शहरं
Join us  
Trending Stories
1
...मग काय अमित शाह येताहेत का इंडिया आघाडीत?, आम्ही त्यांना पंतप्रधान करतो : संजय राऊत
2
Amit Shah : Video - "तीन टप्प्यात भाजपाने किती जागा जिंकल्या?"; अमित शाह यांची 'भविष्यवाणी'
3
“बोरिवलीपासून कोकण रेल्वेला जोडणारी वाहतूकसेवा लवकरच सुरु करणार”: पीयूष गोयल 
4
जलेबी बाबाचा तुरूंगात मृत्यू! मादक पदार्थ देऊन महिलांवर करायचा बलात्कार, अनेकांना फसवले
5
देशाला दुसऱ्या फाळणीकडे नेण्याच्या काँग्रेसच्या षडयंत्राला 'उबाठा'चीही मान्यता; भाजपाचा हल्लाबोल 
6
भारतामध्ये ६५ वर्षांत हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली, अहवालावरून खळबळ, भाजपा-कांग्रेसचे आरोप प्रत्यारोप   
7
WhatsApp कॉल आता आणखी सोपे होणार! नवीन फीचर कॉल मॅनेजमेंटला सुपरफास्ट बनवणार
8
अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ! दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी ईडी मोठं पाऊल उचलणार
9
देसी सुपरस्टार मनोज वाजपेयींच्या 'भैय्याजी'चा अ‍ॅक्शनपॅक ट्रेलर भेटीला
10
अक्षय्य तृतीया: कर्माचे श्रेष्ठत्व सांगणारे, आद्य समाजसुधारक, संत महात्मा बसवेश्वरांची जयंती
11
IPL 2024: लखनौच्या फ्रँचायझीने पोलिसांचे १० कोटी रूपये थकवले; एका सामन्याची फी आहे...
12
दमदार इंजिन अन् शानदार मायलेज; लॉन्च झाली नवीन मारुती Swift, जाणून घ्या किंमत...
13
१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी अमोल किर्तीकरांच्या प्रचारात?; Video व्हायरल
14
KL Rahul ला झापणाऱ्या संजीव गोएंका यांनी MS Dhoni लाही अचानक कर्णधारपदावरून हटवले होते... 
15
"बेटा, लायकीपेक्षा मोठं घे", शाहरुख खानने राजकुमार रावला घर घेताना दिला होता सल्ला
16
Go Digit IPO : १५ मे पासून खुला होतोय 'हा' IPO, ग्रे मार्केटमध्ये तुफान तेजी; Virat Kohli ची आहे गुंतवणूक
17
अक्षय्य तृतीया: ‘असे’ कसे करा पूजन; पाहा, शुभ मुहूर्त, अद्भूत योग, महत्त्व अन् मान्यता
18
धक्कादायक! भाजपा सदस्याच्या अल्पवयीन मुलाने केलं मतदान; FB वर पोस्ट केला व्हिडीओ
19
Jupiter Wagons Share Price : रेल्वेसाठी काम करणाऱ्या कंपनीच्या शेअरमध्ये तुफान तेजी; ८ रुपयांवरुन ४०० पार, नफा वाढला
20
...आता महाराष्ट्राचा शाप काय असतो तो मोदीजींनी अनुभवावा; उद्धव ठाकरेंचा इशारा

काळोख किनाट, पावसाचो झिनझिनाट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2019 12:28 AM

उमेदवार हैराण । प्रचारावर पडले विरजण, रस्ते, मैदानांवर चिखल झाल्याने सभा घेणे अशक्य

ठाणे : आॅक्टोबर महिना सुरू झाला तरी परतीच्या पावसाने काढता पाय घेतला नसल्याने ऐन निवडणुकीत उमेदवारांच्या प्रचारफेऱ्या, जाहीर सभांवर या पावसाने पाणी फिरवले आहे. दिवसा आॅक्टोबर हीटमुळे कार्यकर्ते उन्हात घामाघूम होतात, तर सायंकाळी सोसाट्याच्या वाºयासह कडकडाट, गडगडाटासह कोसळणाºया पावसामुळे प्रचारफेऱ्यांतून कार्यकर्ते गायब होतात. रस्ते किंवा मैदानात चिखल झाल्याने छोट्या सभांवर विरजण पडत आहे.

