शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

बारवी धरण रस्त्यावर खड्डे जैसे थे; खड्ड्यातूनच गणेशाचे आगमन आणि विसर्जन

By पंकज पाटील | Updated: August 29, 2022 20:25 IST

बदलापूर गावात हजारो मुर्तींची निर्मिती होते. बदलापूर शहर, अंबरनाथ, उल्हासगर आणि आसपासच्या भागातून मूर्ती नेण्यासाठी याच मार्गाने प्रवास करावा लागतो.

बदलापूरःबदलापुरातून बारवी डॅमकडे जाणारा एमआयडीसीचा रस्ता हा सर्वांसाठीच डोकेदुखी ठरू लागला आहे. या रस्त्यावर उल्हास नदीचे पात्र असल्याने अनेक गणेश भक्त या ठिकाणी गणेश विसर्जनासाठी येत असतात. त्यामुळे गणेशाचे आगमन आणि विसर्जन हे खड्ड्यातुनच होणार आहे. तर दुसरीकडे एमआयडीसीचे अधिकारी या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याकडे पूर्ण दुर्लक्ष करीत आहे. 

     बदलापूर गावात हजारो मुर्तींची निर्मिती होते. बदलापूर शहर, अंबरनाथ, उल्हासगर आणि आसपासच्या भागातून मूर्ती नेण्यासाठी याच मार्गाने प्रवास करावा लागतो. बारवी धरणाकडे जाणारा बदलापूर – बारवी धरण रस्ता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अखत्यारीत आहे. गेल्या काही वर्षांपासून डांबरी असलेल्या या रस्त्याची दुरावस्था होते आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणाची प्रतिक्षा आहे. हा रस्ता अंबरनाथ, उल्हासनगरपासून बदलापूर शहर, बदलापूर गाव, अंबरनाथ तालुक्यातील विविध गावे, मुरबाड आणि मुरबाडच्या आसपासच्या गावातील ग्रामस्थांना महत्वाचा आहे. मात्र या रस्त्याच्या कामाकडे कायमच एमआयडीसीने दुर्लक्ष केले आहे. 

या रस्त्याला गेल्या तीन महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. राज्यभरात रस्त्यांना पडलेल्या खड्ड्यांवरून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिथे खड्डा दिसेल तिथे बुजवा असे स्पष्ट आदेश दिले होते. मात्र एमआयडीसी प्रशासनाने आदेशानंतर एकदाच खड्ड्यांची भरणी करून रस्ते सोडून दिले. त्यानंतर पडलेल्या पावसामुळे पुन्हा खड्डे पडले. मात्र त्या खड्ड्यांकडे एमआयडीसी प्रशासनाने लक्ष्य दिले नाही. बदलापूर शहरातील वालिवली, एरजांड भागातून जाणाऱ्या या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेक अपघात झाले आहेत. वालिवली चौकात रस्त्याची भीषण अवस्था झाली आहे. 

विशेष म्हणजे या रस्त्याची जबाबदारी असलेल्या एमआयडीसीचे अधिकारी रोज याच रस्त्याने बारवी धरणापर्यंतचा प्रवास करतात. त्यांनंतरही खड्डे बुडजवले जात नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होतो आहे. या रस्त्याची दुरुस्ती न झाल्याने आणि त्या ठिकाणी खड्डे भरल्याने गेल्याने आता गणेशाचे आगमन आणि विसर्जन हे दोन्हीही खड्ड्यातूनच करावी लागणार आहे.

 ''या रस्त्याचे पावसाळ्यानंतर डांबरीकरण केले जाणार आहे. तत्पूर्वी तातडीने या रस्त्यावरचे खड्डे बुजवण्यात येणार असून तसे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. – सुधीर नागे, अधिक्षक अभियंता, एमआयडीसी.  

टॅग्स :badlapurबदलापूरGaneshotsavगणेशोत्सवPotholeखड्डे