शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

Rain Live Update: मिरा भाईंदरला मुसळधार पावसाचा तडाखा, ठिकठिकाणी साचले पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2018 16:33 IST

संततधार पाऊस व वाऱ्या मुळे मीरा भाईंदर मध्ये ५ ठिकाणी झाडं पडली .

मीरारोड - संततधार पाऊस व वाऱ्या मुळे मीरा भाईंदर मध्ये ५ ठिकाणी झाडं पडली . यात एका रिक्षावर झाड पडून नुकसान झाले . तर शहरातील अनेक भागात पाणी साचले असून सायंकाळ पर्यंत पाणी कमी झाले नव्हते . अनेक भागात सांडपाणी घरां मध्ये शिरले . ठिकठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक व्यवस्था व जनजीवन विस्कळीत झाले . काटेकोरपणे न झालेली नालेसफाई, प्लॅस्टिक व थर्माकोलने जाम झालेली गटारे व मोठ्या प्रमाणात झालेले भराव पूरस्थितीला कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे . 

आज दिवसभरात ५ ठिकाणी झाडं पडल्याच्या घटना घडल्या . भाईंदर पश्चिमेला आंबेडकर नगर - स्मशानभूमी मार्गावर मोठे झाड पडून झाली उभ्या असलेल्या रिक्षाचे नुकसान झाले . तर नया नगर  लोढा मार्ग ,  घोडबंदर  स्मशानभूमी जवळ , मीरारोडचे चंद्रेश हाईट्स  व उत्तन - डोंगरी मार्गावर झाडं पडली . पालिकेच्या उद्यान विभाग व अग्निशमन दलाने सदर झाडं बाजूला करून रस्ते मोकळे केले . 

तर रात्रभर मुसळधार कोसळणाऱ्या पावसाचा जोर आज सोमवारी देखील कायम होता . त्यामुळे मीरारोडच्या कृष्ण स्थळ ,  गौरव संकल्प फेस 2, शांतिपार्कचे हॅपी होम कॉम्प्लेक्स,  जांगीड कॉम्प्लेक्स , नित्यानंद नगरचे हायनेस पार्क, मुंशी कंपाउंड , माशाचा पाडा मार्ग - मीनाक्षी नगर , आरएनए ब्रॉडवे एव्हेन्यू , जय विजय नगर ,  सिल्वर पार्क , शीतल नगर , शांती नगर, सिल्वर सरिता, सुंदर सरोवर आदी भागात पाणी साचले होते . 

तर भाईंदरचा टेम्बा मार्ग ,   नवघर, -न्यू आराधना इमारत परिसर , फाटक येथील मनपा पाण्याची टाकी परिसर , राई - शिवनेरी , बाळासाहेब ठाकरे मैदान परिसर ,  फुले मार्ग , बाळाराम पाटील मार्ग येथे पाणी साचल्याच्या तक्रारी होत्या . 

महापालिकेने पाणी साचण्याच्या भागां मध्ये पाणी निचरा करण्यासाठी मोटर पंप लावल्याचे सांगितले आहे . परंतु अनेक ठिकाणी हे पंप कुचकामी ठरले आहेत .  कृष्ण स्थळ ,  गौरव संकल्प फेस 2,  सुंदर सरोवर  आदी अनेक भागात सांडपाणी तुंबले व लोकांच्या घरात आणि दुकानात शिरले . अनेक भागात कमरे एवढे पाणी होते . उभी वाहनं देखील पाण्याखाली गेली . पालिकेचे स्वच्छता निरीक्षक व सफाई कामगार पाण्याचा निचरा होण्यासाठी गटारांचे मार्ग मोकळे करत होते . प्लॅस्टिक , थर्माकोल आदीने गटारांची तोंड जाम झाली होती . तर काही ठिकाणी गटारं साफ झाली नसल्याचे समोर आले .  वसई च्या हद्दीत मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाणी साचल्याने वाहनांची रांग थेट वारसावे व काशिमीरा पर्यन्त आली होती . 

टॅग्स :RainपाऊसMira Bhayanderमीरा-भाईंदरpalgharपालघरmonsoon 2018मान्सून 2018thaneठाणे