शहरं
Join us  
Trending Stories
1
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
2
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
3
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
4
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
5
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
6
IPL 2026: वैभव सूर्यवंशी असेच षटकार मारत राहिला तर मोडणार ख्रिस गेलचा १४ वर्ष जुना विक्रम
7
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
8
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
9
सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन विदर्भकर IPL स्टार कसा बनला?
10
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
11
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
12
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
13
"दिग्दर्शक रात्री खोलीत शिरला, केली घाणेरडी मागणी"; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
14
IMDb Play Trick: सावधान! IMDb वर मोफत चित्रपट पाहण्याचा 'हा' जुगाड पडू शकतो महागात!
15
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
16
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
17
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
18
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
19
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
20
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे रेल्वेची कामे रखडली, ठाणे-दिवा पाचव्या-सहाव्या मार्गिकेला ब्रेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2020 01:42 IST

लॉकडाऊनचा फायदा घेऊन रेल्वे प्रशासनाने पादचारी पूल, उड्डाणपूल, रेल्वेमार्गांचा विस्तार तसेच विविध प्रकल्प मार्गी लावावेत, अशी अपेक्षा सर्वसामान्यांकडून व्यक्त होत आहे. मात्र, ठिकठिकाणच्या कंत्राटदारांचे मजूर गावाला गेल्याने रेल्वे प्रकल्पांची कामे पुढे सरकलेली नाहीत.

- अनिकेत घमंडीडोंबिवली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही महिन्यांपासून सुरू असलेला लॉकडाऊन आणि त्यातच कंत्राटदारांकडील मजूर गावी गेल्याने ठाणे जिल्ह्यात सुरू असलेले रेल्वेचे विविध प्रकल्प आणि पायाभूत सोयीसुविधांची कामे रखडली आहेत. त्यामुळे आॅगस्टनंतर लोकल, लांब पल्ल्यांच्या गाड्या सुरू झाल्यास सर्वसामान्य प्रवाशांना या सुविधांपासून वंचित राहावे लागणार आहे. त्याचबरोबर या प्रकल्पांचा खर्चही वाढण्याची भीती आहे.रेल्वेस्थानक व गाड्यांमधील गर्दीतून कोरोना पसरू नये, यासाठी सर्वसामान्यांसाठी २२ मार्चपासून रेल्वेसेवा बंद झाली. आॅगस्टपर्यंत ही सेवा सुरू होणार नाही. १५ जूनपासून केवळ अत्यावश्यक सेवांतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा काही प्रमाणात सुरू झाली आहे. त्यामुळे सध्याच्या लॉकडाऊनचा फायदा घेऊन रेल्वे प्रशासनाने पादचारी पूल, उड्डाणपूल, रेल्वेमार्गांचा विस्तार तसेच विविध प्रकल्प मार्गी लावावेत, अशी अपेक्षा सर्वसामान्यांकडून व्यक्त होत आहे. मात्र, ठिकठिकाणच्या कंत्राटदारांचे मजूर गावाला गेल्याने रेल्वे प्रकल्पांची कामे पुढे सरकलेली नाहीत.पादचारी पुलांची कामे मार्च, एप्रिलमध्ये पूर्ण करण्याचा रेल्वेचा मानस होता. ठाणे स्थानकात कळवा दिशेकडील, डोंबिवली स्थानकातील कल्याण दिशेकडील तर, ठाकुर्ली, कोपर स्थानकात मुंबई दिशेकडे पादचारी पुलांचे काम सुरू झाले आहे. त्यापैकी ठाकुर्ली स्थानकातील पुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्या पुलावर छप्पर टाकणे, लादी, दिवे, इंडिकेटर लावणे अद्याप बाकी आहे. डोंबिवली स्थानकातील पादचारी पुलाचा गर्डर बसवण्यासाठी मे महिन्यात दोन विशेष ब्लॉक घेण्यात आले. परंतु, या पुलावरही छप्पर, सरकता जिना व लाद्या बसवणे, वीजपुरवठा करणे आदी कामे बाकी आहेत. ठाणे स्थानकातील दोन पादचारी पूल, टिटवाळा, आसनगाव, खडवली तसेच शहाड स्थानक येथील पादचारी पुलांची कामे वेगाने पूर्ण होण्याची गरज आहे. कोपर स्थानकात दिव्याच्या दिशेला पादचारी पुलासाठी पाया खोदला आहे. परंतु, ते काम पुढे सरकलेले नाही. पुलाची ही कामे न झाल्यामुळे लोकल सुरू झाल्यानंतर गर्दीतून वाट काढताना तसेच फिजिकल डिस्टन्सिंग पाळताना प्रवाशांच्या नाकीनऊ येणार आहे.रेल्वेच्या कंत्राटदारांकडील परराज्यांतील कामगार आणखी काही दिवस लॉकडाऊन उघडणार नाही, या शक्यतेने आपल्या गावी निघून गेले आहेत. त्यामुळे कंत्राटदारांची पंचाईत झाली आहे. अशाच पद्धतीने रेल्वेमार्गांवरील डोंबिवलीतील कोपर दिशेकडील उड्डाणपूल व कल्याणमधील पत्रीपुलाचे कामही अन्य यंत्रणांमुळे रखडलेले आहे. पत्रीपुलाचे काम एमएसआरडीसी मार्चमध्ये करणार होती. परंतु, लॉकडाऊनपासून काम रेंगाळलेले आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीकरांची पूलकोंडीतून सुटका झालेली नाही.कोपर उड्डाणपुलाचे लॉकडाऊनमध्ये काम सुरू झाले असले, तरीही त्याला गती मिळत नसल्याने पावसाळ्यात ते काम पूर्ण होऊ शकणार नाही, हे चित्र स्पष्ट आहे. कोपर, पत्रीपुलासाठी रेल्वेकडून ब्लॉक मिळणे अत्यावश्यक आहे. रेल्वे पूर्णपणे सुरू होण्याआधीच त्यासाठी नियोजन करून ते मार्गी लावता येऊ शकते. पण त्या दृष्टीने रेल्वे आणि अन्य यंत्रणांच्या हालचाली सुरू नसल्याचे निदर्शनास येत आहे.कल्याण-कसारा व कल्याण-कर्जतदरम्यान तिसरी व चौथी रेल्वेमार्गिका टाकण्याचे प्रकल्प रखडले आहेत. या मार्गिकांचे सर्वेक्षण झाले असले, तरी कामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे अजून काही वर्षे तरीही कल्याणपुढील कसारा, कर्जत, खोपोलीच्या प्रवाशांना रखडतच प्रवास करावा लागणार आहे. महत्त्वाकांक्षी पाचव्या-सहाव्या रेल्वेमार्गिकेचा प्रकल्प दिवा ते ठाणेदरम्यान रखडला आहे.होम प्लॅटफॉर्मचे कामही प्रलंबितलॉकडाऊनमुळे आसनगाव, बदलापूर स्थानकांमधील होम प्लॅटफॉर्मचे काम प्रलंबित असून, ते कधी पूर्ण होणार हे देखील आताच सांगता येणार नसल्याने त्या स्थानकांमधील प्रवाशांची गैरसोय कायम आहे. कल्याण स्थानकाचे रिमॉडेलिंग सुरू झालेले नाही. वांगणी स्थानकातील पादचारी पूल, उड्डाणपुलाचे काम बाकी आहे.कर्जत-पनवेलदरम्यान दुसरी लाइन, दिवा-विरार मार्गावर लोकल सुरू करणे, अशा विविध प्रकल्पांची घोषणा झालेली असली तरी काम मात्र प्रत्यक्षात कुठेही सुरू झालेले नसल्याने ते एक दिवास्वप्नच राहणार का? असा सवाल केला जात आहे.

टॅग्स :Mumbai Suburban Railwayमुंबई उपनगरी रेल्वेcentral railwayमध्य रेल्वेthaneठाणेdombivaliडोंबिवली