शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

‘त्या’ खाजगी सुरक्षा रक्षकांना परिवहन विभागाने दिला नारळ; तिकिट तपासणीसाची सेवा बजावित होते

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2018 18:29 IST

मीरा-भार्इंदर महापालिकेने कंत्राटावर नियुक्त केलेल्या खाजगी सुरक्षा रक्षकांपैकी १२ जणांना दोन महिन्यांपुर्वी स्थानिक परिवहन विभागात तिकिट तपासणीसांच्या कामावर रुजू करुन घेतले होते. मात्र विभागात अचानक अतिरीक्त कर्मचारी ठरल्याचे स्पष्ट करुन विभागाच्या व्यवस्थापक स्वाती देशपांडे यांनी त्या सुरक्षा रक्षकांनी सेवेतून कमी केल्याने त्यांच्यात अस्वस्थता पसरली आहे. 

- राजू काळे  

भार्इंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेने कंत्राटावर नियुक्त केलेल्या खाजगी सुरक्षा रक्षकांपैकी १२ जणांना दोन महिन्यांपुर्वी स्थानिक परिवहन विभागात तिकिट तपासणीसांच्या कामावर रुजू करुन घेतले होते. मात्र विभागात अचानक अतिरीक्त कर्मचारी ठरल्याचे स्पष्ट करुन विभागाच्या व्यवस्थापक स्वाती देशपांडे यांनी त्या सुरक्षा रक्षकांनी सेवेतून कमी केल्याने त्यांच्यात अस्वस्थता पसरली आहे. 

पालिकेने मुख्यालयात नियुक्त केलेल्या सुमारे २० ते २५ खाजगी सुरक्षा रक्षकांपैकी १२ सुरक्षा रक्षकांना दोन महिन्यांपुर्वी स्थानिक परिवहन  विभागात तिकिट तपासणीसाचा अतिरीक्त कार्यभार सोपविला होता. त्यामुळे मुख्यालयातील सुरक्षा रक्षकाचे अर्धवेळ काम आटोपून दुपारी ३ वाजताच्या सुमारास परिवहन सेवेत तिकिट तपासणीसाचे काम करण्यास त्यांनी सुरुवात केली. यात त्यांना तिकिट तपासणीसाचे कोणतेही ज्ञान तसेच त्यांची शैक्षणिक पात्रता नसतानाही ते काम दिल्याने नसल्याने त्यांच्यात संभ्रम निर्माण झाला होता. त्यांना त्याचे प्रशिक्षण दिल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले तर दिलेले प्रशिक्षण अपुरे असल्याचे त्या कर्मचा-यांकडुन सांगण्यात आले. यामागे प्रशासनाकडून नेमके कारण स्पष्ट करण्यात आले नसले तरी परिवहन सेवा चालविण्यासाठी पालिकेला सुरक्षा रक्षकांचा पुरवठा करणा-या सैनिक सिक्युरीटी या  कंपनीला कंत्राट देण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून सुरु झाला होता. त्याची निविदाही कंपनीने भरली होती. मात्र एकच निविदा प्राप्त झाल्याने पालिकेने फेरनिविदा काढण्याचा निर्णय घेतला. दरम्यान कंत्राट त्याच कंपनीला देण्यासाठी सुरु झालेल्या प्रयत्नातूनच त्या सुरक्षा रक्षकांना सुरुवातीला तिकिट तपासणीसाच्या कामाला जुंपण्याची तयारी प्रशासनाने सुरु केली होती. कालांतराने त्यांची पुर्ण वेळेकरीता परिवहन विभागात कंत्राटावरच नियुक्ती करण्यात आली. पालिकेकडून परिवहन सेवेसाठी एकुण १००व पैकी ५२ बसच खरेदी करण्यात आल्या आहेत. त्यातील १० नवीन बस प्रादेशिक परिवहन विभागाच्या नोंदणी अभावी धूळ खात उभ्या आहेत. तर उर्वरीत ४२ पैकी ३५ ते ३६ बस प्रवासी सेवेसाठी दररोज उपलब्ध होतात.  यामुळे परिवहन सेवा अपुरी ठरत असल्याची ओरड स्थानिक प्रवाशांकडून केली जात आहे. त्यातच हि सेवा चालविण्यासाठी सुमारे ३५० कर्मचारी विभागात कंत्राटी पद्धतीवर कार्यरत असताना पुढे बसची संख्या वाढणार असल्याने त्या १२ सुरक्षा रक्षकांची सेवा आवश्यक ठरणार असल्याचे गृहित धरुन गेल्या आठवड्यात पुन्हा त्यांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात करण्यात आली. मात्र अचानक परिवहन विभागाच्या व्यवस्थापक स्वाती देशपांडे यांनी त्या १२ सुरक्षा रक्षकांना विभागात अतिरीक्त कर्मचारी ठरल्याच्या कारणावरुन कमी करण्यात येत असल्याचे कळविले. त्यामुळे परिवहन सेवेतून नारळ मिळाल्यानंतर त्या कर्मचाय््राांनी पुन्हा सुरक्षा रक्षकाच्या सेवेतील नियुक्तीसाठी प्रयत्न सुरु केला. मात्र त्यांना तेथेही लाल दिवा दाखविण्यात आल्याने त्यांच्यात अस्वस्थता पसरली आहे. याबाबत परिवहन विभागाचे आगार व्यवस्थापक सुरेश कलंत्रे यांना संपर्क साधला असता त्यांनी त्याची माहिती देण्यास त्यांनी नकार दिला. 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक