शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

ठाणे जिल्ह्यात चार दिवस पाऊस थंडवणार; तानसाचे ११ तर मोडक सागरचे दोन दरवाजे उघडले

By सुरेश लोखंडे | Updated: July 28, 2023 18:43 IST

ठाणे जिल्ह्यात संततधार सुरू असलेला पाऊस आता पुढील पाच दिवस थंडवणार आहे.

ठाणे : जिल्ह्यात संततधार सुरू असलेला पाऊस आता पुढील पाच दिवस थंडवणार आहे. मात्र आतापर्यंत पडलेल्या संततधार पावसामुळे तानसा पाठोपाठ मोडक सागरही भरले आहे. या दोन्ही धरणांचे अनुक्रमे ११ व दोन दरवाजे उघडण्यात आले आहे. या धरणांसह बारवी धरणा खालील गांवाना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. बारवी धरणात सध्या ९१ टक्के पाणी साठा तयार झालेला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास धरण भरण्याची दाट शक्यता आहे.

जिल्ह्यातील पावसाचा शुक्रवारी ऑरेंज अलर्ट होता. त्यामुळे शाळा, महाविद्यालयांना सुटी देण्यात आली होती. मात्र पुढील तीन दिवस एलो अलर्ट असून एक दिवस ग्रीन अलर्ट हवामान खात्याने जारी केला आहे. त्यामुळे तब्बल महिन्याभरापासून सुरू असलेला पाऊस आता काही दिवस थंडवणार असल्याचा आंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरात कमी अधीक पाऊस पडला. यामध्ये सर्वाधिक अंबरनाथला सरासरी३१.३८ मिमी., भिवंडीला १४.३३ मिमी, कल्याणला २६.३० मिमी, मुरबाडला २७.१० मिमी, शहापूरला २७.२५मिमी. आणि ठाणे तालुक्यात २३.२९ मिमी. पाऊस सकाळपासून सायंकाळपर्यंत पडल्याची नोंद घेण्यात आली आहे. धरणांच्या पाणलोटातही पावसाचा जोर कायम आहे. मोडक सागर भरल्यामुळे आता या धरणातून पाच हजार २२ क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर तानसा धरणातून १२ हजार १०० क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे. बारवी धरण कोणत्याही क्षणी भरण्याच्या स्थितीत आहे.

तलावांमधील पाणी साठा -धरणाचे नाव - साठा दलघमीमध्ये- टक्के

  • भातसा - ६४९.६६ - ६८.९६ टक्के
  • अ.वैतरणा -१९९.६३- ६०.२५
  • आंध्रा - २३१.१२ - ६८.१५
  • मो.सागर - १२८.९३- १००
  • तानसा - १४४.४८- ९९.५८
  • म.वैतरणा- १५४.२५- ७९.७०
  • बारवी - ३११.३१- ९१.४३
टॅग्स :thaneठाणेRainपाऊस