शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे फळबागांचेही नुकसान, शेतकरी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 02:25 IST

ठाणे जिल्ह्यातील ४२ हजार २६२.३१ हेक्टरवरील भात पिकांचे नुकसान झाल्याचे जाहीर झाले. मात्र याप्रमाणेच उपयुक्त असलेल्या २४.१७ हेक्टरवर असलेल्या फळबागांचे नुकसानही कल्याण व अंबरनाथ तालुक्यात झाल्याचे निदर्शनास आले आहे.

ठाणे : जिल्ह्यातील ४२ हजार २६२.३१ हेक्टरवरील भात पिकांचे नुकसान झाल्याचे जाहीर झाले. मात्र याप्रमाणेच उपयुक्त असलेल्या २४.१७ हेक्टरवर असलेल्या फळबागांचे नुकसानही कल्याण व अंबरनाथ तालुक्यात झाल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे १३ लाखांच्या जवळपास नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यांच्या नुकसान भरपाईच्या दृष्टीने प्रयत्न होण्याची गरज आहे.भाताच्या ४२ हजार हेक्टरसह नागलीचे १२७ हेक्टर आणि वरी पिकाचे ३७ हेक्टर आदी ४२ हजार ४२६.३१ हेक्टरवरील पिकांच्या नुकसान भरपाईसाठी पहिल्या टप्प्यात आठ कोटी २० लाख ६८ हजार रूपयांची भरपाई आली आहे. तहसीलदारांच्या नियंत्रणात या रकमेचे वाटपही जिल्ह्यात सुरू आहे. पण फळबागांच्या नुकसानीचीदेखील भरपाई शेतकऱ्यांना मिळणे अपेक्षित आहे. कल्याण तालुक्यात ८.७२ हेक्टरवरील फळबागा आणि अंबरनाथ तालुक्यातील १५.४५ हेक्टर आदी २४ हेक्टरपेक्षा जास्त फळबागांच्या नुकसानीचा फटका शेतकºयांना बसला आहे. त्यांचीदेखील नुकसान भरपाई शेतकºयाना मिळण्याची अपेक्षा शेतकºयांकडून व्यक्त होत आहे.रब्बी हंगामाच्या जनजागृतीसाठी जिल्ह्यात शेतक-यांचे मेळावेठाणे : यंदा जिल्ह्यात अतिवृष्टी, पूरस्थिती आणि अवकाळी पावसाने शेतीचे नुकसान झाले. या संकटावर मात करण्यासाठी रब्बी हंगामाचे क्षेत्र वाढविण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेच्या कृषि विभागाव्दारे विविध उपक्र म हाती घेण्यात आले आहेत. ३० नोव्हेंबरपर्यंत गावोगावी कृषी मेळावे घेवून भाजीपाल्याचे जास्तीत जास्त उत्पादन घेण्याबाबत मार्गदर्शन केले जात आहे. कल्याण येथील बापसई येथील मेळाव्यात कलापथकाच्या माध्यमातून शेतकºयांना रब्बीचे महत्त्व पटवून दिले आहे. बापसईचा शेतकरी मेळावा जिल्हा परिषदेचे कृषी, पशुसंवर्धन व दुग्धशाळा सभापती किशोर जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी कल्याण पंचायत समिती सभापती भारती टेभे, कल्याण तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, तसेच कृषि विकास अधिकारी मनोजकुमार ढगे, गटविकास अधिकारी श्वेता पालवे आदी उपस्थित होते. या मेळाव्यात कोसबड हिल कृषी केंद्राचे शास्त्रज्ञ, सर्व कृषी अधिकारी व विस्तार अधिकारी यांनी भात पीक व भाजीपाला व इतर सर्व पिकाची लागवड, उत्पन्न, सेंद्रीय खतांचा वापर याबाबत योग्य मार्गदर्शन केले. यावेळी कृषी विभागाच्या विविध योजना व पिकाच्या माहितीची घडी पत्रिका वाटप करण्यात आली. एमएसआरएलएम हिरकणी योजनेव्दारे सहा बचत गटांना ५२ हजार ५०० रूपयांच्या धनादेशाचे वाटप यावेळी करण्यात आले. जिल्ह्यातील अन्य गावखे्यांमध्येही रब्बी हंगामाच्या जनजागृतीसाठी उपक्रम हाती घेतले आहेत. त्याद्वारे घेण्यात येत असलेल्या मेळाव्यांमध्ये, गावसभेत शेतकºयांना हरबरा, वाल, मूग आणि इतर कडधान्य लागवडीची माहिती दिली जात आहे. भाजीपाला पिके, कीटकनाशक फवारणी मार्गदर्शन, बीजप्रक्रिया, जिल्हा परिषद तसेच राज्य शासनाच्या कृषि विषयक योजनांची माहिती शेतकºयांना देण्यात येत आहे. बंधारे बांधकामात पुढाकार घेणाºया गावांमध्ये जास्तीत जास्त क्षेत्र भाजीपाला या पिकाखाली येईल यादृष्टीनेही नियोजन सुरू असल्याचे ढगे यांनी लोकमतला सांगितले.

टॅग्स :Farmerशेतकरीthaneठाणे