शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
3
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
4
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
5
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
6
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
7
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
8
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
9
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
10
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
11
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
12
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
13
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
14
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
15
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
16
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
17
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
18
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
19
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
20
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"

रेल्वे प्रवाशांचीही साथ महत्त्वाची - राजेंद्र वर्मा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 12:01 AM

सर्वांच्या प्रयत्नांमुळे मिळाला ठाणे स्थानकास ‘बेस्ट स्टेशन’ पुरस्कार

पंकज रोडेकरठाणे -  १६ एप्रिल रोजी ठाणे-बोरीबंदर सेवेचा १६६ वा वर्धापन दिन ठाण्यात साजरा होत होता. त्यावेळी ठाणे रेल्वेस्थानकाला मध्य रेल्वेच्या मुंबई विभागांतर्गत ए-१ श्रेणीत स्वच्छतेचा ‘बेस्ट स्टेशन’ असा पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार तब्बल १५ वर्षांनी पुन्हा ठाण्याला मिळाला आहे. या उपक्रमाबाबत ठाण्याचे स्टेशन डायरेक्टर राजेंद्र वर्मा यांच्याशी साधलेला संवाद.

दिवसेंदिवस वाढत्या प्रवासी संख्येत स्थानकाची स्वच्छता कशी ठेवता?गर्दीच्या वेळेत, म्हणजे सकाळी ७ ते १० आणि सायंकाळी ६ ते १० या वेळेत विशिष्ट असा काही भाग सोडून स्थानकातील इतर ठिकाणची साफसफाई करण्यावर लक्ष केंद्रित केले जाते. गर्दीची वेळ निघून गेल्यावर जो परिसर स्वच्छ करण्याचा राहून जातो, तो स्वच्छ करण्यावर विशेष भर दिला जातो. कर्मचाऱ्यांसाठी आता हा नेहमीचाच सरावाचा भाग झाला आहे.

१० फलाट आणि इतर रेल्वे कार्यालयांच्या ठिकाणी साफसफाईसाठी किती जण आहेत?गेल्या काही महिन्यांपूर्वी साफसफाईच्या कामांसाठी रेल्वेने ठेकेदाराची नेमणूक केली आहे. त्यानुसार, १५० कामगारांसह सातआठ प्रकारच्या वेगवेगळ्या मशीनही ठेकेदाराकडे आहेत. त्याद्वारे, तसेच स्थानकातील उपाहारगृहवाल्यांना त्यांच्या उपाहारगृहासमोरील स्वच्छता राखण्याबाबत सूचना केल्या आहेत. ते कमी पडले, तर ठेकेदाराद्वारे साफसफाई सुरूच असते.

स्वच्छ भारत अभियानाचा स्थानक स्वच्छ ठेवण्यासाठी फायदा होतोय?स्वच्छ भारत अभियानाचा या मोहिमेत निश्चितच फायदा झाला; पण तत्पूर्वीपासून स्थानक स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे रेल्वे प्रशासनाकडून नियमित प्रयत्न सुरू होते. ठेकेदाराची नेमणूक होण्यापूर्वी स्वच्छता राखण्यासाठी बाहेरून कर्मचारी बोलवले जात होते. आता स्वच्छतेचा ठेका दिल्याने स्थानक जास्त स्वच्छ ठेवले जात आहे.

अ‍ॅवॉर्ड मिळवण्याचा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून कधीच काम केले नाही; पण ठाणे स्थानकास स्वच्छतेचा पुरस्कार मिळाला, याचा आनंद वाटतो. भविष्यातही स्थानक स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. प्रवाशांनी या मोहिमेसाठी योगदान दिले, तर आपले रेल्वेस्थानक स्वच्छ आणि सुंदर राहील, यात शंका नाही.

‘गो ग्रीन आणि किप क्लीन’ ही संकल्पना ठाणे स्थानकात राबवण्याचे प्रशासनाने प्रयत्न आहेत. यासाठी प्रवाशांची साथ आवश्यक आहे. - राजेंद्र वर्मा

टॅग्स :thaneठाणेrailwayरेल्वे