शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

येऊर पर्यटन केंद्राचा प्रस्ताव वनखात्याकडे सादर, दोन महिन्यात कामला होणार सुरवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 15:23 IST

येत्या दोन महिन्यात येऊर येथील पर्यटन स्थळ विकसित करण्याचे सोपास्कार पार पाडल्यानंतर प्रकल्पाला खºया अर्थाने सुरवात होणार आहे. या प्रकल्पामुळे येथील आदीवासी बांधवांना रोजगारसुध्दा उपलब्ध होणार आहे.

ठळक मुद्दे८९६२ चौ.मी. जमीनीवर होणार पर्यटनस्थळआदीवासींची कला, संस्कृती केली जाणार जतन

ठाणे - येऊर येथील सुमारे ८९६२ चौ.मी. जमिनीवर वन खात्याच्या आणि ठाणे महापालिकेच्या माध्यमातून ‘‘पर्यटनस्थळ’’ विकसित करून पर्यटकांना आकर्षण ठरेल असे ‘‘निसर्ग उद्यान’’ व आदिवासी समाजाची जीवनशैली दाखवणारे ‘‘आदिवासी संस्कृती कला केंद्र’’ उभारण्यात येणार आहे. त्यानुसार सोमवारी आमदार प्रताप सरनाईक यांनी महापालिकेने केलेला तयार केलेला पर्यटन केंद्राचा प्रस्ताव संजय गांधी राष्ट्रीय उद्यानचे मुख्य वनसंरक्षक व संचालक अनवर अहमद यांच्याकडे महापालिका अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सादर केला. त्यामउळे आता खऱ्या अर्थाने या प्रकल्पाला चालना मिळणार आहे.                    सर्वसामान्य पर्यटकांसाठी व शालेय विद्यार्थ्यांसाठी अशाप्रकारचे केंद्र उभारल्यास आदिवासी बांधवांना या केंद्राच्या माध्यमातून वेगळी दिशा मिळून, मूळ आदिवासी संस्कृतीबद्दल लोकांना माहिती मिळू शकणार आहे. तसेच हे पर्यटन केंद्र विकसित करत असताना मूळ आदिवासी संस्कृती जपण्यासाठी त्यांचे राहणीमान, त्यांची शस्त्रास्त्रे, त्यांचा तारपा सारखा नृत्याविष्कार, त्यांना अवगत असलेली वारली पेंटिंग सारखी कला व इतर विविध क्षेत्रात आदिवासी बांधव ज्या कलांमध्ये परंपरागत आहेत, त्या सर्व कलांना प्रोत्साहन देण्याचे काम या केंद्रातून करता येणार आहे. तसेच पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी अन्य अभयारण्याच्या धर्तीवर येऊर येथील निसर्ग सौंदर्य अबाधित ठेवून वेगवेगळ्या प्रकारचे अ‍ॅडव्हेन्चर स्पोर्ट्स, शालेय विद्यार्थ्यांना पशु, पक्षी, वनस्पती तसेच आदिवासी संस्कृतीची माहिती मिळावी याकरिता शैक्षणिक दृष्टीने विकसीकरण करण्यात येणार आहे. त्याचबरोबर येऊर येथील डोंगरकड्या लगत वर्षातील ३६५ दिवस पाणी साठून तलाव निर्माण झाले असून या तलावात बोटिंग तसेच पर्यटनाच्या दृष्टीने इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात असल्याचे माहिती या प्रकल्पाचा पाठपुरावा करणारे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले.त्यानुसार सोमवारी हा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या पर्यटन केंद्रामुळे येऊर येथील आदिवासींना रोजगार सुध्दा होणार असून या पर्यटन केंद्राच्या माध्यमातून ठाणे महानगरपालिकेच्या उत्पनाचा स्त्रोत देखील वाढणार असल्याचे त्यांनी सांगितले. आता वनखात्याच्या परवानगी नंतर लवकरच येथील कामाला सुरवात होणार आहे. सोमवारी झालेल्या बैठकीत मुख्य वनसंरक्षक व संचालक अनवर अहमद यांनी एका महिन्याच्या आत वनखात्याची कार्यालयीन कायदेशीर परवानगी पुर्ण करून घेण्याची जबाबदारी घेतल्याने येऊरच्या पर्यटन केंद्राच्या कामाला आता गती प्राप्त झालेली असून दोन महिन्यामध्ये या प्रकल्पाला सुरवात होण्याची आशा निर्माण झाली आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाforestजंगल