शहरं
Join us  
Trending Stories
1
"...महाराष्ट्राच्या इतिहास एवढा मोठा विजय कुणालाच मिळालेला नाही, ही तर...," फडणवीसांनी नगराध्यक्ष, नगरसेवकांचा आकडाच सांगितला
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

पलावा पुलाच्या कामात रेल्वेच्या दिरंगाईने अपघाताची शक्यता; मनसे आमदार घेणार रेल्वेमंत्र्यांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2020 00:47 IST

परवानगी मिळेना : आमदार घेणार रेल्वेमंत्र्यांची भेट

डोंबिवली : कल्याण-शीळ महामार्गावरील पलावा येथे नवीन उड्डाणपुलासाठी रेल्वेची मंजुरी मिळत नसल्याने या पुलाच्या कामात दिरंगाई होत आहे. त्यामुळे तोडगा काढण्यासाठी कल्याण ग्रामीणचे मनसेचे आमदार प्रमोद पाटील लवकरच रेल्वेमंत्र्यांची भेट घेणार आहेत.

उड्डाणपुलासंदर्भात शुक्रवारी पाटील यांनी बैठक घेतली. यावेळी केडीएमसीचे प्रभागक्षेत्र अधिकारी रवींद्र गायकवाड आणि राज्य रस्ते विकास मंडळाचे (एमएसआरडीसी) अधिकारी अनिरु द्ध बोर्डे उपस्थित होते. त्यावेळी रेल्वे पुलास मंजुरी देत नसल्याची माहिती पुढे आली. त्यामुळे त्यांनी रेल्वेमंत्र्यांची भेट घेण्याचे ठरवले आहे.

कल्याण-शीळ रस्त्यावरील वाहतूककोंडीवर मात करण्यासाठी पलावा येथे नव्या उड्डाणपुलाच्या कामाला सुरु वात झाली आहे. या रस्त्यावरील वाढलेल्या बांधकामांमुळे कोंडीत भर पडत असून, त्यावर केडीएमसी कारवाई करत नसल्याचे एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

त्यावर तातडीने कारवाई करावी, अशा सूचना पाटील यांनी केडीएसीच्या अधिकाऱ्यांना दिल्या. तर, रस्ता रुंदीकरणात जागा बाधित होणाºया भूमिपुत्रांना तातडीने मोबदला मिळावा, यासाठी केडीएमसी आणि ठाणे महापालिकेच्या आयुक्तांची भेट घेऊन तोडगा काढणार असल्याची माहिती पाटील यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे. शीळफाटा ते काटई रस्त्यावरील खड्डे बुजवावेत. रस्त्याची डागडुजी होईपर्यंत टोल आकारू नये, असे पाटील यांनी अधिकाºयांना सांगितले. वाहतूककोंडीतून वाहनचालकांची सुटका व्हावी आणि प्रवास जलदगतीने व्हावा, यासाठी त्यांनी कामाला गती देण्याची गरज आहे. पुलाला रेल्वेची परवानगी मिळाली नसल्याने पेच वाढला आहे. कामाची दिरंगाई अपघातांना निमंत्रण देत आहे. याच रस्त्यावर राज्यस्तरीय खेळाडू जान्हवी मोरे हिला जीव गमवावा लागला होता. त्यामुळे किती जणांचा जीव गेल्यानंतर प्रशासनाला जाग येणार, असा प्रश्न निर्माण झाला असल्याचे पाटील म्हणाले. या पार्श्वभूमीवर ते रेल्वेमंत्र्यांची भेट घेणार आहेत.पलावा येथील जुन्या उड्डाणपुलाचे काम रेल्वेच करणार होती. मात्र, रेल्वेने पत्र पाठवून हे काम एमएसआरडीसीलाच करण्याची विनंती केली आहे. या पुलाचा खर्च रेल्वे एमएसआरडीसीला देणार आहे. मात्र, रेल्वेची परवानगी नसल्याने पुलाचे काम वर्षभरात कसे होणार? असा प्रश्न सध्या वाहनचालकांना पडला आहे. रेल्वेची परवानगी मिळण्यास उशीर होत असल्याने आमदार राजू पाटील हे लवकरच केंद्रीय रेल्वे मंत्र्यांची भेट घेऊन कामातील अडथळे दूर करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.

टॅग्स :MNSमनसेrailwayरेल्वे