शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

ओखी चक्रीवादळामुळे जिल्ह्यात सावधानतेचा इशारा; ठाणे-पालघरच्या ३५ बोटी अद्याप समुद्रात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2017 20:21 IST

ठाणे : कोलंबिलया, माले बेटाकडून निघालेले ओखी चक्रीवादळ कोणत्याही क्षणी समुद्रात धडकण्याची शक्याता आहे. मच्छीमारीसाठी गेलेल्या ठाणे - पालघरच्या सुमारे ३५ बोटी अद्याप समुद्रात आडकलेल्या आहेत. त्यांना वेळीच किना-यास लागण्याचे संदेश देण्यात आले आहेत.

सुरेश लोखंडेठाणे : कोलंबिलया, माले बेटाकडून निघालेले ओखी चक्रीवादळ कोणत्याही क्षणी समुद्रात धडकण्याची शक्याता आहे. मच्छीमारीसाठी गेलेल्या ठाणे - पालघरच्या सुमारे ३५ बोटी अद्याप समुद्रात आडकलेल्या आहेत. त्यांना वेळीच किना-यास लागण्याचे संदेश देण्यात आले आहेत. उशिरापर्यंत या मोठी पोहण्याची शक्यताा वर्तवण्यात आली आहे. या बोटी किना-यास लागेपर्यंत सर्वांचे लक्ष त्याकडे लागून आहे.सुमारे ४८ तासाच्या कालावधीत ओक्खी चक्रीवादळ गुजराथ व मुंबईच्या समुद्रात धडकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ठाणे - पालघर जिल्ह्यातील शेकडो मच्छीमा-यांच्या सुमारे एक हजार ३८४ बोटी समुद्रात गेलेल्या आहेत. यापैकी एक हजार ३४९ बोटी ठिकठिकाणच्या किना-यावर सुखरूप लागल्याचा दावा येथील मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्तालयाकडून केला जात आहे. उर्वरित पालघर जिल्हह्याच्या ३४ मच्छीमार बोटींसह ठाणे जिल्ह्यातील एक बोट अद्याप समुद्रात आडकलेली आहे. परंतु या सर्व बोटी सुख्यरूप असून त्यावेळीच किना-यावर लागण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे.ओखी या जीव घेण्या चक्रीवादळापासून कोणत्याही प्रकारची जीवित व वित्त हानी होऊन नये म्हणून हवामान खात्याच्या सुचनेनुसार किनारपट्टी लगतच्या गावांसाठी दोन्ही जिल्ह्यांतील सर्व महापालिकां, पोलिस आयुक्तालय, पोलिस अधिक्षक, तहसिलदारांना जिल्हा प्रशासनाकडून सावधानतेसह सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. खबरदारीची उपाययोजना म्हणून सर्व शासकीय यंत्रणाना देखील सतर्कतेचे आदेश देण्यात आले असून मच्छीमा-यांसह सर्वांना कोणत्याही परिस्थितीत समुद्रात उतरण्यास मनाई आदेश जारी करण्यात आला आहे. तर समुद्रातील बोटींना जवळच्या किना-यावर लागण्याचा संदेश देऊन खातर जमा करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.ठाणे जिल्ह्यातील उत्तन बंदरातून ६९० मच्छीमार बोटी समुद्रात गेल्या असता त्यातील ६८९ बोटी परत येऊन किना-यास लागल्या आहेत. उर्वरित गस्पेल गौ-या यांची ‘ दंवदास’ ही बोट देखील लवकरच उत्तन बंदरात लागणार आहे. त्यातील खलासी सुखरूप असल्याचे सांगितले जात आहे. झाई, वरोर, आगर, नरपड, डहाणू, धाकटी डहाणू,घिवली, उच्छेळी, नवापूर, पोफरण दांडी, मुरबा, सातपाटी, वडराई, टेभी, दादरपाडा, केळवे, माहीम, केळवा, एडवण, कोरे, दातिवरे, किल्लाबंदर (अर्नाळा), पाचूबंदर, नायगाव आणि खोचिवडे आदी पालघर जिल्ह्यातील बंदरांमधून ६९४ मच्छीमार बोटी समुदा्रत गेल्या असता त्यापैकी ६६० बोटी किना-यास सुख्यरूपपणे लागल्या आहेत.समुद्रात पालघरच्या आडकलेल्या ३४ बोटी किनाºयावर आणण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये डहाणू बंदारातील भाग्यसाई, मातोश्रीप्रसाद, व गणेश धानमेहेर यांची भाग्यसाई या तीन बोटी समुद्रात आहेत. याशिवाय धाकटी डहाणूची धनवृद्धी, एडवन बंदरातील जयदत्तसाई ही बोटी परत आली नाही. तर सातपाटी बंदारातील १८६ बोटी समुद्रात गेलेल्या आहेत. त्यातील १५७ बोटी परत आल्या आहेत. तर २९ बोटी समुद्रात आहेत. त्या लवकरच किना-यावर आणण्यासाठी शासकीय यंत्रणांसह मच्छीमार विकास सहकारी संस्था सर्व शक्तीनिशी प्रयत्न करीत आहेत.

टॅग्स :Ockhi Cycloneओखी चक्रीवादळ