शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
3
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
4
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
5
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
6
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
7
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
8
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
9
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
10
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
11
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
12
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
13
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
14
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
15
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
16
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
17
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
18
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
19
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
20
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा

पावसामुळे फळबागांचेही नुकसान, शेतकरी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 02:25 IST

ठाणे जिल्ह्यातील ४२ हजार २६२.३१ हेक्टरवरील भात पिकांचे नुकसान झाल्याचे जाहीर झाले. मात्र याप्रमाणेच उपयुक्त असलेल्या २४.१७ हेक्टरवर असलेल्या फळबागांचे नुकसानही कल्याण व अंबरनाथ तालुक्यात झाल्याचे निदर्शनास आले आहे.

ठाणे : जिल्ह्यातील ४२ हजार २६२.३१ हेक्टरवरील भात पिकांचे नुकसान झाल्याचे जाहीर झाले. मात्र याप्रमाणेच उपयुक्त असलेल्या २४.१७ हेक्टरवर असलेल्या फळबागांचे नुकसानही कल्याण व अंबरनाथ तालुक्यात झाल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे १३ लाखांच्या जवळपास नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यांच्या नुकसान भरपाईच्या दृष्टीने प्रयत्न होण्याची गरज आहे.भाताच्या ४२ हजार हेक्टरसह नागलीचे १२७ हेक्टर आणि वरी पिकाचे ३७ हेक्टर आदी ४२ हजार ४२६.३१ हेक्टरवरील पिकांच्या नुकसान भरपाईसाठी पहिल्या टप्प्यात आठ कोटी २० लाख ६८ हजार रूपयांची भरपाई आली आहे. तहसीलदारांच्या नियंत्रणात या रकमेचे वाटपही जिल्ह्यात सुरू आहे. पण फळबागांच्या नुकसानीचीदेखील भरपाई शेतकऱ्यांना मिळणे अपेक्षित आहे. कल्याण तालुक्यात ८.७२ हेक्टरवरील फळबागा आणि अंबरनाथ तालुक्यातील १५.४५ हेक्टर आदी २४ हेक्टरपेक्षा जास्त फळबागांच्या नुकसानीचा फटका शेतकºयांना बसला आहे. त्यांचीदेखील नुकसान भरपाई शेतकºयाना मिळण्याची अपेक्षा शेतकºयांकडून व्यक्त होत आहे.रब्बी हंगामाच्या जनजागृतीसाठी जिल्ह्यात शेतक-यांचे मेळावेठाणे : यंदा जिल्ह्यात अतिवृष्टी, पूरस्थिती आणि अवकाळी पावसाने शेतीचे नुकसान झाले. या संकटावर मात करण्यासाठी रब्बी हंगामाचे क्षेत्र वाढविण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेच्या कृषि विभागाव्दारे विविध उपक्र म हाती घेण्यात आले आहेत. ३० नोव्हेंबरपर्यंत गावोगावी कृषी मेळावे घेवून भाजीपाल्याचे जास्तीत जास्त उत्पादन घेण्याबाबत मार्गदर्शन केले जात आहे. कल्याण येथील बापसई येथील मेळाव्यात कलापथकाच्या माध्यमातून शेतकºयांना रब्बीचे महत्त्व पटवून दिले आहे. बापसईचा शेतकरी मेळावा जिल्हा परिषदेचे कृषी, पशुसंवर्धन व दुग्धशाळा सभापती किशोर जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी कल्याण पंचायत समिती सभापती भारती टेभे, कल्याण तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, तसेच कृषि विकास अधिकारी मनोजकुमार ढगे, गटविकास अधिकारी श्वेता पालवे आदी उपस्थित होते. या मेळाव्यात कोसबड हिल कृषी केंद्राचे शास्त्रज्ञ, सर्व कृषी अधिकारी व विस्तार अधिकारी यांनी भात पीक व भाजीपाला व इतर सर्व पिकाची लागवड, उत्पन्न, सेंद्रीय खतांचा वापर याबाबत योग्य मार्गदर्शन केले. यावेळी कृषी विभागाच्या विविध योजना व पिकाच्या माहितीची घडी पत्रिका वाटप करण्यात आली. एमएसआरएलएम हिरकणी योजनेव्दारे सहा बचत गटांना ५२ हजार ५०० रूपयांच्या धनादेशाचे वाटप यावेळी करण्यात आले. जिल्ह्यातील अन्य गावखे्यांमध्येही रब्बी हंगामाच्या जनजागृतीसाठी उपक्रम हाती घेतले आहेत. त्याद्वारे घेण्यात येत असलेल्या मेळाव्यांमध्ये, गावसभेत शेतकºयांना हरबरा, वाल, मूग आणि इतर कडधान्य लागवडीची माहिती दिली जात आहे. भाजीपाला पिके, कीटकनाशक फवारणी मार्गदर्शन, बीजप्रक्रिया, जिल्हा परिषद तसेच राज्य शासनाच्या कृषि विषयक योजनांची माहिती शेतकºयांना देण्यात येत आहे. बंधारे बांधकामात पुढाकार घेणाºया गावांमध्ये जास्तीत जास्त क्षेत्र भाजीपाला या पिकाखाली येईल यादृष्टीनेही नियोजन सुरू असल्याचे ढगे यांनी लोकमतला सांगितले.

टॅग्स :Farmerशेतकरीthaneठाणे