शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

भावी स्मार्ट सिटीमध्ये स्मशानभूमीचा प्रश्नही गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 01:11 IST

- अनिकेत घमंडी जगताना मरणयातना भोगाव्या लागतातच; मात्र मेल्यानंतरही त्या पाठ सोडत नाहीत, अशी गंभीर स्थिती डोंबिवली-कल्याणमध्ये झाली आहे. ...

- अनिकेत घमंडी

जगताना मरणयातना भोगाव्या लागतातच; मात्र मेल्यानंतरही त्या पाठ सोडत नाहीत, अशी गंभीर स्थिती डोंबिवली-कल्याणमध्ये झाली आहे. मृत्यू झालेल्या एका वृद्ध महिलेच्या बाबतीत घडलेला प्रकार हा याचे ज्वलंत उदाहरण आहे. ठाकुर्ली येथील स्मशानभूमीला सायंकाळनंतर तर चक्क टाळे ठोकले जात असल्यामुळे स्मार्ट सिटीत माणसाने स्मशानभूमीच्या वेळेतच मरावे का, असा प्रश्न विचारला जात आहे. प्रशासनाच्या जाणिवाच बोथट झाल्याचेच यावरून दिसत आहे.

कुर्ली येथील चोळेगावातील स्मशानभूमीला काही दिवसांपासून संध्याकाळनंतर टाळे ठोकले जात आहे. त्यामुळे परिसरात कुणाचा मृत्यू झाला तर परवड होत आहे. टाळे बघून पाथर्ली, शिव मंदिर स्मशानभूमीपर्यंत जावे लागते, अशी गंभीर अवस्था निर्माण होते. यापूर्वी कल्याणमध्ये गौरीपाडा आणि मुरबाड रस्त्यावरील स्मशानभूमीत वीजपुरवठ्याअभावी दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या प्रकाशझोतात पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली होती. तो मुद्दा प्रचंड गाजला होता.

वाढत्या नागरिकीकरणामध्ये नागरी सुविधांचा बोजवारा उडालेला असतानाच त्यातून स्मशानभूमीही सुटलेली नाही. हातांच्या बोटांवर मोजता येतील एवढ्याच स्मशानभूमींमध्ये सुसज्ज सुविधा आहेत. अनेकदा नगरसेवक निधीमधून महापालिका हद्दीतील स्मशानभूमीचा विकास करण्यात येणार असल्याचे दिसून येते. पण, प्रत्यक्षात स्थिती सगळ्याच ठिकाणी तशीच नाही. चोळेगावात तर संध्याकाळी स्मशानभूमीत गर्दुल्ले, पत्ते खेळणे असे अनैतिक धंदे सुरू झाले होते. संध्याकाळनंतर ती सुरक्षेच्या दृष्टीने बंद ठेवण्याचे कारण उघड झाले आहे. अत्यावश्यक सेवा म्हणून स्मशानभूमी उघडी पाहिजे. त्याठिकाणी पूर्णवेळ सुरक्षारक्षक नेमणे गरजेचे आहे. स्मार्ट सिटीच्या गमजा मारण्याआधी पालिकेने किमान सुविधा तरी द्याव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे.

२०११ च्या जनगणनेनुसार महापालिका हद्दीत १२ लाख ४७ हजार ३२७ एवढी लोकसंख्या आहे. त्यात आता २७ गावांचा समावेश झाल्याने सुमारे १५ लाख एवढी लोकसंख्या असेल, असा अंदाज आहे. त्यामुळे येथील स्मशानभूमी, सिमेट्री, कबरस्तान यांची संख्या ७७ एवढी आहे. अनेक ठिकाणी छपर तुटलेले, भिंतींना तडे गेलेले, मोडकळीला आलेले रॅक, अवतीभोवती वाढलेले रान, दारूच्या बाटल्यांचा खच, भटक्या कुत्र्यांचा वावर, चिमणीअभावी धुरामुळे होणारे प्रदूषण अशा अंतर्गत असुविधा आहेत. तर स्मशानभूमीकडे जाण्यास चांगला रस्ता नसणे, दफनभूमीसाठी पुरेशी जागा नसणे, विद्युतव्यवस्था नसणे, एलपीजी गॅसअभावी गॅसदाहिनी बंद असणे अशा अनेक अडचणी आहेत. यासाठी अनेक ठिकाणी आर्थिक तरतुदी आहेत. त्यासाठी लाखोंच्या भरघोस निधीचेही नियोजन आहे.

पुरेसे सुरक्षारक्षकही नसल्याने स्मशानभूमींना सुरक्षा पुरवणे जिकिरीचे बनले आहे. अपुऱ्या संख्याबळामुळे मोठ्या स्मशानभूमींची संख्या १५ च्या आसपास असताना अवघ्या सात स्मशानभूमींना सुरक्षारक्षक सुविधा पुरवण्यात येते. सुरक्षारक्षकांच्या रिक्त जागा भरणे, हे महापालिकेसमोर मोठे आव्हान आहे. अनेक ठिकाणी स्मशानभूमीच देखभाल, दुरुस्तीअभावी मृतावस्थेत असल्याचे निदर्शनास येत आहे.अशी गंभीर स्थिती असतानाही २४ हून अधिक वर्षे सत्तेत असणाºया युतीच्या लोकप्रतिनिधींना याचे गांभीर्य नाही, ही नागरिकांची शोकांतिका आहे. निदान आठ महिन्यांवर आलेल्या महापालिका निवडणुकांमध्ये तरी मूलभूत सुविधांवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनीही आपापसांतील हेवेदावे सोडून कामावर लक्ष केंद्रित करणे आणि विकासकामांत खोडा न घालणे गरजेचे आहे.

विरोधी पक्षांनीही सर्वांवर करडी नजर ठेवून नागरी हिताचे काम करणे गरजेचे आहे. अन्यथा, ही शहरे म्हणजे मरणयातना अशी नवी ओळख व्हायला वेळ लागणार नाही. निदान, याची जाण ठेवण्याची गरज ज्यांना राजकारणात करिअर करायचे आहे, त्यांनी बाळगावी. सामाजिक बांधीलकी जपून राजकारण करण्याची गरज जास्त आहे. केवळ एकमेकांना खाली खेचण्यासाठी राजकारण करू नये, हेही स्पष्ट आहे.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाMaharashtraमहाराष्ट्र