शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

पलावा पुलाच्या कामात रेल्वेच्या दिरंगाईने अपघाताची शक्यता; मनसे आमदार घेणार रेल्वेमंत्र्यांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2020 00:47 IST

परवानगी मिळेना : आमदार घेणार रेल्वेमंत्र्यांची भेट

डोंबिवली : कल्याण-शीळ महामार्गावरील पलावा येथे नवीन उड्डाणपुलासाठी रेल्वेची मंजुरी मिळत नसल्याने या पुलाच्या कामात दिरंगाई होत आहे. त्यामुळे तोडगा काढण्यासाठी कल्याण ग्रामीणचे मनसेचे आमदार प्रमोद पाटील लवकरच रेल्वेमंत्र्यांची भेट घेणार आहेत.

उड्डाणपुलासंदर्भात शुक्रवारी पाटील यांनी बैठक घेतली. यावेळी केडीएमसीचे प्रभागक्षेत्र अधिकारी रवींद्र गायकवाड आणि राज्य रस्ते विकास मंडळाचे (एमएसआरडीसी) अधिकारी अनिरु द्ध बोर्डे उपस्थित होते. त्यावेळी रेल्वे पुलास मंजुरी देत नसल्याची माहिती पुढे आली. त्यामुळे त्यांनी रेल्वेमंत्र्यांची भेट घेण्याचे ठरवले आहे.

कल्याण-शीळ रस्त्यावरील वाहतूककोंडीवर मात करण्यासाठी पलावा येथे नव्या उड्डाणपुलाच्या कामाला सुरु वात झाली आहे. या रस्त्यावरील वाढलेल्या बांधकामांमुळे कोंडीत भर पडत असून, त्यावर केडीएमसी कारवाई करत नसल्याचे एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

त्यावर तातडीने कारवाई करावी, अशा सूचना पाटील यांनी केडीएसीच्या अधिकाऱ्यांना दिल्या. तर, रस्ता रुंदीकरणात जागा बाधित होणाºया भूमिपुत्रांना तातडीने मोबदला मिळावा, यासाठी केडीएमसी आणि ठाणे महापालिकेच्या आयुक्तांची भेट घेऊन तोडगा काढणार असल्याची माहिती पाटील यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे. शीळफाटा ते काटई रस्त्यावरील खड्डे बुजवावेत. रस्त्याची डागडुजी होईपर्यंत टोल आकारू नये, असे पाटील यांनी अधिकाºयांना सांगितले. वाहतूककोंडीतून वाहनचालकांची सुटका व्हावी आणि प्रवास जलदगतीने व्हावा, यासाठी त्यांनी कामाला गती देण्याची गरज आहे. पुलाला रेल्वेची परवानगी मिळाली नसल्याने पेच वाढला आहे. कामाची दिरंगाई अपघातांना निमंत्रण देत आहे. याच रस्त्यावर राज्यस्तरीय खेळाडू जान्हवी मोरे हिला जीव गमवावा लागला होता. त्यामुळे किती जणांचा जीव गेल्यानंतर प्रशासनाला जाग येणार, असा प्रश्न निर्माण झाला असल्याचे पाटील म्हणाले. या पार्श्वभूमीवर ते रेल्वेमंत्र्यांची भेट घेणार आहेत.पलावा येथील जुन्या उड्डाणपुलाचे काम रेल्वेच करणार होती. मात्र, रेल्वेने पत्र पाठवून हे काम एमएसआरडीसीलाच करण्याची विनंती केली आहे. या पुलाचा खर्च रेल्वे एमएसआरडीसीला देणार आहे. मात्र, रेल्वेची परवानगी नसल्याने पुलाचे काम वर्षभरात कसे होणार? असा प्रश्न सध्या वाहनचालकांना पडला आहे. रेल्वेची परवानगी मिळण्यास उशीर होत असल्याने आमदार राजू पाटील हे लवकरच केंद्रीय रेल्वे मंत्र्यांची भेट घेऊन कामातील अडथळे दूर करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.

टॅग्स :MNSमनसेrailwayरेल्वे