हरबरा, वाल, मूग आणि इतर कडधान्य लागवडीची माहिती दिली जात आहे. भाजीपाला पिके, कीटकनाशक फवारणी मार्गदर्शन, बीजप्रक्रिया, जिल्हा परिषद तसेच राज्य शासनाच्या कृषि विषयक योजनांची माहिती शेतकºयांना देण्यात येत आहे. बंधारे बांधकामात पुढाकार घेणाºया गावांमध्ये जास्तीत जास्त क्षेत्र भाजीपाला या पिकाखाली येईल यादृष्टीनेही नियोजन सुरू असल्याचे ढगे यांनी लोकमतला सांगितले.

टॅग्स :Farmerशेतकरीthaneठाणे