शहरं
Join us  
Trending Stories
1
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
2
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
3
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
4
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
5
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
6
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
7
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
8
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
9
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
10
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
11
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
12
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
13
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
14
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
15
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
16
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
17
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
18
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
19
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
20
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान

मुंबईतील महामोर्चा दडपण्यासाठी राजकारण करून ठाण्यात आंदोलन केलं जातय - जितेंद्र आव्हाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2022 13:34 IST

महाविकास आघाडीच्यावती मुंबईत काढण्यात आलेल्या महामोर्चासाठी ठाण्याहून मोठ्या प्रमाणात नागरिक मुंबईला गेले आहेत. या लोकांच्या मनामध्ये आक्रोश आहे. सरकारमधील ...

महाविकास आघाडीच्यावती मुंबईत काढण्यात आलेल्या महामोर्चासाठी ठाण्याहून मोठ्या प्रमाणात नागरिक मुंबईला गेले आहेत. या लोकांच्या मनामध्ये आक्रोश आहे. सरकारमधील नेतेमंडळींकडून होत असलेल्या महापुरुषांबद्दल करत असलेल्या वक्तव्यांविरोधात हा आक्रोश आहे. मात्र, मुंबईतील हा महामोर्चा दडपण्यासाठी अशा प्रकारचे राजकारण करून ठाण्यामध्ये आंदोलन केले जात आहे. असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

यात नागरिकांना वेठीस धरले जात आहे. यात रिक्षा चालकांना मारहाण केलेली आहे. परिवहन सेवा बंद केली आहे. नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास देण्यात आला आहे. हे सर्व करून या लोकांना काहीही मिळणार नाही. या लोकांनी वारकऱ्यांसाठी हा संप केलेला आहे. परंतु खुद्द वारकरी हे आमच्या सोबत आहेत. या ठिकाणी त्यांनी माझी भेट घेतली. उगाच जूनं पुराण काढायचं आणि अशा प्रकारचं नवीन नाटक करायचं हे धंदे चालू आहेत. ठाण्यातून जवळपास 5000 हून जास्त नागरिक मुंबईला पोहोचत आहेत. शरद पवार यांच्या समवेत मीही मोर्चामध्ये सामील होत आहे, असेही आव्हाड यावेळी म्हणाले. 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडMumbaiमुंबईNCPराष्ट्रवादी काँग्रेसagitationआंदोलन