शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली कॅपिटल्स जिंकले, राजस्थान रॉयल्सचे प्ले ऑफचे तिकीट पक्के झाले! गणित बिघडले
2
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
3
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
4
PM Modi Property in Affidavit, Lok Sabha Election 2024: वाराणसीतून पंतप्रधान मोदी यांनी भरला उमेदवारी अर्ज... पाहा त्यांची प्रॉपर्टी किती? शिक्षण किती?
5
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी
6
पेटीएमवर UPI Lite Wallet कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे? जाणून घ्या प्रोसेस...
7
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!
8
KL Rahul चा अफलातून झेल पाहून संजीव गोएंका खूश झाले; टाळ्या वाजवताना दिसले, Video
9
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
10
राहुल द्रविडनंतर BCCI मुख्य प्रशिक्षक म्हणून CSK च्या ताफ्यातील प्रमुख व्यक्तीचा करतेय विचार 
11
घाटकोपर होर्डिंगप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अंबादास दानवेंची मागणी
12
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
13
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
14
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
15
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
16
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
17
T20 World Cup मध्ये भारताची डोकेदुखी वाढवणारी बातमी! ICC च्या नियमामुळे गोंधळ 
18
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
19
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
20
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."

मतदान केंद्रांवर समस्यांची भरमार, शिक्षकांनी वाचला पाढा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2019 2:14 AM

: नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी विविध मतदान केंद्रांवर ड्युटी बजावलेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांना निवडणूक यंत्रणेच्या नियोजनशून्य कारभारामुळे असुविधांचा सामना करावा लागला.

ठाणे : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी विविध मतदान केंद्रांवर ड्युटी बजावलेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांना निवडणूक यंत्रणेच्या नियोजनशून्य कारभारामुळे असुविधांचा सामना करावा लागला. मुख्यत्वे महिला कर्मचाऱ्यांची यावेळी मोठी गैरसोय झाली. त्यामुळे निवडणूक यंत्रणेवर टीका करत, शिक्षकांनी त्यांना भेडसावलेल्या समस्यांचा पाढा सोमवारी पत्रकार परिषदेत वाचला.महाराष्ट्र शिक्षक सेनेचे ठाणे महानगर अध्यक्ष गोकुळ पाटील यांनी महाराष्टÑ राज्य मुख्याध्यापक संघाच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत निवडणूक कर्तव्यावरील शिक्षकांच्या समस्या मांडल्या. लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी अनेक केंद्रांवर महिला कर्मचाºयांची मोठ्या प्रमाणात गौरसोय झाली. शिक्षक कर्मचाºयांना मतदानाच्या दिवशी नियुक्त्या देताना कोणतेही नियोजन करण्यात आले नव्हते. किमान महिला शिक्षकांची सोय यंत्रणेने विचारात घेणे अपेक्षित होते; परंतु त्यांनाही घरापासून लांबच्या मतदान केंद्रांवर ड्युटी देण्यात आली होती. मतदान प्रक्रि या पूर्ण झाल्यानंतर उर्वरित सर्व कामे आटोपून कर्मचाºयांना घरी जाण्यासाठी रात्री उशिर होत असतो. यावेळीही तसाच प्रकार झाल्याचे पाटील यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले. आजचे युग हे डिजिटल युग आहे. असे असतानाही निवडणूक आयोगाकडून मोठ्या प्रमाणात कागदांचा वापर होत असतो. कागदांवर होणारा हा खर्च टाळावा, अशी मागणी यावेळी पाटील यांनी केली.मतदानाच्या दिवशी काम करणाºया कर्मचाºयांचे मानधन कमी आहे. त्यात वाढ करावी करण्याची मागणी लावून धरण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. सरकारी कामात हलगर्जी झाल्यास संबंधित अधिकारी आणि कर्मचाºयावर थेट बडतर्फीची कारवाई करण्यात येते; मात्र निवडणूक आयोगाच्या गलथान कारभाराकडे कोणी लक्ष देत नाही. त्यात कामाचा वाढत्या ताणामुळे अनेक कर्मचाºयांचे जीव जात असतात. याला सर्वस्वी निवडणूक आयोग जबाबदार असल्याचा आरोपही पाटील यांनी यावेळी केला. निवडणुकीचे काम करण्यासाठी शिक्षक सदैव तयार आहोत; पण मतदान केंद्रांवर होणाºया गौरसोयींची निवडणूक आयोगाने योग्य ती दखल घेऊन तेथे सोयी सुविधा पुरवण्यासाठीही पुढाकार घेण्याची गरज आहे. असेच प्रकार भविष्यात सुरू राहिल्यास सर्व संघटना एकत्र येवून निवडणुकीचे काम न करण्याचा निर्णय घेतील, असा इशारा पाटील यांनी यावेळी दिला.बोटं निघाली सोलूनमतदारांच्या बोटावर शाई लावताना ती कर्मचाºयांच्या बोटालाही लागल्याने, त्यांच्या बोटांची सालपटं निघाल्याच्या तक्रारी महिला शिक्षकांनी काही वृत्तवाहिन्यांनी बोलताना केल्या. मतदान केंद्रांवर मतदारांच्या बोटावर शाई लावण्याचे काम दिवसभर सुरू असते. बरेचदा गडबडीत कर्मचाºयांच्या बोटांनाही शाई लागते. ही शाई रसायनयुक्त असल्याने कर्मचाºयांची बोट अक्षरश: सोलून निघाली आहेत.अनेकांच्या बोटांची जळजळ होत आहे. पुढील निवडणुकीत आयोगाने चांगल्या प्रतीची शाई मागवावी, अशी मागणीही या शिक्षिकांनी केली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकVotingमतदान