शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

ओखी चक्रीवादळामुळे जिल्ह्यात सावधानतेचा इशारा; ठाणे-पालघरच्या ३५ बोटी अद्याप समुद्रात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2017 20:21 IST

ठाणे : कोलंबिलया, माले बेटाकडून निघालेले ओखी चक्रीवादळ कोणत्याही क्षणी समुद्रात धडकण्याची शक्याता आहे. मच्छीमारीसाठी गेलेल्या ठाणे - पालघरच्या सुमारे ३५ बोटी अद्याप समुद्रात आडकलेल्या आहेत. त्यांना वेळीच किना-यास लागण्याचे संदेश देण्यात आले आहेत.

सुरेश लोखंडेठाणे : कोलंबिलया, माले बेटाकडून निघालेले ओखी चक्रीवादळ कोणत्याही क्षणी समुद्रात धडकण्याची शक्याता आहे. मच्छीमारीसाठी गेलेल्या ठाणे - पालघरच्या सुमारे ३५ बोटी अद्याप समुद्रात आडकलेल्या आहेत. त्यांना वेळीच किना-यास लागण्याचे संदेश देण्यात आले आहेत. उशिरापर्यंत या मोठी पोहण्याची शक्यताा वर्तवण्यात आली आहे. या बोटी किना-यास लागेपर्यंत सर्वांचे लक्ष त्याकडे लागून आहे.सुमारे ४८ तासाच्या कालावधीत ओक्खी चक्रीवादळ गुजराथ व मुंबईच्या समुद्रात धडकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ठाणे - पालघर जिल्ह्यातील शेकडो मच्छीमा-यांच्या सुमारे एक हजार ३८४ बोटी समुद्रात गेलेल्या आहेत. यापैकी एक हजार ३४९ बोटी ठिकठिकाणच्या किना-यावर सुखरूप लागल्याचा दावा येथील मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्तालयाकडून केला जात आहे. उर्वरित पालघर जिल्हह्याच्या ३४ मच्छीमार बोटींसह ठाणे जिल्ह्यातील एक बोट अद्याप समुद्रात आडकलेली आहे. परंतु या सर्व बोटी सुख्यरूप असून त्यावेळीच किना-यावर लागण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे.ओखी या जीव घेण्या चक्रीवादळापासून कोणत्याही प्रकारची जीवित व वित्त हानी होऊन नये म्हणून हवामान खात्याच्या सुचनेनुसार किनारपट्टी लगतच्या गावांसाठी दोन्ही जिल्ह्यांतील सर्व महापालिकां, पोलिस आयुक्तालय, पोलिस अधिक्षक, तहसिलदारांना जिल्हा प्रशासनाकडून सावधानतेसह सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. खबरदारीची उपाययोजना म्हणून सर्व शासकीय यंत्रणाना देखील सतर्कतेचे आदेश देण्यात आले असून मच्छीमा-यांसह सर्वांना कोणत्याही परिस्थितीत समुद्रात उतरण्यास मनाई आदेश जारी करण्यात आला आहे. तर समुद्रातील बोटींना जवळच्या किना-यावर लागण्याचा संदेश देऊन खातर जमा करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.ठाणे जिल्ह्यातील उत्तन बंदरातून ६९० मच्छीमार बोटी समुद्रात गेल्या असता त्यातील ६८९ बोटी परत येऊन किना-यास लागल्या आहेत. उर्वरित गस्पेल गौ-या यांची ‘ दंवदास’ ही बोट देखील लवकरच उत्तन बंदरात लागणार आहे. त्यातील खलासी सुखरूप असल्याचे सांगितले जात आहे. झाई, वरोर, आगर, नरपड, डहाणू, धाकटी डहाणू,घिवली, उच्छेळी, नवापूर, पोफरण दांडी, मुरबा, सातपाटी, वडराई, टेभी, दादरपाडा, केळवे, माहीम, केळवा, एडवण, कोरे, दातिवरे, किल्लाबंदर (अर्नाळा), पाचूबंदर, नायगाव आणि खोचिवडे आदी पालघर जिल्ह्यातील बंदरांमधून ६९४ मच्छीमार बोटी समुदा्रत गेल्या असता त्यापैकी ६६० बोटी किना-यास सुख्यरूपपणे लागल्या आहेत.समुद्रात पालघरच्या आडकलेल्या ३४ बोटी किनाºयावर आणण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये डहाणू बंदारातील भाग्यसाई, मातोश्रीप्रसाद, व गणेश धानमेहेर यांची भाग्यसाई या तीन बोटी समुद्रात आहेत. याशिवाय धाकटी डहाणूची धनवृद्धी, एडवन बंदरातील जयदत्तसाई ही बोटी परत आली नाही. तर सातपाटी बंदारातील १८६ बोटी समुद्रात गेलेल्या आहेत. त्यातील १५७ बोटी परत आल्या आहेत. तर २९ बोटी समुद्रात आहेत. त्या लवकरच किना-यावर आणण्यासाठी शासकीय यंत्रणांसह मच्छीमार विकास सहकारी संस्था सर्व शक्तीनिशी प्रयत्न करीत आहेत.

टॅग्स :Ockhi Cycloneओखी चक्रीवादळ