सकाळी १० ते ११ वाजता प्रचारफेºया सुरू असताना उन्हाच्या झळा बसतात. कार्यकर्ते घामाघूम होतात. साहजिकच, पिण्याच्या पाण्यापासून थंड सरबतापर्यंत अनेक गोष्टींची व्यवस्था उमेदवारांना दिवसा करावी लागते. परंतु, सायंकाळी अचानक आकाशात काळे ढग जमा होतात. गडगडाट सुरू होतो, विजा चमकू लागतात, पावसाची जोरदार सर कोसळून जाते. संध्याकाळी प्रचारफेरीकरिता जमलेल्या कार्यकर्त्यांची पावसामुळे पांगापांग होते. अनेक उमेदवारांच्या सायंकाळच्या रॅली, छोटेखानी सभा, चौक सभा, पथनाट्य आदी प्रचाराच्या नियोजनावर परतीच्या पावसाने पाणी फिरवले आहे.यापूर्वी विधानसभा निवडणुकीकरिता कमीतकमी ४५ दिवसांचा कालावधी मिळत होता. आता जेमतेम १५ दिवसांचा प्रचार कालावधी उपलब्ध झाला आहे. त्यात दिवसा आॅक्टोबर हीट आणि सायंकाळी पावसाची रिपरिप असा दोन टोकांचा खेळ सुरू झाल्याने उमेदवार हैराण झाले आहेत. अशा व्यस्त हवामानामुळे प्रचाराला येणारे कार्यकर्ते सर्दी, खोकला, ताप यामुळे आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे डोकेदुखी आणखी वाढली आहे. प्रचाराच्या पहिल्या आठवड्यात पाऊस होता. त्यानंतर, पावसाने काहीशी उघडीप घेतल्याने सर्वपक्षीय उमेदवारांना दिलासा मिळाला होता. परंतु, आता प्रचाराचा शेवटचा आठवडा सुरू झाला असताना व प्रचार ऐन रंगात आला असताना पुन्हा पावसाने बिब्बा टाकला आहे.

राज्यात एकाच टप्प्यात विधानसभेच्या निवडणुका असल्याने नेत्यांची जाहीर सभांची तारांबळ उडाली आहे. त्यातून नेत्याची सभेची तारीख मिळाल्यावर जर पावसाने सभेत विघ्न आणले आणि सभा रद्द करायला लावली किंवा उशिरा सुरू झाल्याने अपेक्षित गर्दी जमली नाही, तर उमेदवारांचे ब्लडप्रेशर वाढत आहे. सायंकाळी पावसाळी ढगांमुळे अंधार दाटून आला, तर छोट्या हेलिकॉप्टरमधून ठाणे, पालघर आणि कोकणच्या पट्ट्यात प्रचार करणाºया नेत्यांना पायलटच्या दृश्यमानता (व्हीजिबिलिटी) च्या समस्येमुळे शेवटची सभा रद्द करून मुंबई गाठावी लागत आहे.

उमेदवारांच्या प्रचाराचे नियोजन आदल्या दिवशी केले जाते. त्यानुसार, सकाळी कोणत्या भागात व सायंकाळी कोणत्या भागात प्रचार करायचा, ते ठरलेले असते. सायंकाळी पाऊस झाला तर नियोजन कोलमडते. परतीचा पाऊस आपल्या राजकीय परतीचे निमित्त न ठरो, अशी प्रार्थना उमेदवार सध्या करीत आहेत.पावसामुळे अफवांची वावटळशनिवारी सायंकाळी शहराच्या विविध भागांत चारही मतदारसंंघांतून शिवसेना, राष्टÑवादी काँग्रेस, काँग्रेस, मनसे आणि भाजपच्या उमेदवारांच्या रॅली आयोजित करण्यात आल्या होत्या. सायंकाळी ५ च्या सुमारास या रॅली सुरू झाल्या होत्या. मात्र, या रॅली अर्ध्यावरच सोडून अनेक उमेदवारांना प्रचार सोडावा लागला. पावसामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कल्याणमधील प्रचारसभा रद्द झाल्याचे मेसेज व्हॉट्सअ‍ॅपवर पसरले होते. मात्र, प्रत्यक्षात भिवंडीची सभा झाल्यावर ठाकरे कल्याणमध्ये सभेला हजर राहिले. काही उमेदवारांच्या प्रचारसभा अथवा प्रचारफेºया पावसामुळे रद्द झाल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत, अशी तक्रार कार्यकर्त्यांनी केली.

टॅग्स :thane-acठाणे शहर